भाजप-शिंदेंचे लोक एकमेकांची धुलाई करताय; संजय राऊतांचा खळबळजनक दावा
संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत मराठी अस्मितेवर होत असलेल्या कथित हल्ल्यावरून महायुतीवर जोरदार टीका केली. त्यांनी देवंद्र फडणवीस यांच्या हिंदी भाषणांवर आणि भाजपच्या नवी मुंबईतील हिंदी शक्तीच्या जाहीरनाम्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच, गौतम अदानींशी संबंधित धोरणे आणि निवडणुकीतील पैसे वाटप तसेच बोगस मतदारांवरही राऊत यांनी गंभीर आरोप केले.
संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत महायुती सरकारवर अनेक गंभीर आरोप केले. मराठी भाषा आणि अस्मितेच्या मुद्द्यावरून त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले. फडणवीस यांनी हिंदीमध्ये भाषण केल्याचे आणि भाजपच्या नवी मुंबई जाहीरनाम्यात हिंदी शक्तीचा उल्लेख केल्याचे राऊत यांनी निदर्शनास आणले. महाराष्ट्रात केवळ मराठीची शक्ती राहील असे देवेंद्र फडणवीस वारंवार सांगत असतानाही त्यांची ही भूमिका दुटप्पी असल्याची टीका राऊत यांनी केली.
याशिवाय, राऊत यांनी गौतम अदानींशी संबंधित धोरणांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मुंबई विमानतळाचा भूखंड अदानींना देण्याचा आणि धारावी पुनर्विकास प्रकल्पात अदानींना मोठ्या सवलती देण्याचा आरोप त्यांनी केला. निवडणुकीतील गैरव्यवहारांवर बोलताना, भाजप आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते एकमेकांना पैसे वाटण्यावरून मारहाण करत असल्याचा दावा राऊत यांनी केला. ठाकरे बंधूंनी घेतलेल्या सभा यशस्वी झाल्या असून, मराठी मतदारांमध्ये जागृती झाल्याचेही त्यांनी सांगितले.
भाजप-शिंदेंचे लोक एकमेकांची धुलाई करताय; संजय राऊतांचा खळबळजनक दावा
हिंदी-मराठी वाद निवडणुकीचा मुद्दा नाही; मैथिली ठाकूरची स्पष्ट भूमिका
पैसे वाटप करण्याआधी यादी व्हायरल! संभाजीनगरचा धक्कादायक व्हिडीओ
नाशिकमध्ये भाजपकडून 54 बंडखोरांची हकालपट्टी

