AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेतकऱ्यांची लूट करणाऱ्या कृषी केंद्रांचे परवाने रद्द, शेतकऱ्यांकडून कृषी विभागाचं कौतुक

महाराष्ट्रात सध्या शेतकऱ्यांची पेरणी अंतिम टप्प्यात आहे. मागच्या महिन्यात कृषी विभागाने बोगस बियाणे विकणारी टोळी किंवा कृषी केंद्र चालकांवरती कारवाई केली आहे.

शेतकऱ्यांची लूट करणाऱ्या कृषी केंद्रांचे परवाने रद्द, शेतकऱ्यांकडून  कृषी विभागाचं कौतुक
daryapur bogus seedsImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 08, 2023 | 9:46 AM
Share

अमरावती : अमरावती (Amravati news) दर्यापूरात शेतकऱ्यांच्या तक्रारीवरुन कृषी केंद्र संचालकाविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दर्यापूर (daryapur bogus seeds) येथे अजित 155 कपाशी बियाणांचा काळाबाजार झाल्याचं मागच्या काही दिवसांपूर्वी उजेडात आलं होतं. दर्यापूर न्यू कृषी केंद्राचे संचालक प्रमोद टोपले यांच्यावर ४२० नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कृषी केंद्र (agricultural centre) ८५० रुपयांची बियाणांची बॅग १२०० रुपयांना शेतकऱ्यांना विकत असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. शेतकऱ्यांची लूट करणाऱ्या कृषी केंद्राचा परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव पुढे पाठवण्यात आला आहे.

इतर राज्यातून महाराष्ट्रात विक्रीसाठी आलेलं बोगस बियाणे महाराष्ट्रातील कृषी अधिकाऱ्यांनी पोलिसांनी अनेकदा पकडलं आहे. त्याचबरोबर ज्या कृषी केंद्र चालकांनी बोगस बियाणे विकले आहेत. त्यांच्यावर सुध्दा कारवाई करण्यातं आली आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी बोगस बियाणे सापडल्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत होता. परंतु कृषी विभागाकडून खात्री केल्याशिवाय कोणतंही बियाणं खरेदी करु नये असं सांगितलं होतं.

सोयाबीन चोरटा मुद्देमालासह अटक

वाशिम येथील अडत व्यापाऱ्याचा ३२२ पोते सोयाबीन शेतमाल सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे पोहचविण्यासाठी ट्रकमध्ये भरला. या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्या ट्रकचालकावरती कारवाई केली. बीड जिल्ह्यातील वडगाव येथील रघुनाथ खाटिक असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव असून त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेले ८ लाख ६६ हजाराचे सोयाबीन जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी वाशिम शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.

महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यात सध्या पाऊस सुरु झाला असून पेरणीची कामांना वेग आला आहे. उशिरा पाऊस दाखल झाल्यामुळे उत्पादन कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

राहुल गांधींना नरवणेंच्या पुस्तकावर बोलताना रोखल्याने, काँग्रेस आक्रमक
राहुल गांधींना नरवणेंच्या पुस्तकावर बोलताना रोखल्याने, काँग्रेस आक्रमक.
पालघरमध्ये पोलिसांचं कोंबिंग ऑपरेशन, तब्बल 200 पोलीस तैनात!
पालघरमध्ये पोलिसांचं कोंबिंग ऑपरेशन, तब्बल 200 पोलीस तैनात!.
जयंती नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर
जयंती नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर.
जरांगे पाटलांना जीवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने खळबळ
जरांगे पाटलांना जीवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने खळबळ.
रंगरंगोटी झाली, लूक बदलला, दालन सज्ज; फक्त प्रतिक्षा नव्या महापौरांची
रंगरंगोटी झाली, लूक बदलला, दालन सज्ज; फक्त प्रतिक्षा नव्या महापौरांची.
त्या दोन नेत्यांचे दोन्ही पाय भाजपमध्येच;राऊतांचा दोन नेत्यांवर निशाना
त्या दोन नेत्यांचे दोन्ही पाय भाजपमध्येच;राऊतांचा दोन नेत्यांवर निशाना.
लोकसभेत विरोधकांच्या गदारोळावर अध्यक्षांकडून तीव्र नाराजी व्यक्त
लोकसभेत विरोधकांच्या गदारोळावर अध्यक्षांकडून तीव्र नाराजी व्यक्त.
शरद पवार, जय आणि पार्थ पवार यांच्यात दीड तास बैठक सुरु
शरद पवार, जय आणि पार्थ पवार यांच्यात दीड तास बैठक सुरु.
अजित पवार यांच्या स्मारकाची जागा निश्चित होण्याची शक्यता
अजित पवार यांच्या स्मारकाची जागा निश्चित होण्याची शक्यता.
15 तास कार, टॅक्सी, बसून, पुणे–मुंबई महामार्गावरील वाहतूक अजूनही ठप्प
15 तास कार, टॅक्सी, बसून, पुणे–मुंबई महामार्गावरील वाहतूक अजूनही ठप्प.