AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Trade Deal : भारत-अमेरिका ट्रेड डीलमुळे शेतकऱ्यांच्या हिताला खरचं धोका आहे का? पीयूष गोयल राहुल गांधींच्या आरोपांवर काय म्हणाले?

Trade Deal : "तुम्ही त्यांना मायक्रोफोन घेऊन फिरताना, चर्चा रेकॉर्ड करताना पाहू शकता. याची स्क्रिप्ट आधीपासूनच तयार असावी. कारण त्यांनी जे काही दावे केलेत ते खोटे आहेत" असा आरोप केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी केला.

Trade Deal : भारत-अमेरिका ट्रेड डीलमुळे शेतकऱ्यांच्या हिताला खरचं धोका आहे का? पीयूष गोयल राहुल गांधींच्या आरोपांवर काय म्हणाले?
piyush goyal
| Updated on: Feb 14, 2026 | 9:42 AM
Share

भारत आणि अमेरिकेत झालेल्या ट्रेड डीलवरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दीक द्वंद सुरु आहे. यावरुन पुन्हा एकदा केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी लोकसभेत विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. काँग्रेस नेते राहुल गांधी विचारपूर्वक, बनावटी आणि खोटी कहाणी रचून शेतकऱ्यांची दिशाभूल करतायत असा आरोप पीयूष गोयल यांनी केला. शेतकरी सुरक्षित असेल, तर देशाचा विकास होईल असं सुद्धा गोयल म्हणाले. “राहुल गांधी हे काही काँग्रेस कार्यकर्त्यांच्या खांद्यावर बसले आहेत, जे स्वत:ला शेतकरी नेते भासवतात. ते पूर्णपणे आधारहीन आणि चुकीचं बोलत आहेत. तुम्ही त्यांना मायक्रोफोन घेऊन फिरताना, चर्चा रेकॉर्ड करताना पाहू शकता. याची स्क्रिप्ट आधीपासूनच तयार असावी. कारण त्यांनी जे काही दावे केलेत ते खोटे आहेत” असा आरोप केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी केला.

“भारत-अमेरिका ट्रेड डीलमध्ये मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य दिलं. शेतकऱ्यांचं हित पूर्णपणे सुरक्षित ठेवण्यात आलय” असं ठामपणे पीयूष गोयल यांनी सांगितलं. “या ट्रेड डीलमुळे शेतकरी, मच्छीमार, मेहनती युवावर्ग, MSMEs, स्टार्टअप्स, कारागिर यांना मदत होणार आहे. सोयाबीन आणि मक्यावर कुठलीही सवलत दिलेली नाही. राहुल गांधी हे खोटं बोलून शेतकऱ्यांना घाबरवण्याचा प्रयत्न करतायत” असं पीयूष गोयल म्हणाले.

सफरचंद, अक्रोड आयातीवर काय म्हणाले?

गावच्या लोकांमध्ये विनाकारण भिती निर्माण करण्यासाठी तथ्यहीन आरोप होत असल्याबद्दल विरोधा पक्षावर टीका केली. सफरचंद आयातीच्या निर्णयावरुन सुरु असलेल्या वादावर पीयूष गोयल बोलले की, “भारत आधीपासूनच दरवर्षी 5.50 लाख टन सफरचंदांची आयात करत आला आहे. कारण देशांतर्गत उत्पादनातून 80 टक्के मागणी पूर्ण होते. आम्ही सफरचंदांच्या अमर्यादा आयातीला परवानगी दिलेली नाही. आम्ही फक्त एक कोटा दिलाय, जो सध्याच्या आयातीपेक्षा पण कमी आहे. त्यावर सुद्धा 25 रुपयाची ड्युटी लागेल”

“अक्रोड आयतीच्या बाबतीत सुद्धा असच आहे. भारत वर्षाला 60 हजार मेट्रिक टन अक्रोड आयात करतो. त्यातला 13,000 मेट्रिक टनचा फार कमी कोटा दिलाय. अशा सौद्यामुळे स्थानिक उत्पादकांचं नुकसान होण्याची शक्यता कमी आहे” असं गोयल म्हणाले.

जुन्या रेकॉर्डवर हल्लाबोल

काँग्रेसवर निशाणा साधताना पीयूष गोयल यांनी त्यांच्या जुन्या रेकॉर्डवर हल्लाबोल केला. “काँग्रेसच्या नेतृत्वाखाली UPA राजवटीत भारताने जवळपास 20 अब्ज डॉलर्सचं शेती सामान आयात केलं होतं. यात डेअरी उत्पादनं सुद्धा होती” याची आठवण गोयल यांनी करुन दिली. US सोबतच्या ट्रेड डीलमध्ये भारताने डेअरी उत्पादनांना बाहेर ठेवलं आहे. “शेतकऱ्यांसोबत त्यांनी धोका केला, त्या बद्दल राहुल गांधी यांनी बोलावं. विरोधी पक्ष कधीपर्यंत अशा कपोलकल्पित गोष्टी पसवरणार? शेतकरी सुरक्षित तर देश विकसित होईल” असही गोयल बोलले.

Follow Us
परभणीतील गोदावरी नदीपात्राला नाल्याचं रुप, नागरिकांकडून सांडपाण्यतच..
परभणीतील गोदावरी नदीपात्राला नाल्याचं रुप, नागरिकांकडून सांडपाण्यतच...
निवडणूक आयोग पत्र प्रकरणात पार्थ पवार मैदानात
निवडणूक आयोग पत्र प्रकरणात पार्थ पवार मैदानात.
पुण्यात अवकाळी पावसाचा जोर; ढगांच्या गडगडाटासह सोसाट्याचा वारा
पुण्यात अवकाळी पावसाचा जोर; ढगांच्या गडगडाटासह सोसाट्याचा वारा.
नाशिक हादरलं, स्कूल व्हॅन चालकाचं काळं कृत्य समोर, 9 अल्पवयीन मुलींना.
नाशिक हादरलं, स्कूल व्हॅन चालकाचं काळं कृत्य समोर, 9 अल्पवयीन मुलींना..
सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून धनगर समाजाचे आंदोलन
सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून धनगर समाजाचे आंदोलन.
अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट, थेट रुपाली चाकणकरांच्या बहिणीचं नाव समो
अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट, थेट रुपाली चाकणकरांच्या बहिणीचं नाव समो.
लातूरमध्ये अवकाळीचा मोठा फटका, वादळी वाऱ्यासह गारपीठमुळे मोठं नुकसान
लातूरमध्ये अवकाळीचा मोठा फटका, वादळी वाऱ्यासह गारपीठमुळे मोठं नुकसान.
महिलेची तक्रार येताच कोर्टाने विचारलं... भोंदू खरातने हातच जोडले
महिलेची तक्रार येताच कोर्टाने विचारलं... भोंदू खरातने हातच जोडले.
प्रफुल पटेलांच्या प्रश्नावर सुनेत्रा पवारांचा नकार; निवडणूक आयोगाला...
प्रफुल पटेलांच्या प्रश्नावर सुनेत्रा पवारांचा नकार; निवडणूक आयोगाला....
भोंदू अशोक खरातला कोर्टात व्हीसीद्वारे हजर करणार, कारण...
भोंदू अशोक खरातला कोर्टात व्हीसीद्वारे हजर करणार, कारण....