AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राष्ट्रपती राजवट लागू, आता पुढे काय?

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या स्वाक्षरीसह महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. त्यामुळे यापुढील कारभार कसा (What after President rule) चालणार याविषयी अनेकांना प्रश्न पडला आहे.

राष्ट्रपती राजवट लागू, आता पुढे काय?
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Nov 12, 2019 | 6:20 PM
Share

मुंबई: राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या स्वाक्षरीसह महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. त्यामुळे यापुढील कारभार कसा (What after President rule) चालणार याविषयी अनेकांना प्रश्न पडला आहे. तसेच आता सत्तास्थापन होणार की थेट मध्यावधी निवडणूक होणार असाही प्रश्न (What after President rule) विचारला जात आहे. त्यावर घटनातज्ज्ञांनी कायदेशीर बाजू स्पष्ट केली आहे. राष्ट्रपती राजवटीत राज्याचा कारभार राज्यपाल पाहतील.

राज्य कारभार चालवण्यासाठी राष्ट्रपती, केंद्रीय मंत्रिमंडळ आणि राज्यपाल यांच्या चर्चेनंतर 3 सनदी अधिकाऱ्यांची नेमणूक केली जाईन. हे सनदी अधिकारी राज्यपालांचे सल्लागार म्हणून काम करतील. राष्ट्रपती राजवटीचा अधिकाधिक कालावधी 6 महिन्यांपर्यंत असू शकेल. त्यानंतर हा काळ कायदेशीर प्रक्रियांच्या मान्यतेनंतर वाढवता देखील येईन. याव्यतिरिक्त राज्यपाल सत्तास्थापनेची कोणतीही शक्यता दिसत नसल्यास मध्यावधी निवडणुकांचीही घोषणा करु शकतील.

कायदेतज्ज्ञ असिम सरोदे म्हणाले, “अत्यंत चुकीच्या पद्धतीने राष्ट्रपती राजवट लावण्यात आली आहे. उत्तराखंडमध्ये देखील भाजपची पार्श्वभूमी असलेल्या राज्यपालांनी राष्ट्रपती राजवट लावली होती. त्याला आव्हान देण्यात आलं होतं. सर्वोच्च न्यायालयाने ही राष्ट्रपती राजवट चुकीच्या पद्धतीने लावल्याचं म्हणत ही राष्ट्रपती राजवट रद्द केली होती. तसाच काहीसा प्रकार महाराष्ट्राच्या बाबतही होऊ शकतो.”

आम्ही निवडून दिलेले आमदार आता बरखास्त झाले का? असाही प्रश्न नागरिकांना पडला आहे. मात्र, जोपर्यंत विधानसभा बरखास्त करण्यात आल्याचं जाहीर होत नाही, तोपर्यंत विधानसभा स्थगित आहे, असं समजलं जाईन. त्यामुळे संबंधित आमदारांचं विधानसभा सदस्यत्व कायम राहिल. दरम्यान, कोणत्याही पक्षाने बहुमत सिद्ध करण्याबाबत इच्छा व्यक्त केली, तर त्यांना सत्तास्थापन करता येईन. त्याचा विचार राज्यपालांना करावा लागेल, असंही सरोदे यांनी नमूद केलं.

राष्ट्रपती राजवट आणि महाराष्ट्र (What is President’s rule)

  • महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट दोनवेळा लावण्यात आली होती.
  • महाराष्ट्रात पहिल्यांदा 1980 मध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.
  • त्यावेळी शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील पुलोद सरकार बरखास्त करण्यात आले होते. बरखास्तीनंतर विधानसभेच्या निवडणुका घेण्यात आल्या.
  • त्यावेळी महाराष्ट्रात 17 फेब्रुवारी 1980 ते 9 जून 1980 पर्यंत राष्ट्रपती शासन लागू करण्यात आले होते.
  • महाराष्ट्रात दुसऱ्यांदा 2014 मध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली.
  • 2014 मध्ये 32 दिवसांसाठी अर्थात 28 सप्टेंबर 2014 ते 31 ऑक्टोबर 2014 या काळात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.
  • त्यानंतर देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखालील नवं सरकार सत्तेवर येईपर्यंत राष्ट्रपती राजवट लागू होती.

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
पेपरफुटी हा चौकशीचा विषय, सरकार चर्चेसाठी तयार – जे पी नड्डा.

पेपरफुटी हा चौकशीचा विषय, सरकार चर्चेसाठी तयार – जे पी नड्डा

Naimisha Pradhan : धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीने केलं इन्स्टाग्राम खातं बंद, प्रचंड ट्रोलिंगमुळे तडकाफडकी निर्णय!.

Naimisha Pradhan : धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीने केलं इन्स्टाग्राम खातं बंद, प्रचंड ट्रोलिंगमुळे तडकाफडकी निर्णय!

इंग्लंड दौऱ्यात छोट्या भावाकडून पराभव, झिम्बाब्वेत मोठ्या भावाची भीती! श्रेयसचं टेन्शन वाढलं.

इंग्लंड दौऱ्यात छोट्या भावाकडून पराभव, झिम्बाब्वेत मोठ्या भावाची भीती! श्रेयसचं टेन्शन वाढलं

मोठी बातमी! …तर सोनम वागंचूक आजच उपोषण मागे घेणार, मोठी घोषणा, सरकारसमोर दोन अटी, रुग्णालयातून पहिला व्हिडीओ.

मोठी बातमी! …तर सोनम वागंचूक आजच उपोषण मागे घेणार, मोठी घोषणा, सरकारसमोर दोन अटी, रुग्णालयातून पहिला व्हिडीओ

मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा.

मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी.

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी