गावागावात उमेदवारीचं फर्मान? यंत्रणेपुढे नवा ताण? जरांगे पाटलांची नवी मोहिम काय?
प्रत्येक गावातून किमान ४ ते ५ लोकांनी लोकसभेसाठी अर्ज करावा, अशी मोहीम सुरू आहे. दरम्यान, असे झाल्यास नेमका काय होऊ शकतं, त्याच्या शक्यतेबाबत धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्याने थेट केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र लिहिले आहे.
मुंबई, ८ मार्च २०२४ : मराठा आंदोलक आणि मराठा आंदोलकांनी जी मोहीम सुरू केली आहे. त्यावरून यंत्रणांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. प्रत्येक गावातून किमान ४ ते ५ लोकांनी लोकसभेसाठी अर्ज करावा, अशी मोहीम सुरू आहे. दरम्यान, असे झाल्यास नेमका काय होऊ शकतं, त्याच्या शक्यतेबाबत धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्याने थेट केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र लिहिले आहे. मराठा आरक्षणाच्या लढाईसाठी मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या समर्थकांनी सरकारला कोंडीत पकडण्यासाठी नवी योजना आखली आहे. यासाठी प्रत्येक गावातून लोकसभा निवडणुकीसाठी किमान ५ ते ७ उमेदवारी अर्ज भरण्याचं फर्मानच त्यांनी काढलंय. महाराष्ट्रातील प्रत्येक गावातून उमेदवारी अर्ज भरण्याची तयारी सुरू आहे. असं करण्यामागची भूमिका म्हणजे आरक्षणाची गंभिरता सरकारच्या लक्षात आणून देणं. EVM ऐवजी मतपत्रिकेवर मतदानासाठी जनजागृती करणं आणि आरक्षणाबद्दल रोष व्यक्त करणं असा हेतू यामागे असल्याची चर्चा आहे.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

