“बाळासाहेबांनी मला जवळ बोलावलं..”, शिवसेना सोडण्यापूर्वी त्या शेवटच्या भेटीत नेमकं काय घडलं? राज ठाकरेंचा खुलासा
"मला आजही ती गोष्ट आठवतेय की जेव्हा बाळासाहेबांना कळलं, की हा काय राहत नाही पक्षात आता. माझी शेवटची भेट होती. मी आजपर्यंत तुम्हाला कधी ही गोष्ट बोललो नाही."
“मला आजही ती गोष्ट आठवतेय की जेव्हा बाळासाहेबांना कळलं, की हा काय राहत नाही पक्षात आता. माझी शेवटची भेट होती. मी आजपर्यंत तुम्हाला कधी ही गोष्ट बोललो नाही. निघताना माझ्यासोबत मनोहर जोशी होते. ते रुमच्या बाहेर गेले. ते बाहेर गेल्यावर बाळासाहेबांनी मला बोलावलं. असे हात पसरले माझ्यासमोर, मला मिठी मारली आणि म्हणाले आता जा. त्यांना समजलं होतं. त्याच्यामुळे मी दगाफटका करून, गद्दारी करून, पाठीत खंजीर खुपसून बाहेर नाही गेलो. बाहेर पडून दुसऱ्या कुठच्याही पक्षात नाही गेलो, तुमच्या विश्वासावर पक्ष उभा केला”, असं राज ठाकरे म्हणाले.
Published on: Aug 23, 2022 02:54 PM
Follow Us
Latest Videos
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........

