काय होईल जेंव्हा भाजपचे 144 आमदार झाले तर; शिंदे गट काय धुणीभांडी करणार? संजय राऊतांचा थेट सवाल
जर भाजप 144 आमदार निवडणून आणण्याची रणनीती आखत असेल तर शिंदे गट काय करणार असा सवाल खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाला केला आहे
आज चंद्रपूर येथे भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांची जाहीर सभा झाली. यावेळी त्यांनी आपलं लक्ष हे लोकसभा असेल असे स्पष्ट केलं. तसेच भाजपचे 144 आमदार ही निवडुण आणण्याचा मानस सांगितला. यावरून आता उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाला डिवचले आहे.
यावेळी राऊत यांनी, शिंदे गटाशी युती ही भाजपने केलेली तात्पुरती तडजोड असल्याचे सांगत, हे सरकार फार काळ काही टिकणार नाही. तर शिंदे गटातील अनेक आमदार हे भविष्यात भाजपमध्येच जातील. तर आम्ही परत त्यांना घेणार नाही असे राऊत यांनी म्हटलं आहे.
त्याचबरोबर जर भाजप 144 आमदार निवडणून आणण्याची रणनीती आखत आहे. मग अशावेळी शिंदे गटातील लोक हे केवळ धुणीभांडी करायला ठेवले आहेत का? असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला. तसेच शिंदे गटाचे ते 16 आमदारही अपात्र ठरतील असेही राऊत म्हणाले.
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?

