AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Washim : रासायनिक खतासाठी जिल्हाधिकाऱ्यांनाच शेणखताची बॅग, वाशिममध्ये मनसे ‘स्टाईल’ आंदोलन

कृषी विभागाने खत आणि बियाणांचा मागणी तेवढा पुरवठा केला असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, स्थानिक पातळीवर चित्र हे वेगळेच आहे. खताचा कृत्रिम तुटवडा निर्माण करुन किंवा लिंकिग पध्दतीने खत विक्री करुन शेतकऱ्यांची लूट केली जात आहे. पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी चिंतेत असचतानाच आता कृषी केंद्रातूनही लूट केली जात असल्याने मनसेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.

Washim : रासायनिक खतासाठी जिल्हाधिकाऱ्यांनाच शेणखताची बॅग, वाशिममध्ये मनसे 'स्टाईल' आंदोलन
रासायनिक खताचा कृत्रिम तुटवडा भासवला जात असल्याने मनसे च्या वतीने वाशिममध्ये आंदोलन करण्यात आले.Image Credit source: TV9 Marathi
| Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Jun 17, 2022 | 3:51 PM
Share

वाशिम : सध्या खरीप पेरणीपेक्षा अधिकची चर्चा आहे ती (Chemical Fertilizer) रासायनिक खत आणि बोगस बियणांची. आतापर्यंत अनेक ठिकाणी कारवायाही झाल्या आहेत. शिवाय कारवाईच्या अनुशंगाने (Agricultural Department) कृषी विभागाने तालुकानिहाय भरारी पथकाची नेमणूक केली आहे. असे असूनही वाशिम जिल्ह्यात कृत्रिम खत टंचाई केली जात आहे. साठा असूनही शेतकऱ्यांना धारेवर धरले जात आहे. (Washim) वाशिममध्ये मनसेने मात्र आपल्या स्टाईलने आंदोलन केले आहे. थेट जिल्हाधिकाऱ्यांना शेणखताची बॅग देऊन रासायनिक खताचा पुरवठा सुरळीत करण्याची मागणी आंदोलना दरम्यान केली आहे. त्यामुळे आता तरी प्रश्न मार्गी लागणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

ज्यादा दराने खताची विक्री

कृषी विभागाने खत आणि बियाणांचा मागणी तेवढा पुरवठा केला असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, स्थानिक पातळीवर चित्र हे वेगळेच आहे. खताचा कृत्रिम तुटवडा निर्माण करुन किंवा लिंकिग पध्दतीने खत विक्री करुन शेतकऱ्यांची लूट केली जात आहे. पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी चिंतेत असचतानाच आता कृषी केंद्रातूनही लूट केली जात असल्याने मनसेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देऊन शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्याची मागणी करण्यात आली.

डफडे वाजून जिल्हाधिकाऱ्यांना शेणखताची बॅग

खरीप हंगामातील पिकांच्या वाढीसाठी रासायनिक खत गरजेचे आहे. असे असताना येथील कृषी सेवा चालकांकडून कृत्रिम टंचाई निर्माण करुन रासायनिक खताच्या बॅग अधिकच्या दराने विकल्या जात आहेत. याबाबत मनसेच्या माध्यमातून अनेक वेळा आंदोलन, मोर्चे काढले आहेत. पण याकडे जिल्हा प्रशासनाचे कायम दुर्लक्ष राहिल्याने गुरुवारी मनसे पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डफडे वाजवले तर शेणखताची बॅग देऊन रासायनिक खताचा सुरळीत पुरवठा करण्याची मागणी केली आहे.

खताचा कृत्रिम तुटवडा, शेतकऱ्यांची कोंडी

जिल्ह्यातील खरीप क्षेत्राप्रमाणे रासायनिक खताचा पुरवठा झाल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे. असे असताना तुटवडा भासतोच कसा असा सवाल मनसेने उपस्थित केला आहे. याबाबत शेतकरी अनभिज्ञ असल्याचा फायदा कृषी केंद्र चालक घेत आहेत. कृषी विभागाने नेमलेल्या भरारी पथकाचा वचक या कृषी सेवा केंद्रावर राहिलेला नाही. त्यामुळे अनोख्या पध्दतीने आंदोलन करण्यात आले होते.

Follow Us
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून...
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून....
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न.
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट...
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट....
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत.
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र....
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.