AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Trade Deal : भारत-अमेरिका ट्रेड डीलमुळे शेतकऱ्यांच्या हिताला खरचं धोका आहे का? पीयूष गोयल राहुल गांधींच्या आरोपांवर काय म्हणाले?

Trade Deal : "तुम्ही त्यांना मायक्रोफोन घेऊन फिरताना, चर्चा रेकॉर्ड करताना पाहू शकता. याची स्क्रिप्ट आधीपासूनच तयार असावी. कारण त्यांनी जे काही दावे केलेत ते खोटे आहेत" असा आरोप केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी केला.

Trade Deal : भारत-अमेरिका ट्रेड डीलमुळे शेतकऱ्यांच्या हिताला खरचं धोका आहे का? पीयूष गोयल राहुल गांधींच्या आरोपांवर काय म्हणाले?
piyush goyal
| Updated on: Feb 14, 2026 | 9:42 AM
Share

भारत आणि अमेरिकेत झालेल्या ट्रेड डीलवरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दीक द्वंद सुरु आहे. यावरुन पुन्हा एकदा केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी लोकसभेत विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. काँग्रेस नेते राहुल गांधी विचारपूर्वक, बनावटी आणि खोटी कहाणी रचून शेतकऱ्यांची दिशाभूल करतायत असा आरोप पीयूष गोयल यांनी केला. शेतकरी सुरक्षित असेल, तर देशाचा विकास होईल असं सुद्धा गोयल म्हणाले. “राहुल गांधी हे काही काँग्रेस कार्यकर्त्यांच्या खांद्यावर बसले आहेत, जे स्वत:ला शेतकरी नेते भासवतात. ते पूर्णपणे आधारहीन आणि चुकीचं बोलत आहेत. तुम्ही त्यांना मायक्रोफोन घेऊन फिरताना, चर्चा रेकॉर्ड करताना पाहू शकता. याची स्क्रिप्ट आधीपासूनच तयार असावी. कारण त्यांनी जे काही दावे केलेत ते खोटे आहेत” असा आरोप केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी केला.

“भारत-अमेरिका ट्रेड डीलमध्ये मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य दिलं. शेतकऱ्यांचं हित पूर्णपणे सुरक्षित ठेवण्यात आलय” असं ठामपणे पीयूष गोयल यांनी सांगितलं. “या ट्रेड डीलमुळे शेतकरी, मच्छीमार, मेहनती युवावर्ग, MSMEs, स्टार्टअप्स, कारागिर यांना मदत होणार आहे. सोयाबीन आणि मक्यावर कुठलीही सवलत दिलेली नाही. राहुल गांधी हे खोटं बोलून शेतकऱ्यांना घाबरवण्याचा प्रयत्न करतायत” असं पीयूष गोयल म्हणाले.

सफरचंद, अक्रोड आयातीवर काय म्हणाले?

गावच्या लोकांमध्ये विनाकारण भिती निर्माण करण्यासाठी तथ्यहीन आरोप होत असल्याबद्दल विरोधा पक्षावर टीका केली. सफरचंद आयातीच्या निर्णयावरुन सुरु असलेल्या वादावर पीयूष गोयल बोलले की, “भारत आधीपासूनच दरवर्षी 5.50 लाख टन सफरचंदांची आयात करत आला आहे. कारण देशांतर्गत उत्पादनातून 80 टक्के मागणी पूर्ण होते. आम्ही सफरचंदांच्या अमर्यादा आयातीला परवानगी दिलेली नाही. आम्ही फक्त एक कोटा दिलाय, जो सध्याच्या आयातीपेक्षा पण कमी आहे. त्यावर सुद्धा 25 रुपयाची ड्युटी लागेल”

“अक्रोड आयतीच्या बाबतीत सुद्धा असच आहे. भारत वर्षाला 60 हजार मेट्रिक टन अक्रोड आयात करतो. त्यातला 13,000 मेट्रिक टनचा फार कमी कोटा दिलाय. अशा सौद्यामुळे स्थानिक उत्पादकांचं नुकसान होण्याची शक्यता कमी आहे” असं गोयल म्हणाले.

जुन्या रेकॉर्डवर हल्लाबोल

काँग्रेसवर निशाणा साधताना पीयूष गोयल यांनी त्यांच्या जुन्या रेकॉर्डवर हल्लाबोल केला. “काँग्रेसच्या नेतृत्वाखाली UPA राजवटीत भारताने जवळपास 20 अब्ज डॉलर्सचं शेती सामान आयात केलं होतं. यात डेअरी उत्पादनं सुद्धा होती” याची आठवण गोयल यांनी करुन दिली. US सोबतच्या ट्रेड डीलमध्ये भारताने डेअरी उत्पादनांना बाहेर ठेवलं आहे. “शेतकऱ्यांसोबत त्यांनी धोका केला, त्या बद्दल राहुल गांधी यांनी बोलावं. विरोधी पक्ष कधीपर्यंत अशा कपोलकल्पित गोष्टी पसवरणार? शेतकरी सुरक्षित तर देश विकसित होईल” असही गोयल बोलले.

Follow Us
हृदयद्रावक घटना! घरासमोर खेळत होता... उघड्या खड्ड्याने घेतला जीव
हृदयद्रावक घटना! घरासमोर खेळत होता... उघड्या खड्ड्याने घेतला 2 वर्षांच्या सोहमचा जीव
मुसळधार पावसाचा कहर; नवी मुंबईतील सर्व शाळांना सुट्टी जाहीर
ब्रेकिंग! मुसळधार पावसाचा कहर; नवी मुंबईतील दुपारच्या सत्रातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर
पुणे-रायगडमध्ये पावसाचा हाहाकार! हवामान विभागाचा रेड अलर्ट; रस्ते जलमय
Rain Update | पुणे-रायगडमध्ये पावसाचा हाहाकार! हवामान विभागाचा रेड अलर्ट; रस्ते जलमय
उद्धव ठाकरे पुन्हा हिंदुत्वाच्या रणांगणात! पत्रकार परिषदेत मोठी घोषणा
Uddhav Thackeray UNCUT | उद्धव ठाकरे पुन्हा हिंदुत्वाच्या रणांगणात! पत्रकार परिषदेत मोठी घोषणा; येत्या रविवारी...
अमित साटम की चाटम? साटम यांच्या हकालपट्टीची थेट संजय राऊतांकडून मागणी!
Sanjay Raut Press | अमित साटम की चाटम? मृत्यूंवर हसणं महागात पडणार; अमित साटम यांच्या हकालपट्टीची थेट संजय राऊतांकडून मागणी!
महाराष्ट्रात लागू होणार समान नागरी कायदा? अधिवेशनाकडे राज्याचे लक्ष
महाराष्ट्रात लागू होणार समान नागरी कायदा? फडणवीस सरकारच्या मोठ्या हालचाली सुरू; आजच्या अधिवेशनाकडे राज्याचे लक्ष
पालखीपूर्वी इंद्रायणीला प्रदूषणाचा विळखा! वारकऱ्यांचा संताप अनावर
Indrayani River | पालखीपूर्वी इंद्रायणीला प्रदूषणाचा विळखा! फेसाळलेल्या नदीने वारकऱ्यांचा संताप अनावर
कोल्हापूरमध्ये धोक्याची घंटा! पंचगंगा दुथडी भरून वाहतेय; 3 बंधारे...
Kolhapur Rain Update | कोल्हापूरमध्ये धोक्याची घंटा! पंचगंगा दुथडी भरून वाहतेय; 3 बंधारे पाण्याखाली, नागरिकांचा जीव मुठीत घेऊन प्रवास सुरूच...
पावसामुळे विधानसभेचे कामकाज ठप्प! मंत्रीच पोहोचले नाहीत, सभा तहकूब
Mumai Rain Update | पावसामुळे विधानसभेचे कामकाज ठप्प! मंत्रीच पोहोचले नाहीत, सभा तहकूब
आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?
Poladpur | आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?