Arvind Sawant : भाजप हा भेकडांचा पक्ष, अरविंद सावंतांनी उदाहणासहीतच सांगितले
भाजपा हा भेकडांचा पक्ष झालेला आहे. मूळ प्रश्न सोडून जनतेची दिशाभूल करण्यासाठी हे सर्व केले जात आहे. याकूब प्रकरण हे 2015 साली झाले आणि आता त्याबद्दल नको त्या चर्चा घडवून आणल्या जात असल्याचा आरोपही सावंत यांनी केला आहे. दरम्यानच्या काळात भाजपाचीच सत्ता होती. त्यावेळीच हे प्रश्न का उपस्थित केले गेले नाहीत असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
मुंबई : (Yakub Memon) याकूब मेमनच्या कबरीवर रोषणाई यावरुन (BJP Party) भाजप आणि शिवसेनेमध्ये आरोप-प्रत्यारोप हे सुरुच आहेत. किशोरी पेडणेकर यांनी तर राज्यपाल आणि याकूबचे काही एकत्रित छायाचित्रेच दाखवले. तर जेव्हा याकूबचे पार्थिव दिले गेले होते तेव्हा का भाजपाला जाग आली नाही. त्यामुळे आपली बाजू मांडण्यात हे कमी पडत असून या प्रकरणी आता भाजपाला भीती वाटू लागली असल्याचे (Arvind Sawant) शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी सांगितले आहे. भाजपा हा भेकडांचा पक्ष झालेला आहे. मूळ प्रश्न सोडून जनतेची दिशाभूल करण्यासाठी हे सर्व केले जात आहे. याकूब प्रकरण हे 2015 साली झाले आणि आता त्याबद्दल नको त्या चर्चा घडवून आणल्या जात असल्याचा आरोपही सावंत यांनी केला आहे. दरम्यानच्या काळात भाजपाचीच सत्ता होती. त्यावेळीच हे प्रश्न का उपस्थित केले गेले नाहीत असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
शशिकांत शिंदेंचा विलीनीकरणावर मोठा दावा; तटकरेंची तीव्र प्रतिक्रिया
विलिनीकरणाला 35 आमदारांचा पाठिंबा? काय म्हणाले सुनील तटकरे?
शिवभोजन थाळी चालकांची चंद्रशेखर बावनकुळेंसमोर जोरदार घोषणाबाजी!
Sunil Tatkare : शशिकांत शिंदेंच्या लेखावर सुनील तटकरेंकडून आक्षेप!

