मुंबई आणि कोकण परिसरात हवामान विभागाने 9 ते 13 जूनदरम्यान अतिवृष्टीचा इशारा दिला होता. मुंबईत सकाळपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे सखल भागांमध्ये पाणी साचयाला सुरुवात झाली आहे. सायन किंग्स सर्कल या भागात गुडघ्यावर पाणी साचलेलं होतं. सायनच्या गांधी मार्केट परिसरात पाणी भरलं होतं. सध्याची ट्राफिक रस्त्यावरची सुरळीत सुरू आहे त्याच बरोबर ट्रेन ही तिन्ही मार्गांवर सुरळीत सुरू आहे हवामान विभागाने वर्तवला प्रमाणे 11 ते 14 मुंबईला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे तर रायगड सिंधुदुर्ग रत्नागिरी ला रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे आहे त्यामुळे मुंबई जर पाऊस असाच पडत राहिला तर परवा सारखी मुंबईची तुंबई होऊ शकते