AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या पिकाला मिळतो हमीभाव, परंतु कारखानदारांच्या आडमुठ्या भुमिकेमुळे शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान

शेतीमालाला हमीभाव नसल्याने शेतकरी नेहमीच अडचणीत सापडतो, तर एकमेव उसाचा पिकाला एफआरपी प्रमाणे दर दिला जातो. त्यामुळे शेतकरी ऊस पिकाकडे मोठ्या प्रमाणात वळतात.

या पिकाला मिळतो हमीभाव, परंतु कारखानदारांच्या आडमुठ्या भुमिकेमुळे शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान
ऊसतोड मुकादमाकडून शेतकऱ्यांच्या फसवणुकीचे 445 गुन्हे दाखलImage Credit source: tv9marathi
महेश घोलप
महेश घोलप | Updated on: Mar 05, 2023 | 2:08 PM
Share

कुणाल जयकर, अहमदनगर : गेल्या काही दिवसांपासून अतिवृष्टीमुळे (heavy rain) शेतकरी (ahmadnagar farmer) अडचणी सापडला आहे. तर पिकांना हमीभाव मिळावा, ही मागणी गेल्या काही दिवसापासून शेतकरी करत आहे. मात्र सरकारकडून (maharashtra government) यावर आश्वासनाच्या पलीकडे कोणताही उपाय सुचविला जात नाही. तर ऊस हे एकमेव पीक आहे की, त्या पीकाचे शेतकऱ्यांना हमीभावाप्रमाणे पैसे मिळतात. मात्र कारखानदार हे हमीभावाप्रमाणे पैसे देत नसल्याने शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होतं आहे.

शेतीमालाला हमीभाव नसल्याने शेतकरी नेहमीच अडचणीत सापडतो, तर एकमेव उसाचा पिकाला एफआरपी प्रमाणे दर दिला जातो. त्यामुळे शेतकरी ऊस पिकाकडे मोठ्या प्रमाणात वळतात. राज्यातील अनेक जिल्ह्यात उसाचं मोठं उत्पादन घेतलं जातं. अहमदनगर जिल्ह्यात देखील मोठ्या प्रमाणात ऊस उत्पादक शेतकरी आढळून येतात. तर राज्यात सहकाराची पंढरी म्हणून नगर जिल्ह्याची ओळख आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात साखर कारखाने आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात ऊस उत्पादन घेतात.

मात्र गेल्या काही दिवसांपासून योग्य हमीभाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. नगदी पीक म्हणून उसाच पीक अतिशय महत्त्वाचं आहे. तर उसाच्या दराला कायदेशीर संरक्षण आहे, त्यामुळे बहुतांश शेतकरी ऊस पिक घेण्यास प्राधान्य देतात. मात्र एफआरपी प्रमाणे शेतकऱ्यांना दर मिळत नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडत चाललेला आहे. जे कारखाने शेतकऱ्यांना एफआरपी प्रमाणे भाव देणार नाही. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाते, मात्र प्रत्यक्षात तसं केलं जात नाही असा आरोप शेतकरी अनिल देठे पाटील यांनी केला आहे.

राज्यातील बहुतांश राजकारण आणि अर्थकारण साखर कारखान्यावर अवलंबून आहे. तसेच साखर सम्राटांची लॉबी असल्याने त्यांचा राज्यकर्त्यांवर दबाव असतो. त्यामुळे सर्व साखर कारखानदार मिळून उसाचे दर ठरवतात त्याचा फटका हा शेतकऱ्यांना बसतो. तर जेवढा खर्च ऊस पिकाला करावा लागतो. किमान त्यावर आम्हाला 25% तरी नफा मिळावा अशी मागणी शेतकरी करतात. मात्र या मागणीकडे दुर्लक्ष होत असल्याने ऊस उत्पादक शेतकरी आर्थिक संकटाला सामोरे जात आहे अशी माहिती शेतकऱ्यांनी दिली आहेय

उसाच्या लागवडीपासून मशागतीपर्यंत शेतकऱ्यांना खर्च…

उसाच्या पिकाचा संपूर्ण कालावधी दहा ते बारा महिन्यापर्यंत असतो. शेतकऱ्यांना एकरी उसाचा पीक घ्यायचं असेल तर उसाच्या लागवडीपासून मशागतीपर्यंत शेतकऱ्यांना खर्च करावा लागतो. सध्या रासायनिक खतांच्या किमती वाढल्या आहेत. मजुरांची मजुरी, मोठ्या प्रमाणात पाणी द्यावे लागते.संपूर्ण बारा महिने उसाच्या पिकाकडे लक्ष द्यावे लागते. एवढं करून वर्षभरात एकरी दोन ते अडीच लाख रुपये पर्यंत खर्च येतो.

शेतकऱ्यांसाठी ऊस हे आशादायक पीक आहे. मात्र त्यावर देखील शेतकऱ्यांची फसवणूक केली जाते. त्यामुळे अनेकवेळा शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरून आंदोलन करावी लागतात.

Follow Us
अपघाताच्या चौकशीबाबत सरकारकडून माहिती नाही; सुप्रिया सुळे यांचा संताप
अपघाताच्या चौकशीबाबत सरकारकडून माहिती नाही; सुप्रिया सुळे यांचा संताप
लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा; ओबीसी काय करेल, हे आम्ही दाखवून देऊ
लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा; ओबीसी काय करेल, हे आम्ही दाखवून देऊ...
शिवसेना पक्षचिन्हावर उद्या सुनावणी; एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल
शिवसेना चिन्हाच्या सुनावणीपूर्वी एकनाथ शिंदे दिल्लीत; म्हणाले, धनुष्यबाण गोठवणे दुर्दैवी
अनावश्यक सोने खरेदी आणि परदेशी प्रवास टाळा, पंतप्रधान मोदींचे आवाहन
अनावश्यक सोने खरेदी आणि परदेशी प्रवास टाळा, पंतप्रधान मोदींचे आवाहन
नवी मुंबईत एक्सपायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री
नवी मुंबईत एक्सपायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री; एफडीए आणि गुन्हे शाखेची मोठी कारवाई
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट; सप्टेंबरमध्येही कमी पावसाचा अंदाज
हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते?
Krushnaraj Mahadik On MNS | हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते? म्हणत कृष्णराज महाडिक आक्रमक
मनोज जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सज्ज; तोडग्यासाठी...
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सज्ज; तोडग्यासाठी हालचालींना वेग!
आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम
Praveen Swami | आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम, प्रवीण स्वामी थेट म्हणाले...
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी..
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी व्यापाऱ्यांना आणखी 1 वर्षाची दिली मुभा