Nanded News : वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान
Unseasonal Rain : नांदेडमध्ये अचानक वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसाने भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे.
नांदेडमध्ये आलेल्या मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरणाने राज्यात पिकांवर परिणाम होत होता. त्यातच पावसाला देखील सुरुवात झाल्याने यामुळे उन्हाळ पिकांना फटका बसला आहे. मुसळधार पावसाने शेतात पाणी साचलं असल्याने यामुळे नांदेडमध्ये टोमॅटो बागांचं नुकसान झालं आहे. काढणीला आलेले टोमॅटो पावसाच्या तडाख्याने सडले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठं आर्थिक नुकसान सहन करावं लागणार आहे. अवकाळी पावसामुळे टोमॅटो बागांना चांगलाच फटका बसला आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. पूर्ण शेतात पाणी झाल्याने शेतकऱ्यांवर टमाट्याची झाडं उपटून फेकण्याची वेळ आलेली आहे. एकीकडे सरकार कर्जमाफी देत नाही, तर दुसरीकडे पावसाचा कहर, यामुळे बळीराजा संकटात सापडला आहे.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन

