शिवरायांच्या पुतळ्यावरुन वाद चिखला गावात संचारबंदी !
बुलडाणा जिल्ह्यातील चिखला गावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनधिकृत पुतळ्यावरून झालेल्या वादामुळे संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या प्रकरणी सरपंच गणेश काकड यांच्यासह २३ जणांना अटक करण्यात आली असून, ४० हून अधिक जणांवर गुन्हे दाखल आहेत. गावात तणावपूर्ण शांतता असून, पोलिसांचा कडक बंदोबस्त आहे. पुतळा हटवण्याच्या आदेशावरून दोन गटांमध्ये संघर्ष सुरू आहे.
बुलडाणा जिल्ह्याच्या चिखला गावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून झालेल्या वादामुळे तणाव निर्माण झाला असून, संचारबंदी लागू करण्यात आली आहे. विनापरवानगी ग्रामपंचायतीच्या जागेवर पुतळा बसवल्याने दोन गटांत संघर्ष झाला. या प्रकरणी आतापर्यंत सरपंच गणेश काकड यांच्यासह २३ जणांना अटक करण्यात आली आहे, तर ४० हून अधिक जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १६५ नुसार गावात संचारबंदी लागू आहे.
४ फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास अंगणवाडीसमोर अनधिकृतपणे हा पुतळा बसवण्यात आला होता. ५ फेब्रुवारी रोजी पोलीस प्रशासनाने महसूल विभागाला पुतळा हटवण्याबाबत अहवाल दिला, त्यानंतर लोणारच्या तहसीलदारांनी पुतळा हटवण्याचे आदेश दिले. मात्र, या आदेशाला एका गटाने तीव्र विरोध दर्शवला असून, पुतळा हटवल्यास शेवटच्या श्वासापर्यंत लढा देण्याची भूमिका घेतली आहे. सध्या चिखला गावात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
शिवरायांच्या पुतळ्यावरुन वाद चिखला गावात संचारबंदी !
पवार राज्यसभेवर गेल्यास ठाकरेंचा फायदा, काँग्रेसचं नुकसान?
काहींनी भन्नाट किस्से सांगितले, काही... दादांच्या आठवणींनी सर्वच भावूक
वादळी पावसामुळे लातूरमधील अनेक गावं अंधारात; पिकांचेही नुकसान

