AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हे झाड लावलं की साप घरात आलाच म्हणून समजा, गावातील लोक चुकूनही लावत नाहीत, तुमच्याकडे आहे का?

अशी काही झाडं असतात जी आपल्या विशिष्ट गुणधर्मामुळे सापांना आपल्याकडे आकर्षित करतात, अशाच एका झाडाबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत, आजही गावातील लोक हे झाडं घरात लावणं टाळतात.

हे झाड लावलं की साप घरात आलाच म्हणून समजा, गावातील लोक चुकूनही लावत नाहीत, तुमच्याकडे आहे का?
snakesImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Feb 16, 2026 | 11:48 PM
Share

सापांबद्दल समाजात अनेक समज गैरसमज आहेत. त्यामुळे अजूनही दिसला साप की आपण लगेचच त्याला मारतो. मात्र साप हा निसर्ग साखळीतील एक महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे जर तुम्हाला कुठेही साप दिसला तर त्याला न मारता त्याची माहिती ही सर्पमित्रांना दिल्यास ते सापांना पकडून सुरक्षित अधिवासात सोडू शकतात. भारतामध्ये सापांच्या हजारो जाती आढळतात, त्यापैकी काही जाती या अत्यंत विषारी आहेत, तर काही जाती या निमविषारी आहेत. मात्र विषारी आणि निमविषारी जातींच्या सापांची सख्या ही अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतकीच आहे. बहुतांश जाती या बिनविषारी असतात आणि त्यांच्यापासून मानवाला कोणताही धोका नसतो. बिनविषारी जातीच्या सापांमध्ये गवत्या,धामण, वेरुळा, दिवड, शेलाटी अशा अनेक जातींची नाव सांगता येतील, हे साप माणसाला चावले तरी एवढा जास्त धोका नसतो, मात्र कोणताही साप चावला तर खबरदारी म्हणून सर्वात आधी डॉक्टरांकडे जाऊन योग्य ते उपचार करणं गरजेच असतं. तर विषारी सापांमध्ये घोणस, फुरसे, मण्यार, आणि नाग ज्याला आपण कोब्रा देखील म्हणतो या चार प्रमुख जाती आहेत. ज्याला बिग फोर असं देखील म्हटलं जातं.

महाराष्ट्रासंदर्भात बोलायचं झाल्यास या चारही सापाच्या जाती राज्यात विविध ठिकाणी आढळून येतात, यातील नाग आणि घोणस या दोन विषारी सापाच्या जाती तर राज्यात सर्वत्र आढळून येतात. दरम्यान साप घरात येऊ नये, यासाठी ग्रामीण भागांमध्ये विविध उपाय केले जातात, जसं की विशिष्ट प्रकारची झाडं लावली तर साप घरात येत नाहीत अशी मान्यता आहे. जसं की काही ठिकाणी लसून, कांद्याचं रोप लावतात याच्या तीव्र वासामुळे साप घरात प्रवेश करत नाही अशी मान्यता आहे. असे विविध झाडं आहेत, की ज्यामुळे साप तुमच्या घरात प्रवेश करत नाही, मात्र अशी देखील काही झांड आहेत, की जी सापांची आवडती झाडं आहेत, या झाडांच्या विविध गुणधर्मांमुळे साप या झाडांकडे आकर्षित होतो, आज आपण अशाच एका झाडाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

हे झाड आहे केवड्याचं असं म्हणतात केवड्याच्या पानाला विशिष्ट प्रकारचा सुंगध असतो या वासामुळे साप या झाडाकडे आकर्षित होतो. त्यामुळे आज देखील ग्रामीण भागांमध्ये घरात कोणीही केवड्याचं झाडं लावत नाही, हे झाड शेतात किंवा मोकळ्या जागेतच लावलं जातं. केवड्याच्या झाडाखाली कायम ओल असते त्यामुळे उन्हाळ्यामध्ये साप गारव्यासाठी या झाडाखाली ओलीला बसण्याची शक्यता असते, त्याच प्रमाणे चंदनाच्या झाडाकडे देखील साप आकर्षित होतो. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे चंदनाला विशिष्ट प्रकारची फळं येतात, ही फळं खाण्यासाठी पक्षी येतात, पक्ष्यांना ही फळं खूप आवडतात, अनेक पक्षांची घरटे देखील चंदनाच्या झाडावर असतात, त्यामुळे साप पक्षी आणि त्यांची अंडी खाण्यासाठी या झाडाकडे आकर्षित होतात, त्यामुळे आपण अशा ठिकाणी सावध असणं गरजेचं असतं. साप कोणताही असो जर सर्पदंश झाला की वेळ न घालवता तातडीने डॉक्टरांकडे जाऊन त्यावर उपचार करणं गरजेचं असतं, अन्यथा ते तुमच्या जीवावर देखील बेतू शकतं.

Follow Us
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील.
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?.
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद...
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद....
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी.
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?.
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?.
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे.
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद.
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये...
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये....
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप.