Dagdu Sakpal : म्हातारा झाल्यावर गरज संपते, ठाकरे सेनेकडून मुलीला तिकीट नाकारताच दगडू सकपाळ संतापले, अश्रू अनावर
उद्धव ठाकरेंकडून मुलीला नगरसेवक पदाची उमेदवारी नाकारल्याने ज्येष्ठ शिवसैनिक दगडू सकपाळ यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पक्षात आपली गरज संपली असून, म्हातारा झाल्यावर माणसाची गरज संपते अशी खंत त्यांनी बोलून दाखवली. १५ वर्षांच्या निष्ठेची दखल न घेतल्याने ते भावुक झाले असून, भविष्यातील राजकीय वाटचालीसंदर्भातही त्यांनी संकेत दिले.
ठाकरेंकडून मुलीला नगरसेवक पदाची उमेदवारी नाकारल्याने ज्येष्ठ शिवसैनिक दगडू सकपाळ यांनी आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली आहे. म्हातारा झाल्यावर माणसाची गरज संपते, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. दगडू सकपाळ यांनी १५ वर्षे पक्षासाठी कोणतीही मागणी न करता काम केले असून, दोन वेळा आमदारकीही सोडली होती. पक्षाने किमान एक फोन करून निर्णय कळवला असता, तरी चालले असते अशी त्यांची भावना आहे. या प्रकारामुळे त्यांना आपली गरज पक्षासाठी संपली असल्याचे वाटत आहे. एकनाथ शिंदे यांनी तब्येतीची विचारपूस करण्यासाठी त्यांच्या घरी भेट दिल्याची आठवण त्यांनी करून दिली. पक्षप्रमुखाचा स्वभाव एखाद्याला मोठे करून अचानक सोडून देण्याचा नसावा, असे मत त्यांनी व्यक्त केले. उद्धव ठाकरेंनी त्यांची दखल न घेतल्याने सकपाळ भावनिक झाले आहेत. बाळासाहेबांचा आदर असल्याने ते ठाकरे कुटुंबावर थेट टीका करणार नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
अंडी-पिल्ली ते बिनदाढीवाला गरूडा..दादा, रोहित पवार अन भाजपमध्ये जुंपली
त्यांचा पत्त्याचा बंगला उलटा, राज ठाकरेंचा रोख कुणावर अन् कुणाला टोला?
म्हातारे झालो म्हणून...'सर्टिफाईड नागपूरकर'ला राऊतांचं प्रत्युत्तर
बॅलेट पेपरवरून राज ठाकरे पुन्हा मैदानात,BJP च्या पराभवाचे पाढेच वाचले

