AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rebellion Maharashtra : उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी बंडखोरीला ऊत; नागपूर अन् नाशकात बंडखोरीचे नाट्य

Rebellion Maharashtra : उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी बंडखोरीला ऊत; नागपूर अन् नाशकात बंडखोरीचे नाट्य

| Updated on: Jan 02, 2026 | 5:24 PM
Share

उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपमध्ये अनेक ठिकाणी बंडखोरी उफाळून आली आहे. नागपुरात कार्यकर्त्यांनी बंडखोर उमेदवार किसन गावंडे यांना घरात कोंडून ठेवले. नाशिकमध्ये मुकेश शहाणे बंडखोरीवर ठाम राहिले, तर मुंबईतही शिंदे सेना आणि भाजपमध्ये वाद उफाळला. या बंडखोरीला शमवण्यासाठी वरिष्ठ नेत्यांना प्रयत्न करावे लागले.

महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपमध्ये अनेक ठिकाणी बंडखोरीचे नाट्य घडले. नागपूरमध्ये प्रभाग क्रमांक १३ ड मधील भाजपचे बंडखोर उमेदवार किसन गावंडे यांना कार्यकर्त्यांनी घरात कोंडून ठेवले. उमेदवारी अर्ज मागे घेऊ नये, यासाठी कार्यकर्त्यांनी त्यांच्या घराबाहेर ठिय्या दिला. पक्षादेशानुसार गावंडे यांनी अखेर अर्ज मागे घेतला. नाशिकमध्ये मंत्री गिरीश महाजनांच्या भेटीनंतरही मुकेश शहाणे यांनी आपली बंडखोरी कायम ठेवली. सुधाकर बडगुजर यांच्या कुटुंबातील तीन उमेदवारांमुळे ते नाराज झाले होते. मुंबईतील वॉर्ड क्रमांक १७३ मध्ये भाजप आणि शिंदे सेनेमध्ये वाद निर्माण झाला आहे. शिल्पा केळुसकर यांनी भाजपच्या एबी फॉर्मची झेरॉक्स वापरून अर्ज दाखल केल्याने त्यांनी माघार घेतली नाही. वरिष्ठ नेते या बंडखोरीला शमवण्यासाठी सक्रिय झाले होते.

Published on: Jan 02, 2026 05:24 PM