Sanjay Raut : रामदास कदमांच्या ‘त्या’ खळबळजनक आरोपावरून राऊतांचा संताप, त्यांच्या तोंडात कुणीतरी शेण कोंबलं…
संजय राऊत यांनी रामदास कदम यांच्या बाळासाहेब ठाकरेंबद्दलच्या वक्तव्यांवरून तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कदमांचे आरोप बेईमानी असून, त्यांनी शिवसेनेकडून मिळालेल्या मंत्रिपदाचा उपभोग घेतल्याचे राऊत म्हणाले. बाळासाहेबांच्या शेवटच्या काळात मातोश्रीवर उपस्थित असल्याने राऊत यांनी कदमांचे दावे फेटाळले.
शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी रामदास कदम यांच्या बाळासाहेब ठाकरे यांच्या संदर्भातील वक्तव्यांवरून तीव्र आक्षेप घेतला आहे. रामदास कदम यांनी बाळासाहेबांचे मृत्यूपत्र आणि हाताच्या ठशांबद्दल केलेल्या कथित चर्चांवर राऊत यांनी जोरदार टीका केली. राऊत यांच्या मते, अशा प्रकारचे वक्तव्य म्हणजे बाळासाहेब ठाकरेंशी बेईमानी आहे, ज्यांनी शिवसेना वाढवली आणि अनेकांना मोठे केले.
राऊत यांनी स्पष्ट केले की, बाळासाहेबांच्या निधनानंतर ते आठ दिवस मातोश्रीवर उपस्थित होते आणि त्यांना सर्व माहिती होती. रामदास कदम त्यावेळी कुठे होते, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. शिवसेनेकडून सत्तेची फळे चाखलेल्या आणि पाच वर्षे मंत्रिपद भोगलेल्या कदमांना आता या गोष्टी आठवणे म्हणजे नमक हरामपणा असल्याचे राऊत म्हणाले. कदमांचे हे आरोप खोटे बोलून रेटून बोलण्याचा प्रकार असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.
Published on: Oct 03, 2025 12:39 PM
बड्या अधिकाऱ्याला अटक, महसूल गुप्तचर संचालनालयाची धडक कारवाई
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
