India – Pakistan Conflict : भारत-पाकिस्तान वादात संयुक्त राष्ट्रसंघाची मध्यस्थी
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान या दोन्ही देशात तणाव वाढला आहे. हा तणाव शांत करण्यासाठी आता यूएनकडून मध्यस्थी करण्यात आल्याचं समजतं आहे.
संयुक्त राष्ट्रसंघाकडून भारत आणि पाकिस्तानमध्ये मध्यस्थीचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. संयुक्त राष्ट्राच्या महासचिवांकडून पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जेशनकर यांच्याशी त्यांनी चर्चा केलेली आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध व्यक्त करत यूएनने संघर्ष टाळण्याचं आवाहन केलेलं आहे.
संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासचिवांनी दोन्ही देशांच्या प्रमुख नेत्यांशी चर्चा केलेली आहे. भारत पाकिस्तानने संघर्ष टाळावा असं मत संयुक्त राष्ट्रसंघाने व्यक्त केलं आहे. तर हल्ल्याला जबाबदार असणाऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी अशी भूमिका भारताने देखील घेतलेली असल्याचं समजत आहे.
Published on: Apr 30, 2025 09:11 AM
Latest Videos
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक

