Nashik | Malegaon | हवामानाच्या लहरीपणामुळे शेती उद्ध्वस्त; नाशिक-मालेगावात कांद्याचं मोठं नुकसान
राज्यातील बदलत्या हवामानामुळे शेतकऱ्यांपुढे मोठं संकट उभं ठाकलं आहे. एकीकडे अवकाळी पाऊस, तर दुसरीकडे कडाक्याचं ऊन आणि निसर्गातील असमतोल याचा थेट परिणाम शेतीवर होत आहे. विशेषतः कांदा उत्पादक शेतकरी सध्या गंभीर अडचणीत सापडले आहेत. नाशिक आणि मालेगाव परिसरात झालेल्या अवकाळी पावसासह गारपिटीमुळे कांद्याचं मोठं नुकसान झालं आहे.
राज्यातील बदलत्या हवामानामुळे शेतकऱ्यांपुढे मोठं संकट उभं ठाकलं आहे. एकीकडे अवकाळी पाऊस, तर दुसरीकडे कडाक्याचं ऊन आणि निसर्गातील असमतोल याचा थेट परिणाम शेतीवर होत आहे. विशेषतः कांदा उत्पादक शेतकरी सध्या गंभीर अडचणीत सापडले आहेत. नाशिक आणि मालेगाव परिसरात झालेल्या अवकाळी पावसासह गारपिटीमुळे कांद्याचं मोठं नुकसान झालं आहे. जोरदार पावसामुळे पिकं अक्षरशः झोडपली गेली, तर गारपिटीमुळे कांद्याची वाढ खुंटली आहे. अपेक्षित उत्पादन मिळण्याऐवजी पिकांची अवस्था बिकट झाल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. सध्याच्या परिस्थितीत मिळणाऱ्या उत्पादनातून फक्त खर्चही निघणं कठीण असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आर्थिक संकट अधिकच गडद होत आहे. दरम्यान, शासनाकडून ठोस मदत मिळत नसल्याची नाराजी शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. “फक्त आश्वासनं दिली जात आहेत, प्रत्यक्ष मदत मिळत नाही,” अशी तक्रार शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
हवामानाच्या लहरीपणामुळे शेती उद्ध्वस्त; नाशिकमध्ये कांद्याचं नुकसान
छगन भुजबळ यांचं मोठं विधान, 'सुनेत्रा पवार मुख्यमंत्री होतील पण हे...
महिला आरक्षणावरून अंधारेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल
उद्धव ठाकरेंचं पश्चिम बंगाल निवडणूकीबाबत मोठं विधान

