AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुख्यमंत्रिपद नाही, पण ‘रिमोट कंट्रोल’, भाजपचा शिवसेनेला नवा पर्याय?

सुकाणू समितीचं अध्यक्षपद उद्धव ठाकरे यांना सोपवण्याचा प्रस्ताव भाजपने सेनेसमोर ठेवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मुख्यमंत्रिपद नाही, पण 'रिमोट कंट्रोल', भाजपचा शिवसेनेला नवा पर्याय?
| Updated on: Nov 07, 2019 | 9:44 AM
Share

मुंबई : महाराष्ट्राच्या सत्तेच्या चाव्या नाही, पण ‘रिमोट कंट्रोल’ सोपवून भाजप शिवसेनेची मनधरणी करणार का, असा सवाल उपस्थित होत आहे. कारण मुख्यमंत्रिपद नाही, परंतु सुकाणू समितीचं अध्यक्षपद शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सोपवण्याचा प्रस्ताव भाजपने सेनेसमोर (BJP offer to Shivsena) ठेवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

शिवसेना मुख्यमंत्रिपदाच्या मागणीवर अडून बसलेली आहे. सत्तास्थापनेचा जादुई आकडा गाठण्यात भाजपला अपयश आलेलं आहे. अपक्षांच्या पाठिंब्यानेही भाजपला खुर्ची मिळवण्याची जादू करणं मुश्किल आहे. त्यामुळे शिवसेनेच्या नाकदुऱ्या काढण्यावाचून कोणताच पर्याय भाजपसमोर दिसत नाही.

मुख्यमंत्रिपदासह सर्व पदं आणि जबाबदाऱ्यांचं समसमान वाटप ही शिवसेनेची मागणी कायम आहे. मात्र त्यावर उतारा म्हणून सुकाणू समितीचं अध्यक्षपद टेकवून सेनेची बोळवण करण्याचा भाजपचा इरादा आहे. आता भाजपच्या ऑफरला (BJP offer to Shivsena) शिवसेना कशाप्रकारे प्रतिसाद देते, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

ज्याप्रमाणे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे सत्तेचा रिमोट कंट्रोल होता, त्याचप्रमाणे उद्धव ठाकरेंना सुकाणू समितीचे सर्वाधिकार मिळण्याची शक्यता आहे. सोनिया गांधींकडे यूपीएची जी जबाबदारी आहे, त्याला समकक्ष असं सुकाणू समितीचं अध्यक्षपद मानलं जातं. त्यामुळे मुख्यमंत्रिपद नाही, परंतु सुकाणू समितीचं नेतृत्व सोपवण्याचा पर्याय भाजप सेनेला देण्याची चिन्हं आहेत.

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात ‘मातोश्री’वर सकाळी साडेअकरा वाजता शिवसेनेच्या आमदारांची बैठक होणार आहे. या बैठकीत उद्धव ठाकरे सर्व आमदारांचं मत आजमावून पाहणार आहेत. बैठकीमध्ये शिवसेना पुढील राजकीय वाटचाल ठरवणार असल्यामुळे फक्त सेनाच नाही, तर भाजपचे डोळेही या बैठकीकडे लागून राहिले आहेत.

दुसरीकडे, साधारण त्याच वेळी चंद्रकात पाटील, सुधीर मुनगंटीवार आणि आशिष शेलार हे भाजपचे ज्येष्ठ नेते राजभवनात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार होते. भाजप नेत्यांनी सकाळी साडेदहा वाजता राज्यपालांच्या भेटीची वेळ मागितली होती. मात्र आता ही वेळ बदलून दुपारी दोन वाजताची करण्यात आलेली आहे.

शिवसेना आमदारांच्या बैठकीमुळे भाजपने ‘वेळ’ बदलली?

शिवसेना बैठकीत काय निर्णय घेते, कोणती रणनीती ठरवते, त्यानुसार भाजप पावलं टाकणार असल्याचं दिसत आहे. त्यामुळेच भाजपने राज्यपालांच्या भेटीची उशिराची वेळ बदलून घेतल्याचं म्हटलं जातं. या भेटीनंतर सुधीर मुनगंटीवार पत्रकार परिषद घेऊन तपशील सांगणार आहेत.

आमदारांची पंचतारांकित सोय

दरम्यान, बैठकीनंतर शिवसेनेचे सर्व आमदार एकत्रित ट्रायडेंट या पंचतारांकित हॉटेलमध्ये राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आमदारांमध्ये फूट पडू नये यासाठी यासाठी ही पावलं उचलण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

कर्नाटकमध्ये सत्ता स्थापनेदरम्यान अशाचप्रकारे सर्व आमदारांना मुंबईच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये एकत्रित ठेवण्यात आलं होते. शिवसेना आमदारांचा कोणत्याही इतर पक्षासोबत संपर्क होऊ नये, यासाठी हीच रणनीती शिवसेनेकडून वापरली जात असल्याचं दिसत आहे.

मुनगंटीवार सारखे ‘गोड बातमी’ म्हणतात, कोणी बाळंत होणार आहे का? : सामना

भाजपला पाठिंबा दिलेले अपक्ष आमदार रवी राणा यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे 25 आमदार आमच्या संपर्कात आहेत, असा दावा केला होता. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून शिवसेनेने ही पावलं उचल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

BJP offer to Shivsena

Follow Us
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल.
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?.
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?.
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.