AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ह्रदय पिळवटून टाकणारं चित्रं, महाराष्ट्रातला गारठा मुक्या प्राण्यांच्या जीवावर, कोकरांच्याही शेवटच्या घटका

हातावर पोट असणारे मेंढपाळ मेंढ्या चारण्यासाठी वणवण भटकत असतात. दिसेल त्या पडिक क्षेत्रावर संसार थाटायचा आणि मेंढ्यांचा सांभाळ करुन कुटूंबाचा उदरनिर्वाह. सध्याच्या प्रतिकूल वातावरणामध्येही मेंढपाळाचा हाच नित्यक्रम. मात्र, नियतीला त्याचे हे कष्टही मान्य नव्हते की काय असाच प्रकार अहमदनगर जिल्ह्यातील संगमेन तालुक्यातील नांदुर आणि खंदरमाळ परिसरात घडला आहे.

ह्रदय पिळवटून टाकणारं चित्रं, महाराष्ट्रातला गारठा मुक्या प्राण्यांच्या जीवावर, कोकरांच्याही शेवटच्या घटका
वातावरणात गारठा वाढल्याने अहमदनगर जिल्ह्यात 20 मेंढ्यांचा मृत्यू
| Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Dec 02, 2021 | 2:12 PM
Share

अहमदनगर : हातावर पोट असणारे मेंढपाळ मेंढ्या चारण्यासाठी वणवण भटकत असतात. दिसेल त्या पडिक क्षेत्रावर संसार थाटायचा आणि मेंढ्यांचा सांभाळ करुन कुटूंबाचा उदरनिर्वाह. सध्याच्या प्रतिकूल वातावरणामध्येही मेंढपाळाचा हाच नित्यक्रम. मात्र, नियतीला त्याचे हे कष्टही मान्य नव्हते की काय असाच प्रकार अहमदनगर जिल्ह्यातील संगमेन तालुक्यातील नांदुर आणि खंदरमाळ परिसरात घडला आहे. वातावरणात वाढलेल्या गारठ्यामुळे एका मेंढपाळाच्या तब्बल 20 मेंढ्यांचा मृत्यू झाला आहे तर कोकरेही आता अखेरच्या घटका मोजत आहेत. निसर्गाची अवकृपा बळीराजावर तर यापूर्वीच झाली आहे पण आता शेती व्यवसयाशी निगडीत असलेल्यांवर देखील याचा परिणाम होत आहे.

जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील नांदुर आणि खंदरमाळ परिसरात विसावा घेतलेल्या मेंढपाळाच्या बाबतीत ही दुर्देवी घटना घडलेली आहे. यामध्ये मेंढपाळाचे लाखोंचे नुकसान झाले आहे. अचानक वाढलेल्या गारठ्यामुळे ही घटना घडली असून आता आर्थिक मदतीची मागणी होत आहे.

चारण्यासाठी मेंढपाळाची भटकंती

मेंढपाळांना शेतजमिन नसतेच. त्यामुळे मेंढ्या चारण्यासाठी त्यांची भटकंती ही ठरलेली आहे. त्यानुसार अहमदनगर जिल्ह्यातील साकुर पठार भागातील मांडवे, शिंदोडी आदी गावातील मेंढपाळ आपल्या मेंढ्या चारणीसाठी पुणे जिल्हयात घेऊन गेले होते. एकदा गेले की पंधरा-पंधरा दिवस मुक्काम हा त्या ठिकाणीच असतो. चारणी करुन गावी परतत असताना हे मेंढपाळ मुक्कामासाठी ते नांदुर खंदरमाळ परिसरात थांबले होते परंतु गेल्या दोन दिवसांपासून पडत असलेला अवकाळी पाऊस तसेच हवेत वाढलेला गारवा यामध्येच तब्बल 20 मेंढ्याचा जागीच मृत्यू झाला आहे.

सकाळचे चित्र पाहून मेंढपाळाचा डोक्यालाच हात

गेल्या दोन दिवसांपासून थंडीत वाढ झाली आहे. असे असतानाही आमचाच संसार उघड्यावर तर तिथे जनावरांची काय सोय. त्यामुळे मेंढ्या ह्या झोपडीबाहेरत बांधलेल्या असल्याचे मेंढपाळाने सांगितले. मात्र, सकाळी उठून पाहिले तर एक नाही दोन नाही तर 20 लहान-मोठ्या मेंढ्या ह्या गारठ्याने मृत्युमूखी पडलेल्या होत्या. त्यामुळे काय करावे याचेही भान राहिले नाही. कोकरं ही आडोशाला होती. मात्र, ते ही आता शेवटच्या घटका मोजत आहेत. न भरुन निघणारे नुकसान झाले असून आर्थिक मदतीची मागणी या मेंढपाळांनी केलेली आहे.

पशूवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून पंचनामा

शक्यतो थंडीचा परिणाम हा मेंढ्यावर होत नाही पण गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात गारठा प्रचंड वाढलेला आहे. त्यामुळे मेंढ्यांचा मृत्यू झाला आहे. सदरील घटनेचा पंचनामा करण्यात आला असल्याचे पशूवैद्यकीय अधिकारी बी.एम खुटाळ यांनी सांगितले आहे. त्यामुळे आता आर्थिक मदत मिळेल अशी आशा मेंढपाळांना आहे.

संबंधित बातम्या :

पश्चिम महाराष्ट्रात अवकाळीमुळे रब्बी पिकांसह फळबागाही उध्वस्त, नुकसानभरपाईच्या मागणीचा जोर

सहा महिने साठवूनही उन्हाळी कांद्याच्या दरात घसरणच, काय आहेत कारणे?

अवकाळीनंतर ‘असे’ करा फळबागांचे व्यवस्थापन, काय आहे कृषितज्ञांचा सल्ला?

Follow Us
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून...
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून....
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न.
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट...
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट....
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत.
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र....
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.