AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेतील पात्रतेबाबत ‘अफवा अन् वास्तव’

अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्यापही 9 वाच हप्ता जमा झालेला आहे. (PM KISAN SANMAN NIDHI YOJNA) त्यामुळे रखडलेला हप्ता जमा होणार की नाही, शेतकरी असलेल्या पती-पत्नी या दोघांनाही आता सन्मान निधीचा लाभ मिळणार अशा एक ना अनेक चर्चा ग्रामीण भागात होत आहेत. मात्र, यामागचे सत्य काय हे जाणून घेणेही तेवढेच महत्वाचे आहे...शिवाय कागदपत्रांची पूर्तता न केल्यानेही अनेकांच्या खात्यावर 9व्या हप्त्याची रक्कम जमा झालेली नाही

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेतील पात्रतेबाबत 'अफवा अन् वास्तव'
किसान सन्मान योजनेचे संग्रहीत छायाचित्र
| Edited By: | Updated on: Oct 11, 2021 | 12:20 PM
Share

मुंबई : पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेतील 10 वा हप्ता हा काही दिवसांमध्येच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. पण अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्यापही 9 वाच हप्ता जमा झालेला आहे. (PM KISAN SANMAN NIDHI YOJNA) त्यामुळे रखडलेला हप्ता जमा होणार की नाही, शेतकरी असलेल्या पती-पत्नी या दोघांनाही आता सन्मान निधीचा लाभ मिळणार अशा एक ना अनेक चर्चा ग्रामीण भागात होत आहेत. मात्र, यामागचे सत्य काय हे जाणून घेणेही तेवढेच महत्वाचे आहे… (Farmer) शिवाय कागदपत्रांची पूर्तता न केल्यानेही अनेकांच्या खात्यावर 9व्या हप्त्याची रक्कम जमा झालेली नाही

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत सरकार शेतकऱ्यांच्या खात्यात वार्षिक 6000 रुपये म्हणजेच 2000 रुपयांचे तीन हप्ते जमा होतात. 10 वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. दिवाळीपूर्वीच हप्ता देण्याचा मानस सरकारचा आहे. पण, 9 वा हप्ता आतापर्यंत अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात आलेला नाही. यातच पती-पत्नी या दोघांच्याही खात्यावर पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी होणार का असा सवाल उपस्थित होत आहे. पण पती-पत्नीपैकी केवळ एकाजणाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

तर योजनेचा लाभ मिळणार नाही..

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा लाभ पती-पत्नी दोघांनाही घेता येत नाही. जप बनावट कागदपत्रे करुन असा लाभ घेण्याचा प्रयत्न करण्यात आला तर ती फसवणूक असल्याचे संबोधले जाणार आहे. एखाद्या शेतकऱ्याने कुटुंबात कर भरला तर या योजनेचा लाभ मिळणार नाही. म्हणजे गेल्या वर्षी पती किंवा पत्नीने आयकर भरला असेल तर त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.

अपात्र कोण?

जर एखादा शेतमजूर हा इतर कोणाच्यातरी शेतामध्ये काम करीत आहे. पण ती शेती त्याच्या मालकिची नाही किंवा त्याच्या नावे सातबारा नाही अशा शेतमजूरास योजनेचा लाभ घेता येणार नाही. शेती स्व:ताच्या नावावर नसेल किंवा वडील किंवा आजोबांच्या नावाने असेल तर त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही.

यांनाही योजनेचा लाभ मिळणार नाही

राज्यातील राजकीय नेते हे अधिकतर शेतकरीच आहेत. शेतजमिन आहे पण त्याचबरोबर तो सरकारी कर्मचारी असेल किंवा निवृत्त कर्मचारी असेल तर त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. शिवाय विद्यमान किंवा माजी खासदार, आमदार, मंत्री असेल तर असे लोकही किसान योजनेच्या फायद्यासाठी अपात्र आहेत. अपात्रांच्या यादीत व्यावसायिक नोंदणीकृत डॉक्टर, अभियंते, वकील, चार्टर्ड अकाऊंटंट किंवा त्यांचे कुटुंबीय देखील आहेत. आयकर भरणाऱ्या कुटुंबांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही.

लाभ घेण्यासाठी हे लक्षात असू द्या

या योजनेअंतर्गत स्वत: ऑनलाइन अर्ज करताना फॉर्म पूर्णपणे आणि बरोबर भरा. कारण सरकारी यंत्रणेत आता उलट-तपासणे आता सोपे झाले आहे. त्यामुळे तुमच्या अर्जाची तपासणी होते. बँक खाते क्रमांक(बँक खाते) तसेच आयएफएससी कोड योग्य प्रकारे भरा. सध्याच्या स्थितीत असलेला खाते क्रमांक भरा. जमिनीचा तपशील – विशेषत: खात्याचा क्रमांक खूप काळजीपूर्वक भरणे आवश्यक आहे

या बाबींमुळे पैसे जमा झाले नसतील ते तपासून पहा

– अवैध खात्यामुळे तात्पुरते थांबवलेले असतील. पण खात्यामध्ये काही चुका झाल्या असतील तर त्या दुरुस्त केल्यावर पैसे जमा होणार आहेत. – तुम्ही दिलेला खाते क्रमांक बँकेतच नव्हता. याचा अर्थ चुकीचा खाते क्रमांक भरला आहे. – वित्त व्यवस्थापन यंत्रणेनेाध्ये तुमचा सहभागच झालेला नसेल तरीपण पैसे जमा होत नाहीत. – बँकेने जर तुमचे खाते अमान्य केले तरी पैसे जमा होणार नाहीत. – पीएफएमएस/ पीएफएमएस बँकेने शेतकरी नोंदी नाकारल्या आहेत. – नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये आधार (आधार कार्ड) जमा केले गेले नाही. – राज्य सरकारच्या वतीने दुरुस्ती प्रलंबित असेल तरी पैसे हे जमा होत नाहीत. (Conditions for availing Pradhan Mantri Kisan Samman Yojana – Rules in this way)

संबंधित बातम्या :

खरीपात झालेले नुकसान रब्बी हंगामातून भरुन काढा, पण ‘अशी’ करा पूर्वतयारी…

पेरु लागवडीतून 32 लाखांची कमाई, मुंबई ते दिल्लीच्या बाजारपेठेत विक्री, दिनेश बागड यांनी करुन दाखवलं

मशरुमच्या व्यवसायातून लाखोंची कमाई, तरुणाच्या हातालाही मिळेल रोजगार

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.