AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nanded : पीक पध्दतीमध्ये बदल अन् उत्पादनात वाढ, नांदेडच्या शेतकऱ्याने करुन दाखवलं!

इकळीमोर येथील गणपत मोरे यांनी हंगामाच्या सुरवातीला सोयाबीन त्यानंतर हरभरा आणि आता तीळाचे पीक घेतले आहे. पाण्याचे योग्य नियोजन आणि वेळोवेळी मशागतीची कामे केल्याने हे शक्य झाले आहे. शिवाय आहे पाणी म्हणून त्याचा अपव्यय न करता योग्य व्यवस्थापन करुन त्यांनी ही पीके जोपासली आहेत. एकीकडे निसर्गाचा लहरीपणा आणि होणारे नुकसान यामुळे शेतकरी त्रस्त आहे. अशातच गणपत मोरे यांनी जो अभिनव उपक्रम केला आहे

Nanded : पीक पध्दतीमध्ये बदल अन् उत्पादनात वाढ, नांदेडच्या शेतकऱ्याने करुन दाखवलं!
नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्याने एका वर्षात तीन पिकांचे उत्पादन घेतले आहे. Image Credit source: TV9 Marathi
Reporter Rajiv Giri
Reporter Rajiv Giri | Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: May 13, 2022 | 10:11 AM
Share

नांदेड : पारंपरिक पीक पध्दतीने दिवसेंदिवस (Production) उत्पादनात घटच होते. मात्र, काळाच्या ओघात शेती (Crop Change) पध्दतीमध्ये बदल होत आहे. उत्पादन वाढीसाठी शेतकरी वेगवेगळे प्रयोग राबवत आहे. (Nanded) जिल्ह्यातील इकळीमोर येथील शेतकऱ्याने वर्षभरात एक नाही..दोन नाही तर तीन पीके घेऊन भरघोस उत्पन्न मिळवले आहे. पोषक वातावरण आणि मुबलक पाणी असल्यावर काय होते हे गणपत मोरे यांनी दाखवून दिले आहे. हंगमानुसार पीक पध्दतीमध्ये बदल करुन तीन पिकांचे उत्पादन तर घेतलेच आहे पण ते ही सरासरीपेक्षा अधिक. सध्याच्या प्रतिकूल परस्थितीमध्ये त्यांनी राबवलेला उपक्रम हा इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. विशेष म्हणजे कुणाच्या मार्गदर्शानाशिवाय त्यांनी हा प्रयोग केला आणि यशस्वीही करुन दाखविला.

एका वर्षात तीन पिकांचे उत्पादन

इकळीमोर येथील गणपत मोरे यांनी हंगामाच्या सुरवातीला सोयाबीन त्यानंतर हरभरा आणि आता तीळाचे पीक घेतले आहे. पाण्याचे योग्य नियोजन आणि वेळोवेळी मशागतीची कामे केल्याने हे शक्य झाले आहे. शिवाय आहे पाणी म्हणून त्याचा अपव्यय न करता योग्य व्यवस्थापन करुन त्यांनी ही पीके जोपासली आहेत. एकीकडे निसर्गाचा लहरीपणा आणि होणारे नुकसान यामुळे शेतकरी त्रस्त आहे. अशातच गणपत मोरे यांनी जो अभिनव उपक्रम केला आहे त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

एकच पीक पध्दतीमुळे नुकसान

शेतीमध्ये अधिकचा खर्च जरी करता आला नाही तर पीक पध्दतीमध्ये बदल करुन उत्पादनात वाढ शक्य आहे. बारमाही एकच पीक घेतले तर जमिनीचा पोत खराब तर होतोच पण दिवसेंदिवस उत्पादनात घट होते. या सर्व बाबींचा अनुभव मोरे यांना आला होता. त्यामुळेच पाण्याची उपलब्धता पाहता त्यांनी हा उपक्रम केला. शिवाय तिन्हीही पिके जोमात तर होतीच पण अधिकचे उत्पादनही त्यांना मिळाले आहे.

तीळाला एकरी 10 क्विंटलचा उतारा

तीळ पिकाकडे शेतकऱ्यांचे तसे दुर्लक्ष असते. पण गणपत मोरे यांनी अंतिम टप्प्यात तीळाची निवड केली. योग्य मशागत आणि पाण्याचे नियोजन केल्याने त्यांना एकरी 10 क्विंटल उत्पन्न पदरी पडले आहे. शिवाय तीळाला अधिकचा दर असल्याने सर्वात जास्त तीळातून फायदा झाल्याचे त्यांनी ‘tv9 मराठी’ शी बोलताना सांगितले.

Follow Us
8 महिने गेले, कुणबी प्रमाणपत्र कुठे? जरांगेंचा सरकारला जळजळीत सवाल
8 महिने गेले, कुणबी प्रमाणपत्र कुठे? जरांगेंचा सरकारला जळजळीत सवाल.
मला लाथ मारून हाकलण्याचा...NCPच्या आणखी एका नेत्याने बोलून दाखवली खंत
मला लाथ मारून हाकलण्याचा...NCPच्या आणखी एका नेत्याने बोलून दाखवली खंत.
परीक्षा रद्द, स्वप्नं उद्ध्वस्त; 3 विद्यार्थ्यांनी उचललं टोकाचं पाऊल
परीक्षा रद्द, स्वप्नं उद्ध्वस्त; 3 विद्यार्थ्यांनी उचललं टोकाचं पाऊल.
मिसिंग लिंकवर मृत्यूचा थरार; बसची वाहनांना जोरदार धडक आणि क्षणार्धात..
मिसिंग लिंकवर मृत्यूचा थरार; बसची वाहनांना जोरदार धडक आणि क्षणार्धात...
राष्ट्रवादीमधील बड्या नेत्याकडून पवारांकडे पार्थ पवार यांची तक्रार
राष्ट्रवादीमधील बड्या नेत्याकडून पवारांकडे पार्थ पवार यांची तक्रार.
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत.
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात....
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च....
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह.........
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध.......