AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

tv9 Marathi Special Report | राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर सुनील तटकरे यांचा यू-टर्न; दोन महिन्यांतच बदलली भूमिका, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

tv9 Marathi Special Report | राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर सुनील तटकरे यांचा यू-टर्न; दोन महिन्यांतच बदलली भूमिका, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

| Updated on: Apr 02, 2026 | 10:48 AM
Share

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या मुद्द्यावर पक्षाचे नेते सुनील तटकरे यांनी भूमिका बदलल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून विलिनीकरणाचा मुद्दा हा स्थानिक निवडणुकांपुरताच मर्यादित असल्याचे तटकरे सांगत होते. मात्र, आता त्यांनी या विषयावर वेगळेच विधान करत राजकीय चर्चांना उधाण आणले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या मुद्द्यावर पक्षाचे नेते सुनील तटकरे यांनी भूमिका बदलल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून विलिनीकरणाचा मुद्दा हा स्थानिक निवडणुकांपुरताच मर्यादित असल्याचे तटकरे सांगत होते.
मात्र, आता त्यांनी या विषयावर वेगळेच विधान करत राजकीय चर्चांना उधाण आणले आहे. विलिनीकरणाच्या मुद्द्यावर तटकरे यांनी अवघ्या दोन महिन्यांत भूमिका बदलल्याचे दिसून येत आहे. यापूर्वी, अजित पवार यांच्या बैठकीत विलिनीकरणाची चर्चा झाली असल्यास त्याचे ठोस पुरावे सादर करावेत, असे आव्हान तटकरे यांनी दिले होते. तसेच, अजित पवार यांच्या निधनानंतर विलिनीकरणाच्या प्रक्रियेत बदल होऊ शकले असते, असेही ते म्हणाले होते. राजकीय समीकरणांमध्ये झालेल्या बदलांमुळे विलिनीकरणाचा निर्णय बदलण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली होती. दरम्यान, अजित पवार यांनी विलिनीकरणाबाबत कोणतीही माहिती दिली नव्हती, असेही काही नेते त्यांच्या निधनानंतर सांगत होते. त्यामुळे, अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या भूमिकेबाबत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न झाला का?, असा सवालही उपस्थित केला जात आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत घडामोडींना वेग आला असून, विलिनीकरणाच्या मुद्द्यावर पुढील राजकीय दिशा काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Published on: Apr 02, 2026 10:48 AM
Follow Us