AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दुष्काळात तेरावा : सोयाबीनसह आठ शेतीमालाच्या वायद्यांवरही निर्बंध, काय होणार दरावर परिणाम?

आतापर्यंत अवकाळी आणि बदलत्या वातावरणामुळे उत्पादनावर परिणाम झालेला आहे. या प्रतिकूल परस्थितीमध्ये शेतकऱ्यांना आधार न देता तोंडचा घास हिरावून घेण्यातच सरकार धन्यता मानत आहे. गेल्या काही दिवसांपासून सोयाबीनचे दर हे स्थिर होते. त्यामुळे शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला असतानाच आता सोयाबीनसह इतर आठ शेतीमालाच्या वायद्यांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.

दुष्काळात तेरावा : सोयाबीनसह आठ शेतीमालाच्या वायद्यांवरही निर्बंध, काय होणार दरावर परिणाम?
सोयाबीन हे खरीप हंगामातील मुख्य पीक आहे. पुन्हा सोयाबीनच्या दरात मोठी घसरण झाली आहे.
| Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Dec 21, 2021 | 10:32 AM
Share

मुंबई : आतापर्यंत अवकाळी आणि बदलत्या वातावरणामुळे उत्पादनावर परिणाम झालेला आहे. या प्रतिकूल परस्थितीमध्ये शेतकऱ्यांना आधार न देता तोंडचा घास हिरावून घेण्यातच सरकार धन्यता मानत आहे. गेल्या काही दिवसांपासून सोयाबीनचे दर हे स्थिर होते. त्यामुळे शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला असतानाच आता सोयाबीनसह इतर आठ शेतीमालाच्या वायद्यांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सोयाबीनच्या दरात अणखीन घट होणार असल्याचा धोका आहे. त्यामुळे आता शेतकरी काय भूमिका घेणार त्यावरच सोयाबीन या मुख्य पिकाचे दर अवलंबून राहणार आहेत.

वायदे बंद म्हणजे नेमके काय होणार?

शेतीमालाच्या विक्री ही वायद्यानुसार म्हणजेच दर ठरविले जात होते पण पैसे अदा करण्यासाठी व्यापारी, आडते यांना मोकळीक होती. त्यासाठी आवधी मिळत होता अन् शेतकऱ्यांना चांगला दरही. त्यामुळे साठा करणारे व्यापारी आणि प्रक्रिया उद्योदक हे मोठ्या प्रमाणात मालाची खरेदी करीत होते. पण आता यावरच बंदी असल्याने त्याचा थेट परिणाम शेतकऱ्यांच्या अर्थार्जानावर होणार आहे. यापूर्वी वायद्यामुळे शेतकऱ्यांना सोयाबीनचे भविष्यात काय दर राहणार याचा अंदाज बांधता येत होता. त्यामुळे काही दिवस तरी या निर्णयाचा परिणाम थेट होणार आहे.

या शेतमीलाचा आहे समावेश

केंद्र सरकारच्या निर्णयानुसार सोयाबीन, सोयातेल, सोयापेंड, सोयाडेस्क कच्चे पामतेल, मूग, गहू, बासमती वगळून इतर भात, मोहरी, मोहरी तेल आणि हरभरा या शेतीमालाचा आता वायदा होणार नाही. यामधील हरभरा, मोहरी आणि मोहरी तेल या शेतीमालावर यापूर्वीच वायदेबंदी घालण्यात आली आहे. यामधील गव्हाचे फारसे व्यवहार हे थेट शेतकऱ्यांशी संबंधित नसतात मात्र, सोयाबीन, मूग, हरभरा, मोहरीच्या दरावर होणारा परिणाम थेट शेतकऱ्यांशी संबंधित असणार आहे.

शेतकऱ्यांचा निर्णय महत्वाचा

आतापर्यंत वाढीव दराच्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी सोयाबीनची साठवणूक केली होती. यापुढेही मोठ्या प्रमाणात आवक झाली तर दर दबावात येणार आहेत. त्यामुळे टप्प्याटप्प्याने सोयाबीनची विक्रीच फायद्याची राहणार आहे. मात्र, या निर्णयामुळे पहिल्याच दिवशी सोयाबीनचे दर हे घटले होते. एकीकडे सोयापेंडच्या आयातीचा निर्णय जरी केंद्र सरकारने घेतला नसला तरी दुसरीकडे शेतकऱ्यांच्या नुकसानीचे निर्णय सरकार घेत आहे. आतापर्यंत सोयाबीन आयातीला प्रोत्साहन, साठा मर्यदा यासारख्या अटी घालून दर पाडण्याचे काम सरकारने केले आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आवक न होऊ सोयाबीन विक्री करताना संयम पाळणे महत्वाचे आहे.

कशामुळे घेण्यात आला निर्णय

मध्यंतरी खाद्यतेलाचे दर नियंत्रणात रहावे म्हणून त्यावरील आयातशुल्क कमी करण्यात आले होते. शिवाय कडधान्यांच्या साठ्यावरही मर्य़ादा घालण्यात आली होती. एवढे करुनही दर हे नियंत्रणात राहिले नाहीत. त्यामुळे आता वायद्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. हे निर्बंध एक वर्षासाठी असून त्याचा काय परिणाम होणार हे पाहिले जाणार आहे.

संबंधित बातम्या :

Rabi Season : गव्हावरील तांबेरा रोगाचे वेळीच कार व्यवस्थापन अन्यथा होईल उत्पादनात घट

फरदड टाळा अन् आगामी हंगामातील उत्पादन वाढवा, कापूस उत्पादकांसाठी महत्वाची माहिती

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय : 2022 वर्ष ठरणार महिला शेतकऱ्यांसाठी परिवर्तनाची नांदी, कोणते विषय राज्य सरकारच्या अजेंड्यावर?

Follow Us
प्रशांत किशोर राष्ट्रवादीसोबत काम करणार की नाहीत? पार्थ पवारांनी...
प्रशांत किशोर राष्ट्रवादीसोबत काम करणार की नाहीत? पार्थ पवारांनी....
स्वत:चं मेडिकल कॉलेज, लेकाच्या नावापुढे डॉक्टर, मोटेगावकरचं स्वप्न...
स्वत:चं मेडिकल कॉलेज, लेकाच्या नावापुढे डॉक्टर, मोटेगावकरचं स्वप्न....
पंतप्रधान मोदींच्या आखाती दौऱ्यावरून पडळकरांचा मोठा दावा...
पंतप्रधान मोदींच्या आखाती दौऱ्यावरून पडळकरांचा मोठा दावा....
युद्धामुळे नितीन गडकरींच्या व्यवसायाला फटका, निर्यात रखडली; स्थानिक...
युद्धामुळे नितीन गडकरींच्या व्यवसायाला फटका, निर्यात रखडली; स्थानिक....
NEET प्रकरणी सुप्रीम कोर्टात नवी याचिका; NTA ऐवजी स्वतंत्र यंत्रणेकडून
NEET प्रकरणी सुप्रीम कोर्टात नवी याचिका; NTA ऐवजी स्वतंत्र यंत्रणेकडून.
मोठी बातमी! रोहित पवार अचानक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, राजकारणात...
मोठी बातमी! रोहित पवार अचानक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, राजकारणात....
रेल्वे प्रशासन ॲक्शन मोडमध्ये; मुंबईत अतिक्रमण हटाव मोहीम, गरीब नगरात
रेल्वे प्रशासन ॲक्शन मोडमध्ये; मुंबईत अतिक्रमण हटाव मोहीम, गरीब नगरात.
राहुल गांधींनी शेअर केला नरेंद्र मोदी यांचा परदेश दौऱ्यातील व्हिडीओ...
राहुल गांधींनी शेअर केला नरेंद्र मोदी यांचा परदेश दौऱ्यातील व्हिडीओ....
थरारक दृश्य! एक्सप्रेस रुळावरून घसरली अन् डब्बा थेट 20 फुटावर लटकला...
थरारक दृश्य! एक्सप्रेस रुळावरून घसरली अन् डब्बा थेट 20 फुटावर लटकला....
नागपूर विधानपरिषदेसाठी सर्वपक्षीय फॉर्म्युला? निवडणूक बिनविरोध.....
नागपूर विधानपरिषदेसाठी सर्वपक्षीय फॉर्म्युला? निवडणूक बिनविरोध......