AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेतकऱ्याने टमाटर विकून दीड कोटीचं कर्ज फेडलं, उत्पन्न जाणून घेतल्यास बसेल धक्का

गेल्या वर्षी टमाटरचे भाव घसरल्याने दीड कोटी रुपयांचं नुकसान झालं. त्यांनी सावकाराकडून उधार घेऊन शेती केली होती.

शेतकऱ्याने टमाटर विकून दीड कोटीचं कर्ज फेडलं, उत्पन्न जाणून घेतल्यास बसेल धक्का
Govinda Hatwar
Govinda Hatwar | Updated on: Aug 02, 2023 | 3:17 PM
Share

हैदराबाद : महागाईमुळे जनता नाराज आहे. पण, हिरवा भाजीपाला विकणाऱ्या शेतकऱ्यांना लॉटरी लागली आहे. विशेषता टमाटर विक्रेत्या शेतकऱ्यांची कमाई कित्तेक पटीने वाढली आहे. देशात कित्तेक शेतकरी टमाटर विकून करोडपती झाले आहेत. यापैकी एक शेतकरी आहेत मुरली (वय ४८). मुरली यांनी टमाटर विकून चार कोटी रुपयांचा फायदा मिळवला. यामुळे संपूर्ण देशात त्यांची चर्चा होत आहे. मुरली हे आंध्र प्रदेशातील चितूर जिल्ह्यात राहतात. बऱ्याच वर्षांपासून ते टमाटरची शेती करतात.

मुरली यांना यापूर्वी कधी एवढा नफा मिळाला नाही. गेल्या वर्षी टमाटरचे भाव घसरल्याने दीड कोटी रुपयांचं नुकसान झालं. त्यांनी सावकाराकडून उधार घेऊन शेती केली होती. त्यामुळे दीड कोटी रुपयांचे कर्जदार झाले होते. पण, यंदा ते टमाटरच्या विक्रीतून मालामाल झाले. टमाटरची किंमत चांगली असल्याने टमाटर विक्री करून चार कोटी रुपये त्यांनी मिळवले.

४५ दिवसांत २ कोटींचा फायदा

जास्त किंमती मिळावी म्हणून मुरली यांनी मेहनत केली. टमाटर विक्रीसाठी त्यांनी १३० किलोमीटर दूरवर विक्री केली. टमाटर विक्रीसाठी ते कोलारला जात होते. दीड कोटी रुपयांचे कर्ज फेडून मुरली ४५ दिवसांत २ कोटी रुपयांचे उत्पन्न घेत आहेत.

जमीन खरेदी करण्याचा विचार

मिळालेल्या नफ्याच्या पैशातून आता ते जमीन खरेदी करण्याचा विचार करत आहेत. शास्त्रीय पद्धतीने ते टमाटरची शेती करण्याचा विचार करत आहेत. विशेष म्हणजे मुरली गावात जमीन खरेदी करण्यासाठी जमीन पाहत आहेत.

ईश्वर गायकरही करतात टमाटरची शेती

महाराष्ट्रातील शेतकरी ईश्वर गायकर यांनी टमाटर विक्री करून २ कोटी ८० लाख रुपये मिळवले. ईश्वर गायकर हेसुद्धा गेल्या सात वर्षांपासून १२ एकर जागेत टमाटरची शेती करतात. परंतु, यंदाएवढा नफा यापूर्वी त्यांना कधीच मिळाला नाही. यापूर्वी त्यांना बऱ्याच वेळा टमाटरच्या शेतीत नुकसान झाले. २०२१ साली ईश्वर गायकर यांना टमाटर शेतीत १८-२० लाख रुपयांचा नुकसान झाला होता.

Follow Us
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या नातलगाने...
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या लांबच्या नातलगाने टप्प्यात केला कार्यक्रम, नाशिक कुंभमेळ्यात कसा झाला घोटाळा?
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं...
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं का म्हणाले? टर्निंग पॉइंट ठरणारा मुद्दा काय?
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर...
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर... अखेर कपिल सिब्बल यांची कोर्टाकडे मोठी मागणी
भर मंचावरून जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीर...
Manoj Jarange Video | भर मंचावरून मनोज जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीरावरून, चेहऱ्यावरून...
पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण...
Sukhbir Singh Badal | पंजाबच्या माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण काय? याआधीही... मोठी अपडेट समोर
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय...
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे...
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे आदेश आयोगाला देऊ शकत नाही, मग...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल यांनी नेमका युक्तिवाद काय लढवला?
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजून झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या...
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजूने झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या मुद्यावर युक्तिवाद, कोर्टाचं निदर्शन काय?
कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
शिवसेना पक्षचिन्ह प्रकरण: कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान