Vijay Wadettiwar : शेतकरी नुकसान अन् अतिवृष्टीवरील चर्चेसाठी विशेष अधिवेशन होणार? वडेट्टीवारांचं राज्यपालांना काय पत्र?
विजय वडेट्टीवार यांनी महाराष्ट्रातील अतिवृष्टी आणि शेतकरी नुकसानीच्या गंभीर स्थितीवर चर्चा करण्यासाठी विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी केली आहे. त्यांनी राज्यपालांना यासंदर्भात पत्र लिहिले असून, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर धोरणात्मक निर्णय घेण्याची आवश्यकता वडेट्टीवार यांनी अधोरेखित केली आहे.
काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी महाराष्ट्रातील अतिवृष्टी आणि यामुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीवर चर्चा करण्यासाठी विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी केली आहे. त्यांनी याबाबत राज्यपालांना पत्र लिहिले आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये, विशेषतः मराठवाडा, जालना, सोलापूर, रायगड, कोल्हापूर, मुंबई, बीड, परभणी, धुळे, नाशिक, नांदेड आणि धाराशिव या भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने शेतीत मोठे नुकसान झाले आहे. या गंभीर परिस्थितीवर विधिमंडळात चर्चा होऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर धोरणात्मक निर्णय घेण्यात यावा, अशी वडेट्टीवार यांची भूमिका आहे.
या विशेष अधिवेशनामुळे पूरग्रस्त आणि अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तातडीने उपाययोजना करता येतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे आणि त्यांना मदत लवकरात लवकर मिळावी यासाठी हा राजकीय प्रयत्न महत्त्वाचा मानला जात आहे.
विधान परिषद जागावाटपावरून महायुतीत धुसफूस; दिल्ली-पासून मुंबईपर्यंत...
NEET पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेट! CBI च्या झडतीत धक्कादायक खुलासा
तू मागच्या जन्मी नागिण होतीस! म्हणत अल्पवयीन मुलीला जाळ्यात ओढलं? अन्
12 दिवसांत चौथ्यांदा CNG महागलं! इंधन दरवाढीने सर्वसामान्यांचे कंबरडंच
