एरंडोल बाजार समितीच्या एका निर्णय अन् शेतकऱ्यांच्या दोन शेती पिकांचा फायदा, वाचा सविसतर

यांत्रिकिकरणाचा उपयोग, योग्य नियोजन यामधून शेती उत्पादनात वाढ होत आहे. मात्र, वाढत्या उत्पादनाला योग्य दर मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांची परवड होत आहे. कवडीमोल दरामध्ये शेतीमालाची विक्री करण्याची नामुष्की शेतकऱ्यांवर येत आहे. शेतकऱ्यांच्य याच पडत्या बाजूंचा विचार करुन जिल्ह्यातील एरंडोल येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने ज्वारी आणि मक्याला हमीभाव देण्याचा निर्णयच घेतला नाही तर तो अंमलातही आणला आहे.

एरंडोल बाजार समितीच्या एका निर्णय अन् शेतकऱ्यांच्या दोन शेती पिकांचा फायदा, वाचा सविसतर
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Jan 01, 2022 | 2:05 PM

नाशिक : यांत्रिकिकरणाचा उपयोग, योग्य नियोजन यामधून (Farm Production) शेती उत्पादनात वाढ होत आहे. मात्र, वाढत्या उत्पादनाला योग्य दर मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांची परवड होत आहे. कवडीमोल दरामध्ये शेतीमालाची विक्री करण्याची नामुष्की शेतकऱ्यांवर येत आहे. शेतकऱ्यांच्य याच पडत्या बाजूंचा विचार करुन जिल्ह्यातील एरंडोल येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने ज्वारी आणि मक्याला (Guarantee for agricultural produce) हमीभाव देण्याचा निर्णयच घेतला नाही तर तो अंमलातही आणला आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना हमीभावाचा मोठा आधार मिळत आहे. गेल्या 15 दिवसांपासून नोंदणी सुरु होती तर आता प्रत्यक्ष खरेदी केंद्राला सुरवात झाली आहे.

ज्वारी, मक्याला असा आहे हमीभाव

ज्वारीच्या क्षेत्रात घट होत असली तरी नाशिक जिल्ह्यातील एरंडोल तालुका आणि परिसरात ज्वारीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. धरणगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची एरंडोल येथे उपसमिती आहे. याच समितीमध्ये ज्वारीला 2 हजार 738 एवढा तर मकाला 1 हजार 870 रुपये प्रति क्विंटल असा हमीभाव देण्यात आला आहे. ज्वारी, मक्याच्या खरेदीला प्रत्.क्षात सुरवात झाली असून शेतकऱ्यांनी काळवंडलेला माल खरेदी केंद्रावर आणू नये असे आवाहन करण्यात आले आहे. हमी भावासाठी शेतकरी संघाने पुढाकार घेतला असून आ. चिमराव पाटील यांनीही खरेदी केंद्र उभारण्यासाठी मदत केली आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या मालाला योग्य दर मिळणार आहे.

ऑनलाईनच्या माध्यमातूनही करता येणार नोंदणी

शेतीमाल थेट खरेदी केंद्रावर न आणता शेतकऱ्यांना प्रथम त्याची नोंदणी करावी लागणार आहे. ऑनलाईनच्या माध्यमातून नोंदणी करताना शेतकऱ्यांना पिकपेरा, सातबारा, 8 अ, आधार कार्ड याची माहिती अदा करावी लागणार आहे. गेल्या काही दिवसांपासून ऑनलाईन नोंदणी सुरु असल्याने मका मोजणीसाठी 407 शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. आता कुठे सुरवात झाली असून एरंडोल तसेच धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे.

एरंडोलसाठी स्वतंत्र बाजार समिती

सध्या येथील शेतीमालाची खरेदी-विक्री ही उपसमितीमध्ये होत आहे. मात्र, स्वतंत्र बाजार समिती उभारण्याचा प्रयत्न गेल्या काही वर्षापासून होत आहे. मात्र, बदलत्या राजकीय समीकरणामुळे हे काम अर्धवट राहिले होते. पण एरंडोल तालुक्यासाठी स्वतंत्र बाजार समिती उभारली जाणार असून शेतकी संघाचीही स्थापना केली जाणार असल्याचे आ. चिमणराव पाटील यांनी सांगितले आहे.

संबंधित बातम्या :

नववर्षाची सुरवात शेतकरी हीताच्या निर्णयाने : पीएम किसानचा हप्ता जारी, अन् शेतकरी उत्पादक कंपन्यांना 14 हजार कोटी

Rabi Season | अवकाळीनंतर आता ढगाळ वातावरणाचा धोका, काय आहे उपाययोजना ?

नववर्षाचे शेतकऱ्यांना गिफ्ट अन् पंतप्रधान मोदींचा संदेशही, आज जमा होणार 10 हप्ता

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.