AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईसाठी प्रकाशित केलेल्या ठाकरे बंधूंच्या वचननाम्यात नेमकं काय?

मुंबईसाठी प्रकाशित केलेल्या ठाकरे बंधूंच्या वचननाम्यात नेमकं काय?

राखी राजपूत
राखी राजपूत | Updated on: Jan 04, 2026 | 3:56 PM
Share

ठाकरे बंधूंनी मुंबईसाठीचा वचननामा प्रकाशित केला आहे. यात शासकीय कर्मचाऱ्यांना घरे, महिलांसाठी स्वाभिमान निधी, मासाहेब किचन्स, स्वच्छतागृहे, पाळणाघरे, स्वयंरोजगार निधी आणि मराठी तरुणांसाठी वसतिगृहे यासारख्या अनेक योजनांचा समावेश आहे. राज ठाकरेंनी महाराष्ट्रातील प्रत्येक शहराचा महापौर मराठीच होणार असे म्हटले आहे.

मुंबईसाठी ठाकरे बंधूंकडून वचननामा प्रकाशित करण्यात आला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 20 वर्षांनी शिवसेना भवनाला भेट देत हा वचननामा सादर केला. या वचननाम्यानुसार, शासकीय, महापालिका, बेस्ट आणि पोलीस कर्मचारी तसेच गिरणी कामगारांना हक्काची घरे दिली जातील. पुढील पाच वर्षांत एक लाख मुंबईकरांना परवडणारी घरे उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट आहे.

याशिवाय, नोंदणीकृत घरकाम करणाऱ्या महिलांना दरमहा 1500 रुपये स्वाभिमान निधी, कोळी आणि मच्छीमार महिलांना अर्थसहाय्य तसेच 10 रुपयांत नाश्ता आणि दुपारचे जेवण देणारी मासाहेब किचन्स सेवा सुरू करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. मुंबईतील प्रत्येक शहराचा महापौर मराठीच होणार अशी भूमिका राज ठाकरे यांनी यावेळी मांडली. मुंबईचा महापौर कायम मराठीच राहील यावर त्यांनी जोर दिला.

Published on: Jan 04, 2026 03:56 PM

Follow Us
मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

Commonwealth Games 2026 स्पर्धा 23 जुलैपासून, 74 देश रणांगणात; भारताचे 126 खेळाडू करणार स्पर्धा.

Commonwealth Games 2026 स्पर्धा 23 जुलैपासून, 74 देश रणांगणात; भारताचे 126 खेळाडू करणार स्पर्धा

घशात अन्न अडकलं अन् अचानक श्वास बंद, प्रसिद्ध अभिनेत्यासोबत भयंकर प्रकार; काय घडलं?.

घशात अन्न अडकलं अन् अचानक श्वास बंद, प्रसिद्ध अभिनेत्यासोबत भयंकर प्रकार; काय घडलं?

पेपरफुटी हा चौकशीचा विषय, सरकार चर्चेसाठी तयार – जे पी नड्डा.

पेपरफुटी हा चौकशीचा विषय, सरकार चर्चेसाठी तयार – जे पी नड्डा