AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Puntamba : ठरलं तर मग..! आगोदर राज्य सरकारबरोबर बैठक अन् अंतिम निर्णय ग्रामसभेतच

शेतकरी आणि राज्य सराकार यांच्यामध्ये होणाऱ्या बैठकीला किसान क्रांती कोअर कमिटीचे सदस्य तसेच आंदोलक उपस्थित राहणार आहेत. उद्याच्या बैठकीमध्ये तोडगा निघाला तरी त्यावर शेतकरी कितपत समाधानी आहेत याबाबत निर्णय़ हा गावच्या ग्रामसभेतच होणार आहे. आंदोलन सुरु राहणार का स्थगित केले जाणार याचा निर्णयही सर्वानुमते घेतला जाणार आहे.

Puntamba : ठरलं तर मग..! आगोदर राज्य सरकारबरोबर बैठक अन् अंतिम निर्णय ग्रामसभेतच
पुणतांबा येथील शेतकरी आंदोलनाची दिशा आता राज्य सरकारच्या बैठकीनंतर ठरणार आहे.Image Credit source: TV9 Marathi
| Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Jun 06, 2022 | 1:45 PM
Share

शिर्डी : शेतकऱ्यांच्या विविध मागण्या घेऊन नगर जिल्ह्यातील (Puntamba) पुणतांबा येथे आंदोलन सुरु करण्यात आले होते. शेतकऱ्यांचा आक्रमकपणा आणि राज्यात सर्वत्रच आंदोलनाला सुरवात होऊ लागल्याने अखेर (Agriculture Minister) कृषिमंत्री दादा भुसे यांनी आंदोनकर्त्यांची भेट घेतले आणि त्यांची शिष्टाई ही कामी आली होती. आंदोलन स्थगित असले तरी (Farmer) शेतकरी हे मागण्यांवर ठाम आहेत. आता मंगळवारी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व संबंधित मंत्र्यांची आंदोलक हे भेट घेणार आहेत. या दरम्यान, शेतकऱ्यांच्या मागण्या आणि सरकारची भूमिका यावर चर्चा होणार असून या बैठकीनंतर आंदोलक आपली दिशा ठरविणार आहेत. त्यामुळे उद्या होणाऱ्या बैठकीकडे राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. या बैठकीत अनेक प्रश्न निकाली निघतील अशी आशा आंदोलकांनाही आहे.

अंतिम निर्णय मात्र ग्रामसभेतच

पुणतांबा येथील आंदोलनाची सुरवात ही ग्रामसभेतील एकमतानंतरच झाली होती. आता उद्या बैठकीत काही तोडगा निघाला तरी आंदोनाबाबत निर्णय मात्र, पुणतांब्याच्या ग्रामसभेतच होणार आहे. शेतकऱ्यांच्या विविध अशा 16 मागण्या घेऊन हे आंदोलन सुरु झाले आहे. 1 जून रोजी आंदोलनाला सुरवात झाली तर दरम्यान, कृषीमंत्री दादा भुसे यांनी आंदोलकांशी संवाद साधला व राज्य सरकारशी बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर आंदोलन जरी स्थगित झाले तरी मागण्या कायम आहेत. त्यामुळे उद्याच्या बैठकीत काय होतंय ते पाहणे महत्वाचे राहणार आहे.

किसान कोअर कमिटीमधील सदस्य बैठकीला

शेतकरी आणि राज्य सराकार यांच्यामध्ये होणाऱ्या बैठकीला किसान क्रांती कोअर कमिटीचे सदस्य तसेच आंदोलक उपस्थित राहणार आहेत. उद्याच्या बैठकीमध्ये तोडगा निघाला तरी त्यावर शेतकरी कितपत समाधानी आहेत याबाबत निर्णय़ हा गावच्या ग्रामसभेतच होणार आहे. आंदोलन सुरु राहणार का स्थगित केले जाणार याचा निर्णयही सर्वानुमते घेतला जाणार आहे.

राज्यभरातील शेतकऱ्यांच्या 16 मागण्या

पुणतांबा येथील शेतकरी आंदोलनाला एक ऐतिहासिक महत्व आहे. त्यामुळेच 5 वर्षानंतर पुन्हा राज्यभरातील शेतकऱ्यांच्या समस्या घेऊन पुन्हा पुणतांब्यातच शेतकऱ्यांनी आंदोलन सुरु केले होते. शेतकऱ्यांनी सरकार समोर 16 मागण्या मांडल्या आहेत. त्यामुळे यापैकी कोणत्या मागण्या मान्य होतील आणि कोणत्या मागण्यांवर निर्णय होणार नाही यावरच आंदोलनाची दिशा ठरणार आहे. ऊस पिकाच्या अनुदानापासून ते वन्यप्राण्यांमुळे झालेले नुकसानभरपाई संदर्भातल्या मागण्या शेतकऱ्यांच्या निवेदनात आहेत.

Follow Us
महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? अनेक बडे नेते काँग्रेसच्या संपर्कात
मोठी बातमी! महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? अनेक बडे नेते काँग्रेसच्या संपर्कात; विजय वडेट्टीवारांचा मोठा दावा
शाळेच्या बसवर भलेमोठं झाड कोसळलं; अनेक विद्यार्थी जखमी
मुंबईत भीषण दुर्घटना! शाळेच्या बसवर भलेमोठं झाड कोसळलं; अनेक विद्यार्थी जखमी, बचावकार्य युद्धपातळीवर सुरू
अजून अनेक मोठे चेहरे आमच्या संपर्कात; शिंदे गटातील नेत्याचा मोठा दावा
मोठी बातमी! अजून अनेक मोठे चेहरे आमच्या संपर्कात; सचिन अहिरांच्या प्रवेशानंतर शिंदे गटातील नेत्याचा मोठा दावा
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी केवळ अर्ज भरलाय, पक्षप्रवेश केलेला नाही?
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी केवळ अर्ज भरलाय, पक्षप्रवेश केलेला नाही? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
सोबत असलो तर चांगले, नाहीतर नालायक?; सचिन अहिरांचा ठाकरेंवर पलटवार
Sachin Ahir | सोबत असलो तर चांगले, नाहीतर नालायक?; शिंदे गटात जाताच सचिन अहिरांचा ठाकरेंवर पलटवार
पत्रकार परिषदेच्या पहिल्या वाक्यातच शिंदे म्हणाले 'असं काही' अन् पिकला
Eknath Shinde | पत्रकार परिषदेच्या पहिल्या वाक्यातच शिंदे म्हणाले 'असं काही' अन् पिकला हशा... सचिन अहिरदेखील... पहा व्हिडीओ
जे कधीच नव्हते आमचे, त्यांची वाट का पहावी?; राऊतांची पहिली प्रतिक्रिया
Sanjay Raut Post | जे कधीच नव्हते आमचे, त्यांची वाट का पहावी?; सचिन अहिरांच्या निर्णयानंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
आदित्य ठाकरेंना झोप येणार नाही, पुढची निवडणूक... राणेंची बोचरी टीका
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना झोप येणार नाही, पुढची निवडणूक....सचिन अहिर यांच्या निर्णयानंतर नितेश राणेंची बोचरी टीका
यात काही धक्का बसला असं नाही कारण... सचिन आहिर याच्या पक्षप्रवेशाआधीच
यात काही धक्का बसला असं नाही, कारण... सचिन आहिर याच्या पक्षप्रवेशाआधीच आदित्य ठाकरेंचं मोठं विधान, थेट कारवाई...
शिंदे सेनेतून उपसभापती पदासाठी अर्ज दाखल करताच सचिन अहिर थेट...
शिंदे सेनेतून उपसभापती पदासाठी अर्ज दाखल करताच सचिन अहिर थेट... राज्यातील राजकारणात मोठं घडतंय?