AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“शेतकऱ्यांची थट्टा चालवली आहे, सरकारमध्ये आहात सूचना काय देता, अंमलबजावणी करा”

महाराष्ट्रात एकीकडे सत्तास्थापनेवरुन रस्सीखेच सुरू आहे, तर दुसरीकडे अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे बेसुमार हाल होत आहेत. यावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ नेते अजित पवार (Ajit Pawar on Farmer issue) यांनी सरकारला लक्ष्य केले आहे.

शेतकऱ्यांची थट्टा चालवली आहे, सरकारमध्ये आहात सूचना काय देता, अंमलबजावणी करा
| Updated on: Nov 02, 2019 | 6:14 PM
Share

मुंबई: महाराष्ट्रात एकीकडे सत्तास्थापनेवरुन रस्सीखेच सुरू आहे, तर दुसरीकडे अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे बेसुमार हाल होत आहेत. यावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ नेते अजित पवार (Ajit Pawar on Farmer issue) यांनी सरकारला लक्ष्य केले आहे. राज्यात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असताना फडणवीस सरकार 10 हजार कोटींची मदत देत आहे. ही अगदी तुटपुंजी मदत आहे, असं मत अजित पवार (Ajit Pawar on Farmer issue) यांनी व्यक्त केलं.

अजित पवार म्हणाले, “राज्यभरात अवकाळी पावसाने नुकसान केलं आहे. त्यामुळे ही मदत कशालाही पुरणार नाही. सरकारने शेतकऱ्यांची थट्टा चालवली आहे. ते सरकारमध्ये आहेत सूचना काय देत आहेत. त्यांनी थेट अंमलबजावणी करावी. नवीन सरकार येऊपर्यंत काळजीवाहू सरकार म्हणून त्यांची जबाबदारी आहे. असं बोलून त्यांनी कातडी बचाव भूमिका घेऊ नये.”

जनतेचा कौल भाजप-शिवसेनेला मिळाला आहे. त्यामुळे त्यांनी तात्काळ निर्णय घ्यावा. शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी करावी, अशीही मागणी अजित पवारांनी केली. यावेळी अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे नेते आपआपल्या भागात झालेल्या नुकसानीची पाहणी करत असल्याचीही माहिती दिली. ते म्हणाले, “शरद पवार यांनी नाशिकमधील अनेक तालुक्यांचा दौरा केला आहे. आमचे इतर नेतेही आपआपल्या भागातील दौरा करत आहेत.”

“आत्तापर्यंत अनेकदा शेतीचं नुकसान पाहिलं, मात्र इतकं कधीच झालेलं नाही”

अजित पवार यांनी यावेळी अवकाळी पावसाने झालेलं संपूर्ण राज्यभरातील नुकसान प्रचंड असल्याचं म्हटलं आहे. ते म्हणाले, “मी सातव्यांदा आमदार झालो. आत्तापर्यंत अनेकदा शेतीचं नुकसान पाहिलं. मात्र, यावेळी जितकं नुकसान झालं, तितकं कधीच झालं नव्हतं. शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास गेला. जनावारांना चाराही राहिला नाही. एकही असं पीक नाही ज्याचं या अवकाळी पावसाने नुकसान झालं नाही. रोगराई पसरत आहे. याची जाण आत्ताच्या राज्यकर्त्यांना नाही. ती त्यांना असायला हवी. आत्तापर्यंत तात्पुरती स्थिती समोर आली असून अजून मोठं नुकसान समोर येणं बाकी आहे.”

Follow Us
लिंगपिसाट खरातला घाम फोडणारी बातमी, बडा मासा ईडीच्या जाळ्यात; थेट धाड
लिंगपिसाट खरातला घाम फोडणारी बातमी, बडा मासा ईडीच्या जाळ्यात; थेट धाड.
बारामती पोटनिवडणूक: काटेवाडीत सुनेत्रा पवारांसह पवार कुटुंबाचे मतदान
बारामती पोटनिवडणूक: काटेवाडीत सुनेत्रा पवारांसह पवार कुटुंबाचे मतदान.
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा.
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?.
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल.
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?.
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?.
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...