Nashik | Malegaon | हवामानाच्या लहरीपणामुळे शेती उद्ध्वस्त; नाशिक-मालेगावात कांद्याचं मोठं नुकसान
राज्यातील बदलत्या हवामानामुळे शेतकऱ्यांपुढे मोठं संकट उभं ठाकलं आहे. एकीकडे अवकाळी पाऊस, तर दुसरीकडे कडाक्याचं ऊन आणि निसर्गातील असमतोल याचा थेट परिणाम शेतीवर होत आहे. विशेषतः कांदा उत्पादक शेतकरी सध्या गंभीर अडचणीत सापडले आहेत. नाशिक आणि मालेगाव परिसरात झालेल्या अवकाळी पावसासह गारपिटीमुळे कांद्याचं मोठं नुकसान झालं आहे.
राज्यातील बदलत्या हवामानामुळे शेतकऱ्यांपुढे मोठं संकट उभं ठाकलं आहे. एकीकडे अवकाळी पाऊस, तर दुसरीकडे कडाक्याचं ऊन आणि निसर्गातील असमतोल याचा थेट परिणाम शेतीवर होत आहे. विशेषतः कांदा उत्पादक शेतकरी सध्या गंभीर अडचणीत सापडले आहेत. नाशिक आणि मालेगाव परिसरात झालेल्या अवकाळी पावसासह गारपिटीमुळे कांद्याचं मोठं नुकसान झालं आहे. जोरदार पावसामुळे पिकं अक्षरशः झोडपली गेली, तर गारपिटीमुळे कांद्याची वाढ खुंटली आहे. अपेक्षित उत्पादन मिळण्याऐवजी पिकांची अवस्था बिकट झाल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. सध्याच्या परिस्थितीत मिळणाऱ्या उत्पादनातून फक्त खर्चही निघणं कठीण असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आर्थिक संकट अधिकच गडद होत आहे. दरम्यान, शासनाकडून ठोस मदत मिळत नसल्याची नाराजी शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. “फक्त आश्वासनं दिली जात आहेत, प्रत्यक्ष मदत मिळत नाही,” अशी तक्रार शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
Published on: Apr 21, 2026 03:58 PM
महाराष्ट्रतील देवस्थान जमिनीबाबत सरकारचं मोठं पाऊल, तो निर्णय स्थगित,
भाजपला मोठा धक्का; महिला शहराध्यक्षांसह संपूर्ण कार्यकारिणीचा राजीनामा
राग आला थेट नाल्यात उतरले, मनसेच्या त्या आंदोलनाची तुफान चर्चा
सुप्रिया सुळेंचा सर्वात मोठा निर्णय, घोडेबाजार रोखण्यासाठी आणणार......

