AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेतकऱ्याने टमाटर विकून दीड कोटीचं कर्ज फेडलं, उत्पन्न जाणून घेतल्यास बसेल धक्का

गेल्या वर्षी टमाटरचे भाव घसरल्याने दीड कोटी रुपयांचं नुकसान झालं. त्यांनी सावकाराकडून उधार घेऊन शेती केली होती.

शेतकऱ्याने टमाटर विकून दीड कोटीचं कर्ज फेडलं, उत्पन्न जाणून घेतल्यास बसेल धक्का
| Updated on: Aug 02, 2023 | 3:17 PM
Share

हैदराबाद : महागाईमुळे जनता नाराज आहे. पण, हिरवा भाजीपाला विकणाऱ्या शेतकऱ्यांना लॉटरी लागली आहे. विशेषता टमाटर विक्रेत्या शेतकऱ्यांची कमाई कित्तेक पटीने वाढली आहे. देशात कित्तेक शेतकरी टमाटर विकून करोडपती झाले आहेत. यापैकी एक शेतकरी आहेत मुरली (वय ४८). मुरली यांनी टमाटर विकून चार कोटी रुपयांचा फायदा मिळवला. यामुळे संपूर्ण देशात त्यांची चर्चा होत आहे. मुरली हे आंध्र प्रदेशातील चितूर जिल्ह्यात राहतात. बऱ्याच वर्षांपासून ते टमाटरची शेती करतात.

मुरली यांना यापूर्वी कधी एवढा नफा मिळाला नाही. गेल्या वर्षी टमाटरचे भाव घसरल्याने दीड कोटी रुपयांचं नुकसान झालं. त्यांनी सावकाराकडून उधार घेऊन शेती केली होती. त्यामुळे दीड कोटी रुपयांचे कर्जदार झाले होते. पण, यंदा ते टमाटरच्या विक्रीतून मालामाल झाले. टमाटरची किंमत चांगली असल्याने टमाटर विक्री करून चार कोटी रुपये त्यांनी मिळवले.

४५ दिवसांत २ कोटींचा फायदा

जास्त किंमती मिळावी म्हणून मुरली यांनी मेहनत केली. टमाटर विक्रीसाठी त्यांनी १३० किलोमीटर दूरवर विक्री केली. टमाटर विक्रीसाठी ते कोलारला जात होते. दीड कोटी रुपयांचे कर्ज फेडून मुरली ४५ दिवसांत २ कोटी रुपयांचे उत्पन्न घेत आहेत.

जमीन खरेदी करण्याचा विचार

मिळालेल्या नफ्याच्या पैशातून आता ते जमीन खरेदी करण्याचा विचार करत आहेत. शास्त्रीय पद्धतीने ते टमाटरची शेती करण्याचा विचार करत आहेत. विशेष म्हणजे मुरली गावात जमीन खरेदी करण्यासाठी जमीन पाहत आहेत.

ईश्वर गायकरही करतात टमाटरची शेती

महाराष्ट्रातील शेतकरी ईश्वर गायकर यांनी टमाटर विक्री करून २ कोटी ८० लाख रुपये मिळवले. ईश्वर गायकर हेसुद्धा गेल्या सात वर्षांपासून १२ एकर जागेत टमाटरची शेती करतात. परंतु, यंदाएवढा नफा यापूर्वी त्यांना कधीच मिळाला नाही. यापूर्वी त्यांना बऱ्याच वेळा टमाटरच्या शेतीत नुकसान झाले. २०२१ साली ईश्वर गायकर यांना टमाटर शेतीत १८-२० लाख रुपयांचा नुकसान झाला होता.

Follow Us
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी.
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी.
शहरातही आता चुलींना मागणी वाढली, गॅस सिलिंडर टंचाईवर शोधला उपाय
शहरातही आता चुलींना मागणी वाढली, गॅस सिलिंडर टंचाईवर शोधला उपाय.
खरातवर आणखी दोन गुन्हे दाखल, एकूण गुन्ह्यांची संख्या १०, हवाला रॅकेट..
खरातवर आणखी दोन गुन्हे दाखल, एकूण गुन्ह्यांची संख्या १०, हवाला रॅकेट...
रुपाली चाकणकर यांच्यावर अटकेची टांगती तलवार ? काय म्हणाल्या अंधारे?
रुपाली चाकणकर यांच्यावर अटकेची टांगती तलवार ? काय म्हणाल्या अंधारे?.
'ऑल पार्टी मिटींगला जे उपस्थित नाहीत ते...', राऊत यांची मोदींवर टीका
'ऑल पार्टी मिटींगला जे उपस्थित नाहीत ते...', राऊत यांची मोदींवर टीका.
रत्नागिरीत अवकाळी पावसाचा आंब्यांना फटका, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
रत्नागिरीत अवकाळी पावसाचा आंब्यांना फटका, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान.
'कर्माचे फळ...,' चाकणकरांच्या राजीनाम्यावर दमानिया यांची प्रतिक्रीया
'कर्माचे फळ...,' चाकणकरांच्या राजीनाम्यावर दमानिया यांची प्रतिक्रीया.
अजितदादांच्या अपघाताला 2 महिने झाले तरी उद्याप न्याय मिळाला नाही
अजितदादांच्या अपघाताला 2 महिने झाले तरी उद्याप न्याय मिळाला नाही.
बुलढाण्यात इंधन टंचाई; एकाच पंपावर गर्दी, अफवांमुळे तुटवडा वाढला?
बुलढाण्यात इंधन टंचाई; एकाच पंपावर गर्दी, अफवांमुळे तुटवडा वाढला?.