शेतकऱ्यांना वार्षिक 10 हजार रुपये देणार, ‘या’ राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्यातील शेतकऱ्यांना वार्षिक 10 हजार रुपयांची रक्क्म देण्याची घोषणा केली आहे.

शेतकऱ्यांना वार्षिक 10 हजार रुपये देणार, 'या' राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय
शेतकरी
Follow us
| Updated on: Jun 10, 2021 | 7:14 PM

कोलकाता: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्यातील शेतकऱ्यांना वार्षिक 10 हजार रुपयांची रक्क्म देण्याची घोषणा केली आहे. ममता बॅनर्जी यांनी निवडणुकीच्या प्रचारादरम्यान हे आश्वासन दिलं होतं. पश्चिम बंगालच्या राज्य सचिवालयात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. शेतकऱ्यांना कृषक बंधू योजनेअंतर्गत दरवर्षी 5 हजार रुपये दिले जात होते. ममता बॅनर्जी यांनी यामध्ये 5 हजार रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. तर दुसरकीकडे ज्या शेतकऱ्यांकडे एक एकरपेक्षा कमी जमीन असेल त्यांना आता 4 हजार रुपये दिले जाणार आहेत. त्यांना यापूर्वी 2 हजार रुपये दिले जातात. (CM Mamata Banerjee will give 10 thousand rupees every year to the farmers of Bengal, cabinet meeting approved)

विधानसभा निवडणुकीदरम्यान घोषणा

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमत्री अमित शाह यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर पीएम किसान सन्मान योजनेच्यावरुन टीकास्त्र सोडलं होतं. ममता बॅनर्जी केंद्र सरकार आणि पश्चिम बंगालचे शेतकरी यांच्यामध्ये अडथळा आणत असल्याचा आरोप करण्यात आला होता. नरेंद्र मोदी यांनी बंगालमध्ये भाजपचं सरकार आल्यास पीएम किसान योजनेचा लाभ देणार असल्याचं जाहीर केलं होतं.

पश्चिम बंगालच्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा पहिल्यांदा लाभ

पश्चिम बंगालच्या शेतकऱ्यांना पीएमक किसान सन्मान योजनेचे 2 हजार रुपये मिळण्यास सुरुवात झाली आहे. या योजनेअंतर्गत केंद्र सरकार प्रत्येकवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यावर 6 हजार रुपये पाठवते.

पश्चिम बंगालच्या 10 लाख शेतकऱ्यांना लाभ मिळणार

केंद्रीय कृषी मंत्रालयानं पाठवलेल्या एका पत्राचा ममता बॅनर्जी यांनी संदर्भ दिला आहे. या पत्राद्वारे पश्चिम बंगालच्या 21.79 लाख शेतकऱ्यांनी नोंदणी केल्याची माहिती मिळाली होती. यामधील 14 लाख 91 हजार शेतकऱ्यांची माहिती अपलोड करण्यात आलेली आहे. यापैकी 9.84 लाख शेतकऱ्यांचा डाटा पीएफएमएससाठी तयार असल्याची माहिती त्यांन दिली.

संबंधित बातम्या:

शेतकऱ्यांनो, 17 जूनपर्यंत पेरण्या टाळा, कृषी विभागाचं आवाहन, 5 दिवस धुवाँधार पावसाचे

मान्सून दाखल, महाबीज शेतकऱ्यांना बियाण्याचं वाटप कधी करणार? रासायनिक खतांचाही तुटवडा

CM Mamata Banerjee will give 10 thousand rupees every year to the farmers of Bengal  cabinet meeting approved

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.