AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Paddy Crop : उत्पादन वाढीसाठी कृषी विभाग बांधावर, काय आहे भात लागवडीचा चारसूत्री कार्यक्रम?

चारसूत्री कार्यक्रमामुळे इंद्रायणी भाताचा वाण यांच पिकं मोठया जोमाने येते. त्यामुळे वेळीच शेतकऱ्यांनी निर्णय घेतला तर त्याचा फायदा हा पीक काढणीच्या दरम्यान लक्षात येणार आहे. सेंद्रिय पदार्थात वाढ होते. रोपे निरोगी व कणखर होतात. रोपांच्या अंगी खोडकिडा यांना प्रतिकार करण्याची क्षमता वाढते.

Paddy Crop : उत्पादन वाढीसाठी कृषी विभाग बांधावर, काय आहे भात लागवडीचा चारसूत्री कार्यक्रम?
भात लागवड
| Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Jul 02, 2022 | 10:08 AM
Share

पुणे : उत्पादनवाढीच्या अनुशंगाने शेतकऱ्यांसाठी (Kharif Season) खरीप हंगाम महत्वाचा आहे. शेतकऱ्यांच्या उत्पादनात भर पडावी यासाठी (Agricultural Department) कृषी विभागाकडून केवळ नवनवीन योजनाच राबवल्या जात नाहीत तर आता मार्गदर्शन आणि पीक पध्दतीबाबत मार्गदर्शनही केले जात आहे. खरीप हंगामात (Paddy Crop) धान पिकाच्या उत्पादनात वाढ व्हावी यासाठी कृषी विभाग थेट शेतकऱ्यांच्या बांधावर दाखल होत आहे. कुसगाव पमा येथे चारसूत्री पध्दतीने भात लागवड करण्यासाठी कृषी विभागाचे अधिकारी थेट बांधावर दाखल झाले होते. या पध्दतीमुळे उत्पादनात तर वाढ होणारच आहे पण अधिकाऱ्यांच्या या पुढाकारामुळे शेतकऱ्यांना विविध बाबींचे मार्गदर्शन देखील मिळत आहे. या जनजागृतीमुळे चारसूत्री लागवडीला अधिक पसंती दिली जात आहे.

काय आहे चारसूत्री भात लागवड पध्दत?

लागवडीपासून भात पिकाची योग्य ती काळजी घेतली तर उत्पादनात वाढ होणार आहे. सध्या खरीप हंगामातील भात लागवड सुरु झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी याच पध्दतीचा अधिक वापर करावा म्हणून कृषी विभागाचा आग्रह आहे. यामध्ये भाताची लागवड करताना दोन्ही रोपांमधील अंतर 15*25 सेंटीमाटर ते 15*25 असे ठेवावे लागणार आहे. प्रत्येक सरीमध्ये आलटूनपालटून असेच अंतर ठेवणे गरजेचे आहे. भात लागवडीसाठी चिखलणी करताना गिरिपुष्पाची हिरवी पाने मिसळावीत. सुधारित लावणी दोरीवर 15 सें.मी. अंतरावर असलेल्या प्रथम एक व नंतर दुसरा चूड लावावा. अंदाजाने 15 सें.मी. पुढे आणखी तिसरा व चौथा चूड लावावा. अशा प्रकारे एका वेळी जोड-ओळ पद्धत वापरून त्याच दोरीत लावणीचे काम पूर्ण करावे.

उत्पादनात वाढ अन् योग्य नियोजनही

चारसूत्री कार्यक्रमामुळे इंद्रायणी भाताचा वाण यांच पिकं मोठया जोमाने येते. त्यामुळे वेळीच शेतकऱ्यांनी निर्णय घेतला तर त्याचा फायदा हा पीक काढणीच्या दरम्यान लक्षात येणार आहे. सेंद्रिय पदार्थात वाढ होते. रोपे निरोगी व कणखर होतात. रोपांच्या अंगी खोडकिडा यांना प्रतिकार करण्याची क्षमता वाढते. भाताचे उत्पादन वाढण्यास मदत होते. या पध्दतीचा अवलंब अधिकाधिक शेतकऱ्यांनी करावा यासाठी कृषी अधिकारी थेट बांधावर जाऊन मार्गदर्शन करीत आहेत.

भात लागवडीसाठी जलस्त्रोतील पाण्याचा वापर

सध्या खरीप हंगामातील पिकांची लागवड सुरु आहे. असे असले तरी अपेक्षित पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना विहीर,बोरिंग किंवा नदीच्या पाण्यावर चार सूत्री भाताची लागवड करावी लागत आहे. पावसाने पाठ फिरवल्याने काही ठिकाणी शेतीची कामे रखडली आहेत. शेतकऱ्यांना अपेक्षित पावसाची प्रतिक्षा आहे. तर दुसरीकडे कृषी विभाग शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करीत असल्याने उत्पादनात वाढ होईल अशी अपेक्षा आहे.

Follow Us
मुंबईतील 5 आउइटलेट्सवर FDA ची मोठी कारवाई; नेमकं काय आढळलं?
Mumbai | तुकाराम मुंढे यांचा Domino’s ला दणका! मुंबईतील 5 आउइटलेट्सवर FDA ची मोठी कारवाई; नेमकं काय आढळलं?
शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा
Eknath Shinde | एकनाथ शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा, नेमकं काय ठरलं?
आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं...
Tv9 Marathi Special Report | फक्त आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं; सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी...
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी गठीत केली उच्चस्तरीय समिती
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर