AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय : 2022 वर्ष ठरणार महिला शेतकऱ्यांसाठी परिवर्तनाची नांदी, कोणते विषय राज्य सरकारच्या अजेंड्यावर?

शेती व्यवसयात महिला शेतकऱ्यांचेही मोठे योगदान आहे. पुरुषांच्या खांद्याला-खांदा लावून महिला ह्या कष्टाची कामे करीत आहेत. तर काही महिला शेतकऱ्यांनी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून उत्पादन वाढवले आहे. आता याच महिला शेतकऱ्यांना अधिक प्रोत्साहन देण्याचे काम ठाकरे सरकार करणार आहे. आगामी वर्ष हे महिला शेतकरी सन्मान वर्ष म्हणून साजरे केले जाणार आहे.

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय : 2022 वर्ष ठरणार महिला शेतकऱ्यांसाठी परिवर्तनाची नांदी, कोणते विषय राज्य सरकारच्या अजेंड्यावर?
दादा भुसे, कृषीमंत्री
| Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Dec 20, 2021 | 6:05 PM
Share

मुंबई : शेती व्यवसयात महिला शेतकऱ्यांचेही मोठे योगदान आहे. पुरुषांच्या खांद्याला-खांदा लावून महिला ह्या कष्टाची कामे करीत आहेत. तर काही महिला शेतकऱ्यांनी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून उत्पादन वाढवले आहे. आता याच महिला शेतकऱ्यांना अधिक प्रोत्साहन देण्याचे काम (State Government) ठाकरे सरकार करणार आहे. आगामी वर्ष हे (Women Farmers) महिला शेतकरी सन्मान वर्ष म्हणून साजरे केले जाणार आहे. तसा निर्णयच राज्य सरकारने घेतला असल्याचे राज्य कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी स्पष्ट केले आहे. महाविकास आघाडी सरकारची भूमिका काय असणार आहे हे देखील कृषिमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे शेती व्यवसयाचा अणखीन विकास होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

महिला शेतकऱ्यांसाठी 30 टक्के राखीव निधी

उत्पादन वाढीच्या अनुशंगाने राज्य सरकारच्यावतीने वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात. आता यामध्येच महिला शेतकऱ्यांना अधिकची सुट देण्यात येणार आहे. कृषी योजना आणि अन्नधान्य प्रक्रिया उद्योगामध्ये महिला शेतकऱ्यांसाठी 30 टक्के निधी हा राखीव ठेवला जाणार आहे. यामुळे महिलांना त्यांच्या हक्काचे निधी तर मिळणारच आहे पण नविन उद्योगाची उभारणी केली जाणार आहे. आतापर्यंत महिला शेतकरी ह्या पुरुषांच्या बरोबरीने कष्ट करीत होत्या पण आता त्यांना स्वत:चे असे व्यवसाय उभे करता येणार आहेत. त्यासाठी राज्यसरकार प्रोत्साहन देणार आहे.

अडीच हजार कोटी विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर

गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेला पिविमा रक्कम अखेर शेतकऱ्यांच्या खात्यावद जमा होण्यास गतआठवड्यापासून सुरवात झाली आहे. आतापर्यंत 2 हजार 450 कोटी रुपये हे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेले आहेत. अजूनही काही शेतकऱ्यांचा विमा जमा होणे बाकी असून ही रक्कम प्रक्रियेत आहे. काही दिवसांमध्येच हा परतावा शेतकऱ्यांना मिळणार आहे. मध्यंतरी काही विमा कंपन्याच्या भूमिकेमुळे रक्कम अदा होण्यास अडचणी निर्माण झाल्या होत्या पण कृषी विभाग आणि राज्य सरकारने घेतलेल्या भूमिकेमुळे अखेर पिकविमा रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली आहे.

शेतकऱ्यांच्या हीतासाठी केंद्र-राज्याचे मतभेद बाजूला

केंद्र आणि राज्य सरकारमध्ये काहीही मतभेद असले तरी मात्र, शेतकऱ्यांच्या मदतीच्या दरम्यान, केंद्र आणि राज्य सरकार हे एकत्र येत आहे. आतापर्यंत अवकाळी, चक्रीवादळ यामुळे हंगामी पिकांसह फळबागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या दरम्यान, केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे मिळूनच मदतीची भूमिका ठरवतात. मध्यंतरी झालेल्या अवकाळी पावसामुळेही मोठे नुकसान झाले आहे. कृषिविभागाकडून शासनाकडे अहवाल सादर करण्यात आला आहे. त्याची पाहणी करुन लवकरच मदत जाहीर केली जाणार आहे. अवकाळीमुळे फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याचे भुसे यांनी स्पष्ट केले.

संबंधित बातम्या :

पिकांवर किडीचा प्रादुर्भाव पण मावा की तांबोरा अगोदर ‘असा’ ओळखा फरक अन् मगच व्यस्थापन करा अन्यथा…

Latur Market | सोयाबीनच्या दराला उतरती कळा, साठवणूक केलेल्या सोयाबीनचे करायचे काय?

Onion Rate | कांद्याच्या दराचा लहरीपणा, आशिया खंडातील सर्वात मोठ्या बाजारपेठेत काय आहे चित्र?

Follow Us
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून अरविंद केजरीवाल यांचं खळबळजनक वक्तव्य
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेचं दादरमध्ये आंदोलन, थेट शर्मिला ठाकरे सहभागी
प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
Prakash Ambedkar | विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल,
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल, दिल्लीत नेमकं काय घडतंय?
शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
Abhijeet Dipke | शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या...
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या भेटीला
दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
मारो... मारो! दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
उद्धव ठाकरे जंतरमंतरवर दाखल, अभिजित दीपके यांची घेतली भेट, लढण्याचा दिला मंत्र….

उद्धव ठाकरे जंतरमंतरवर दाखल, अभिजित दीपके यांची घेतली भेट, लढण्याचा दिला मंत्र…

देश पहले, गाना बादमे..दिल्ली CJP लाठीमाराने व्यथित Yo Yo Honey Singh ने  गाण्याचा टीझर पुढे ढकलला….

देश पहले, गाना बादमे..दिल्ली CJP लाठीमाराने व्यथित Yo Yo Honey Singh ने गाण्याचा टीझर पुढे ढकलला…

सोनिया गांधी थेट मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात; तीन तासांनंतर राहुल गांधी, प्रियंका गांधींची सुटका, काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक.

सोनिया गांधी थेट मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात; तीन तासांनंतर राहुल गांधी, प्रियंका गांधींची सुटका, काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक

CJP Vijeta Dahiya : विजेता दहिया बर्गर खाताना दिसले, कॉकरोच जनता पार्टीने प्रवक्तेपदावरून हटवलं, व्हिडीओची चर्चा!.

CJP Vijeta Dahiya : विजेता दहिया बर्गर खाताना दिसले, कॉकरोच जनता पार्टीने प्रवक्तेपदावरून हटवलं, व्हिडीओची चर्चा!

राहुल गांधी खाली पडले, पोलिसांची उचलण्यासाठी धडपड, अन् झपकन उचलले; पाहा व्हिडीओ.

राहुल गांधी खाली पडले, पोलिसांची उचलण्यासाठी धडपड, अन् झपकन उचलले; पाहा व्हिडीओ

बॉलिवूडने टॉलिवूडकडून काय शिकावं? प्रसिद्ध अभिनेत्रीने सलमानचं नाव घेऊन सगळं सांगितलं!.

बॉलिवूडने टॉलिवूडकडून काय शिकावं? प्रसिद्ध अभिनेत्रीने सलमानचं नाव घेऊन सगळं सांगितलं!