AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Uddhav Thackeray | अजून किती बळी घेतल्यावर धर्मेंद्र प्रधान राजीनामा देणार? सरकारने जाहीर करावं; उद्धव ठाकरेंचा संतप्त सवाल!

Uddhav Thackeray | अजून किती बळी घेतल्यावर धर्मेंद्र प्रधान राजीनामा देणार? सरकारने जाहीर करावं; उद्धव ठाकरेंचा संतप्त सवाल!

| Updated on: Jul 18, 2026 | 12:42 PM
Share

दिल्लीतील जंतरमंतर येथे सुरू असलेल्या सोनम वांगचुक यांच्या आंदोलनावरून शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. सोनम वांगचुक यांना रुग्णालयात दाखल करण्याच्या दिल्ली पोलिसांच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित करत त्यांनी सरकारने आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक हे नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणात कारवाई आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी गेल्या २१ दिवसांपासून जंतरमंतर येथे उपोषण करत होते. प्रकृती खालावल्याने दिल्ली पोलिसांनी त्यांना न्यायालयाच्या निर्देशांनुसार आणि वैद्यकीय सल्ल्यानुसार रुग्णालयात दाखल केले. मात्र, या कारवाईनंतर विरोधकांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका सुरू केली आहे.

दिल्लीतील जंतरमंतर येथे सुरू असलेल्या सोनम वांगचुक यांच्या आंदोलनावरून शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. सोनम वांगचुक यांना रुग्णालयात दाखल करण्याच्या दिल्ली पोलिसांच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित करत त्यांनी सरकारने आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक हे नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणात कारवाई आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी गेल्या २१ दिवसांपासून जंतरमंतर येथे उपोषण करत होते. प्रकृती खालावल्याने दिल्ली पोलिसांनी त्यांना न्यायालयाच्या निर्देशांनुसार आणि वैद्यकीय सल्ल्यानुसार रुग्णालयात दाखल केले. मात्र, या कारवाईनंतर विरोधकांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका सुरू केली आहे.

दरम्यान, नागपुरातील रामरक्षा आंदोलनासाठी दाखल झालेल्या उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधताना सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले, “जर सरकारला सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीची इतकीच चिंता होती, तर त्यांच्याशी आधी चर्चा करायला हवी होती. उपोषण सोडवण्याचा मार्ग संवाद असतो, कारवाई नव्हे.” उद्धव ठाकरे यांनी नीट पेपरफुटी प्रकरणावरही केंद्र सरकारवर टीका करत म्हटले की, “देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी निर्दयीपणे खेळ करण्यात आला आहे. इतक्या गंभीर प्रकरणानंतरही केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा का घेतला जात नाही? सरकारने याचे उत्तर द्यावे.”

दिल्ली पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांनी न्यायालयाच्या आदेशाची प्रत सार्वजनिक करण्याची मागणी केली. “न्यायालयाने नेमका कोणता आदेश दिला होता? उपोषणकर्त्याला जबरदस्तीने रुग्णालयात दाखल करण्याचे निर्देश होते का, हे सरकारने स्पष्ट करावे,” असेही त्यांनी म्हटले. यावेळी त्यांनी अण्णा हजारे यांच्या आंदोलनाचा संदर्भ देत, “यापूर्वी आंदोलने संवादातून संपवली गेली होती. आजही सरकारने दडपशाहीचा मार्ग न स्वीकारता चर्चेचा मार्ग स्वीकारावा,” असे आवाहन केले.

दरम्यान, सोनम वांगचुक यांच्या आंदोलनावरून केंद्र सरकार आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप तीव्र झाले असून, या प्रकरणातील पुढील घडामोडींकडे देशभराचे लक्ष लागले आहे.  

Published on: Jul 18, 2026 12:42 PM

Follow Us
जंतरमंतरवर जाताच अमित ठाकरेंनी वाढवले मोदी सरकारचे टेन्शन…दिल्लीतील आंदोलन देशभर पोहचवण्याची दिली हाक.

जंतरमंतरवर जाताच अमित ठाकरेंनी वाढवले मोदी सरकारचे टेन्शन…दिल्लीतील आंदोलन देशभर पोहचवण्याची दिली हाक

सिया आणि सोनमपेक्षाही खतरनाक… झोपेच्या गोळ्या, नंतर चादरीत घुसवला साप, अंगावर काटा येणारं हत्याकांड; बायको बनली हैवान.

सिया आणि सोनमपेक्षाही खतरनाक… झोपेच्या गोळ्या, नंतर चादरीत घुसवला साप, अंगावर काटा येणारं हत्याकांड; बायको बनली हैवान

Sonam Wangchuk : खरचं मानलं पाहिजे, सोनम वांगचूक यांची लोकांच्या फायद्याची तीन जबरदस्त इनोवेशन्स, सायन्सने समाज बदलण्याची जिद्द.

Sonam Wangchuk : खरचं मानलं पाहिजे, सोनम वांगचूक यांची लोकांच्या फायद्याची तीन जबरदस्त इनोवेशन्स, सायन्सने समाज बदलण्याची जिद्द

Vikram 1 Launch : ऐतिहासिक आणि अभिमानाचा क्षण, भारताच्या पहिल्या खासगी रॉकेटमधून उपग्रहांचं यशस्वी लॉन्चिंग.

Vikram 1 Launch : ऐतिहासिक आणि अभिमानाचा क्षण, भारताच्या पहिल्या खासगी रॉकेटमधून उपग्रहांचं यशस्वी लॉन्चिंग

अभिमान वाटावा असंच… नीटमध्ये महाराष्ट्राची कन्या मुलींमध्ये देशात पहिली, कोण आहे श्रावणी कुदळे?.

अभिमान वाटावा असंच… नीटमध्ये महाराष्ट्राची कन्या मुलींमध्ये देशात पहिली, कोण आहे श्रावणी कुदळे?

‘आमचा जीव कसा लागणार?’ अभिजीत दीपकेंची आमरण उपोषणाची घोषणा, आई-वडिलांनी सरकारला सुनावले काय?.

‘आमचा जीव कसा लागणार?’ अभिजीत दीपकेंची आमरण उपोषणाची घोषणा, आई-वडिलांनी सरकारला सुनावले काय?