AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बाजारात फक्त कोथिंबीरीचीच चलती, “हे” आहे कारण

राज्यातील बहुतांश शहरात पालेभाज्या पुरवण्यात नाशिकच्या शेतकऱ्यांची भूमिका महत्वाची असते. ताजा आणि उत्तम दर्जाचा भाजीपाला हा नाशिकमधून निर्यात होत असतो.

बाजारात फक्त कोथिंबीरीचीच चलती, हे आहे कारण
Image Credit source: TV9 Network
| Updated on: Sep 24, 2022 | 5:03 PM
Share

नाशिक : सध्या बाजारात कोथिंबीरीला (Coriander) मोठी मागणी आहे. त्याचे कारण म्हणजे बाजार समितीत (APMC) येणाऱ्या कोथिंबीर उत्पादक शेतकऱ्यांकडून आवक घटली आहे. त्यामुळे कोथिंबीरचे भाव गडगडले आहे. नाशिकच्या (Nashik) बाजार समितीत शुक्रवारी कोथिंबीरीची जुडी 191 रुपयांना विक्री झाल्याची नोंद झाली आहे. नाशिक बाजार समितीत शुक्रवारी 657 क्विंटल कोथिंबीरीची आवक झाली होती. त्यात गावठी कोथिंबीरीला जास्तीची मागणी आहे. गेल्या आठवड्यात नाशिक जिल्ह्यात संततधार सुरूच असल्याने पालेभाज्या शेतातच सडल्याचे चित्र होते. त्यामुळे पालेभाज्या तेजीत असणार याचा अंदाज व्यापऱ्यांसह शेतकऱ्यांना होताच. पण कोथिंबीरच्या भावात झालेली उच्चांकी दर बाजारसमितीत मोठ्या चर्चेचा विषय ठरत आहे.

राज्यातील बहुतांश शहरात पालेभाज्या पुरवण्यात नाशिकच्या शेतकऱ्यांची भूमिका महत्वाची असते. ताजा आणि उत्तम दर्जाचा भाजीपाला हा नाशिकमधून निर्यात होत असतो.

नाशिकमधील भाजीपाला हा जास्त दिवस टिकण्यासाठी, दुसऱ्या शहरात नेण्यासाठी असलेली वाहतुकीची सुलभता यामुळे व्यापारी वर्ग नाशिकला प्राधान्य देत असतो.

याच कारणामुळे नाशिकचे शेतकरी नाशिकच्या बाजार समितीत मोठ्या प्रमाणात भाजीपाला विक्रीसाठी येत असतात.

सध्या मात्र थेट व्यापारीच बांधावर जाऊन शेतमाल खरेदी करण्यावर भर देत असले तरी बाजार समितीत येणाऱ्या भाजीपाल्याची आवक कमी झाल्याने व्यापारी देखील हतबल झाले आहे.

पितृपक्षात देखील पालेभाज्या महागल्या होत्या त्यावेळी देखील मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे झालेले नुकसान हे प्रमुख कारण होते, परंतु महिना उलटून गेला तरी परिस्थिती कायम आहे.

कोथिंबीरीची सध्याची परिस्थिति पाहता बोटावर मोजण्या इतकेच शेतकरी बाजार समितीत येत असल्याने कोथिंबीरीला विक्रमी भाव मिळत आहे.

मुसळधार पावसाने शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान झाल्याने मोजक्याच शेतकऱ्यांना याचा फायदा होत असला तरी किरकोळ बाजारातील ग्राहकांना आणखी अधिकचे पैसे मोजावे लागणार आहे.

Follow Us
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक.
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली.
रिलायन्स इंडस्ट्रीची अमेरिकेत गुंतवणूक, संजय राऊत यांचा हल्लाबोल
रिलायन्स इंडस्ट्रीची अमेरिकेत गुंतवणूक, संजय राऊत यांचा हल्लाबोल.
व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा; हॉटेल व्यवसाय आणि उद्योग अडचणीत
व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा; हॉटेल व्यवसाय आणि उद्योग अडचणीत.
मिठी नदीच्या नाल्यातून गॅस निर्मितीचा प्रकल्प उभारा, उद्घाटनाला...
मिठी नदीच्या नाल्यातून गॅस निर्मितीचा प्रकल्प उभारा, उद्घाटनाला....
मध्यपूर्वेतील युद्धाचा इंधन पुरवठ्यावर परिणाम; ESMA कायदा लागू
मध्यपूर्वेतील युद्धाचा इंधन पुरवठ्यावर परिणाम; ESMA कायदा लागू.
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.