ठाकरे सरकारचा मोठा निर्णय : 2022 वर्ष ठरणार महिला शेतकऱ्यांसाठी परिवर्तनाची नांदी, कोणते विषय राज्य सरकारच्या अजेंड्यावर?

शेती व्यवसयात महिला शेतकऱ्यांचेही मोठे योगदान आहे. पुरुषांच्या खांद्याला-खांदा लावून महिला ह्या कष्टाची कामे करीत आहेत. तर काही महिला शेतकऱ्यांनी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून उत्पादन वाढवले आहे. आता याच महिला शेतकऱ्यांना अधिक प्रोत्साहन देण्याचे काम ठाकरे सरकार करणार आहे. आगामी वर्ष हे महिला शेतकरी सन्मान वर्ष म्हणून साजरे केले जाणार आहे.

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय : 2022 वर्ष ठरणार महिला शेतकऱ्यांसाठी परिवर्तनाची नांदी, कोणते विषय राज्य सरकारच्या अजेंड्यावर?
दादा भुसे, कृषीमंत्री
Follow us
| Updated on: Dec 20, 2021 | 6:05 PM

मुंबई : शेती व्यवसयात महिला शेतकऱ्यांचेही मोठे योगदान आहे. पुरुषांच्या खांद्याला-खांदा लावून महिला ह्या कष्टाची कामे करीत आहेत. तर काही महिला शेतकऱ्यांनी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून उत्पादन वाढवले आहे. आता याच महिला शेतकऱ्यांना अधिक प्रोत्साहन देण्याचे काम (State Government) ठाकरे सरकार करणार आहे. आगामी वर्ष हे (Women Farmers) महिला शेतकरी सन्मान वर्ष म्हणून साजरे केले जाणार आहे. तसा निर्णयच राज्य सरकारने घेतला असल्याचे राज्य कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी स्पष्ट केले आहे. महाविकास आघाडी सरकारची भूमिका काय असणार आहे हे देखील कृषिमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे शेती व्यवसयाचा अणखीन विकास होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

महिला शेतकऱ्यांसाठी 30 टक्के राखीव निधी

उत्पादन वाढीच्या अनुशंगाने राज्य सरकारच्यावतीने वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात. आता यामध्येच महिला शेतकऱ्यांना अधिकची सुट देण्यात येणार आहे. कृषी योजना आणि अन्नधान्य प्रक्रिया उद्योगामध्ये महिला शेतकऱ्यांसाठी 30 टक्के निधी हा राखीव ठेवला जाणार आहे. यामुळे महिलांना त्यांच्या हक्काचे निधी तर मिळणारच आहे पण नविन उद्योगाची उभारणी केली जाणार आहे. आतापर्यंत महिला शेतकरी ह्या पुरुषांच्या बरोबरीने कष्ट करीत होत्या पण आता त्यांना स्वत:चे असे व्यवसाय उभे करता येणार आहेत. त्यासाठी राज्यसरकार प्रोत्साहन देणार आहे.

अडीच हजार कोटी विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर

गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेला पिविमा रक्कम अखेर शेतकऱ्यांच्या खात्यावद जमा होण्यास गतआठवड्यापासून सुरवात झाली आहे. आतापर्यंत 2 हजार 450 कोटी रुपये हे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेले आहेत. अजूनही काही शेतकऱ्यांचा विमा जमा होणे बाकी असून ही रक्कम प्रक्रियेत आहे. काही दिवसांमध्येच हा परतावा शेतकऱ्यांना मिळणार आहे. मध्यंतरी काही विमा कंपन्याच्या भूमिकेमुळे रक्कम अदा होण्यास अडचणी निर्माण झाल्या होत्या पण कृषी विभाग आणि राज्य सरकारने घेतलेल्या भूमिकेमुळे अखेर पिकविमा रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली आहे.

शेतकऱ्यांच्या हीतासाठी केंद्र-राज्याचे मतभेद बाजूला

केंद्र आणि राज्य सरकारमध्ये काहीही मतभेद असले तरी मात्र, शेतकऱ्यांच्या मदतीच्या दरम्यान, केंद्र आणि राज्य सरकार हे एकत्र येत आहे. आतापर्यंत अवकाळी, चक्रीवादळ यामुळे हंगामी पिकांसह फळबागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या दरम्यान, केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे मिळूनच मदतीची भूमिका ठरवतात. मध्यंतरी झालेल्या अवकाळी पावसामुळेही मोठे नुकसान झाले आहे. कृषिविभागाकडून शासनाकडे अहवाल सादर करण्यात आला आहे. त्याची पाहणी करुन लवकरच मदत जाहीर केली जाणार आहे. अवकाळीमुळे फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याचे भुसे यांनी स्पष्ट केले.

संबंधित बातम्या :

पिकांवर किडीचा प्रादुर्भाव पण मावा की तांबोरा अगोदर ‘असा’ ओळखा फरक अन् मगच व्यस्थापन करा अन्यथा…

Latur Market | सोयाबीनच्या दराला उतरती कळा, साठवणूक केलेल्या सोयाबीनचे करायचे काय?

Onion Rate | कांद्याच्या दराचा लहरीपणा, आशिया खंडातील सर्वात मोठ्या बाजारपेठेत काय आहे चित्र?

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.