AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कृषी विभागाचे वरातीमागून घोडे, डाळिंब बागाचे नुकसान अन् हंगाम संपल्यानंतर आता कीड नियंत्रणाचे धडे

सांगोला तालुक्याबरोबरच सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातही डाळिंब बागांचे क्षेत्र आहे. यंदाच्या हंगामात वातावरणातील बदलामुळे मोठ्या प्रमाणात 'पिन होल बोरर' अर्थात खोडकिडीचा प्रादुर्भाव झाला होता. यामुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट तर झालीच पण अनेक शेतकऱ्यांनी डाळिंब बागाच काढून टाकणे पसंत केले. यानंतर केंद्रीय पथक डाळिंब बागा पाहण्यासाठी सांगोला तालुक्यात दाखल झाले होते. शिवाय या पथकाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन केल्यानंतर चार दिवसांपूर्वीच सांगोला तालुक्यीतल महुद येथे शेतकरी परिषदेत डाळिंब बागाचे अस्तित्व कसे राहिल याअनुशंगाने मार्गदर्शन झाले होते.

कृषी विभागाचे वरातीमागून घोडे, डाळिंब बागाचे नुकसान अन् हंगाम संपल्यानंतर आता कीड नियंत्रणाचे धडे
राजेंद्र खराडे
राजेंद्र खराडे | Updated on: Apr 10, 2022 | 3:23 PM
Share

सांगली : सांगोला तालुक्याबरोबरच (Sangli District) सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातही (Pomegranate orchard) डाळिंब बागांचे क्षेत्र आहे. यंदाच्या हंगामात वातावरणातील बदलामुळे मोठ्या प्रमाणात ‘पिन होल बोरर’ अर्थात खोडकिडीचा प्रादुर्भाव झाला होता. यामुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट तर झालीच पण अनेक शेतकऱ्यांनी डाळिंब बागाच काढून टाकणे पसंत केले. यानंतर (Central Team) केंद्रीय पथक डाळिंब बागा पाहण्यासाठी सांगोला तालुक्यात दाखल झाले होते. शिवाय या पथकाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन केल्यानंतर चार दिवसांपूर्वीच सांगोला तालुक्यीतल महुद येथे शेतकरी परिषदेत डाळिंब बागाचे अस्तित्व कसे राहिल याअनुशंगाने मार्गदर्शन झाले होते. एवढे सर्व झाल्यानंतर आता कृषी विभागाच्यावतीने खोड किडीसह मर रोगावर नियंत्रणाचे प्रयत्न केले जात आहेत. शेतकऱ्यांना गरज असतानाच मार्गदर्शन झाले असते तर बागा जिवंत राहिल्या असत्या. आता 40 टक्के क्षेत्रावरील बागा काढून टाकल्यानंतर कृषी विभाग बांधार जाऊन उपाययोजना करीत आहे.

उशिराचे शहाणपण, अधिकारी थेट बांधावर

निसर्गाच्या लहरीपणाचा सर्वाधिक परिणाम यंदा फळबागांवर झालेला आहे. असे असताना योग्य वेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन झाले असते तर पिन होल बोरर किंवा मर रोग हे नियंत्रणात आले असते. त्या दरम्यान कोणतेच मार्गदर्शन झाले नाही. आता मात्र, कृषी विभगाचे अधिकारी हे शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन रोगांपासून बागांचे संरक्षण व्हावे याकरिता रसायनाचे ड्रेचिंग, फवारणी आणि पेस्ट लावण्याचे काम हाती घेतले आहे. यामुळे उर्वरीत क्षेत्रावरील तरी बागांचे संवर्धन होईल असा विश्वास आहे.

केंद्रीय पथकाच्या पाहणीनंतर शेतकरी परिषदेचे आयोजन

सांगली, सांगोला या भागात डाळिंब उत्पादनात मोठी घट झाली आहे. येथील वातावरण डाळिंबासाठी पोषक असताना ही परस्थिती ओढावली कशी याचा अभ्यास करण्यासाठी महिनाभरापूर्वीच केंद्रीय पथक या भागात दाखल झाले होते. पथकातील अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत वातावरणात बदल होत असताना योग्य काळजी न घेतल्यानेच ही परस्थिती ओढावल्याचे सांगितले होते. त्यानंतर शेतकऱ्यांसाठी शेतकरी परिषदचेचे आयोजन करण्यात आले होते. परिषदेत डाळिंब संशोधन केंद्राचा ढिसाळ कारभार आणि कृषी विभागाची भूमिका यावर प्रश्न उपस्थित झाले होते.

शेतकऱ्यांना प्रात्याक्षिके

खोड किडीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी डाळिंबाच्या खोडाला पेस्ट लावली जाते. जेणे करुन कीडीचा प्रादुर्भाव वाढणार नाही. कारण अजूनही या रोगावर ठोस असे औषधच नाही. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना हेच महत्वाचे आहे.त्यामुळेच डाळिंब झाडाभोवती शिफारशीत कीटकनाशके, बुरशीनाशकांचे ड्रेचिंग, फवारणी व कीडनाशकांची पेस्ट कशी लावावी याबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे.

संबंधित बातम्या :

Excess Sugarcane : शेतकऱ्यांबरोबर साखर आयुक्तांचीही धावपळ, 90 लाख टन अतिरिक्त ऊस अन् दीड महिन्याचा कालावधी

Sangli : सांगलीवाडीच्या शिवारात बैलगाडा शर्यतीचा धुरळा, शर्यतीमध्ये ना काठी-ना लाठी

Gondia | गोंदियात Cycle Sunday Group ची अनोखी दिलदारी, पक्षांनाही मिळतेय थंडगार पाणी

Follow Us
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती!
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई...
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई सुरु, धक्कादायक खुलासे
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचण
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचणी वाढल्या, गेल्या 3 तासांपासून...
बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश
Girish Mahajan | बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश!
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात...
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात... त्या जागेमुळे नेत्याने खदखद बाहेर काढली!
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारी
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारीबाबत संजय राऊतांचा मोठा दावा
महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर हल्लाबोल
Mumbai Shivsena UBT Protest | महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर जोरदार हल्लाबोल
अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
Monsoon Update | अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती जागांवर चुरशीची लढत
नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत
Vidhan Parishad Election | शेवटच्या मिनिटाला मोठा ट्विस्ट! नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत