पालिका निवडणुकीसाठी आघाडीचे सूत्र उद्धव ठाकरेंकडे?
संजय राऊतांनी ठाण्यात ठाकरे गट आणि मनसे एकत्र लढण्याची घोषणा केली, तर मनसे नेते अविनाश जाधवांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीलाही सोबत घेऊन "७५ पार"चा नारा दिला आहे. मुंबईसह इतर महापालिकांमध्येही ही आघाडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. स्थानिक निवडणुकांमध्ये आघाडीची सूत्रे उद्धव ठाकरेंच्या हाती असल्याचा दावा राऊतांनी केला आहे.
मुंबई पाठोपाठ ठाण्यातही उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (ठाकरे गट) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) एकत्र लढणार असल्याची घोषणा खासदार संजय राऊत यांनी केली आहे. यात आणखी एक पक्ष म्हणून मनसेचे ठाणे जिल्हाप्रमुख अविनाश जाधव यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा उल्लेख केला. या तिन्ही पक्षांच्या संभाव्य आघाडीने ठाण्यात ‘७५ पार’ जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे, असे जाधव यांनी म्हटले आहे.
राऊत यांच्या म्हणण्यानुसार, महाविकास आघाडी ही विधानसभा निवडणुकीसाठी आहे, तर इंडिया आघाडी लोकसभा निवडणुकीसाठी. स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी शिवसेना (ठाकरे गट) मनसेसोबत आघाडी करणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. याचा अर्थ स्थानिक निवडणुकांमध्ये आघाडीची सूत्रे उद्धव ठाकरे यांच्या हाती असतील, असे संकेत दिले आहेत. दरम्यान, काँग्रेसने मुंबई-ठाण्यात एकला चलो रेचा नारा दिला आहे, तर भाजप आणि शिंदे गटाची शिवसेना महायुती म्हणून लढण्याची शक्यता आहे.
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य
उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव देण्याची मागणी द्यावं; मोहोळ यांची मागणी

