AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेतकऱ्यांच्या मनातला दर बाजारात, दोन महिन्यात 4 हजाराने वाढले कापसाचे भाव

सोयाबीन दराची जी अवस्था मराठवाड्यात आहे अगदी त्याच्या उलट स्थिती ही कापसाची खानदेशात आहे. दोन्हीही पिके खरीप हंगामातील. मध्यंतरीच्या पावसाचा फटका दोन्ही पिकांनाही बसलेलाच असे असतानाही आज पांढऱ्या कापसाला सोन्याचा दर मिळत आहे तर दुसरीकडे सोयाबीनची कवडीमोल दरात विक्री होत आहे. गेल्या दोन महिन्यात कापसाच्या दरात 4 हजार रुपयांनी वाढ झाली आहे.

शेतकऱ्यांच्या मनातला दर बाजारात, दोन महिन्यात 4 हजाराने वाढले कापसाचे भाव
संग्रहीत छायाचित्र
| Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Nov 09, 2021 | 4:52 PM
Share

जळगाव : सोयाबीन दराची जी अवस्था (Marathwada) मराठवाड्यात आहे अगदी त्याच्या उलट स्थिती ही कापसाची (Khandesh) खानदेशात आहे. दोन्हीही पिके खरीप हंगामातील. मध्यंतरीच्या पावसाचा फटका दोन्ही पिकांनाही बसलेलाच असे असतानाही ( Increase in demand for cotton) आज (record rate of cotton) पांढऱ्या कापसाला सोन्याचा दर मिळत आहे तर दुसरीकडे सोयाबीनची कवडीमोल दरात विक्री होत आहे. गेल्या दोन महिन्यात कापसाच्या दरात 4 हजार रुपयांनी वाढ झाली आहे. सध्या जिल्ह्यातील खेड खरेदी केंद्रावर कापसाला 9 हजार 200 रुपये प्रतिक्विटलचा दर मिळत आहे.

शिवाय दिवाळीनंतर दर झपाट्याने वाढत आहेत. 9 हजार याच दराची अपेक्षाही शेतकरी व्यक्त करीत होते. अखेर मनातला दर थेट बाजारात मिळत असल्याने कापसाची आवकही वाढली आहे. मध्यंतरी अवकाळी पावसामुळे कापसाच्या खरेदीत अडथळा निर्माण होतो की काय, अशी स्थिती निर्माण झाली होती. पण जळगाव, धुळे भागात कोरडे व निरभ्र वातावरण असल्याने कापूस प्रक्रियेत अडथळा आला नाही. यामुळे खेडा खरेदीदेखील सुरू राहिले होते.

कसे वाढत गेले कापसाचे दर

सप्टेंबर महिन्यात कापसाला 5 हजार 200 रुपये प्रति क्विंटलचा दर होता. मात्र, यंदा उत्पादन कमी आणि मागणी अधिकची असल्याने दर वाढणार याची खात्री होती. पण अपेक्षेपेक्षा अधिक झपाट्याने कापसाचे दर वाढले आहेत. जळगाव जिल्ह्यात कापूस खरेदी केंद्र सुरु झाले की अधिक दर वाढले आहेत. गेल्या दोन महिन्यात तब्बल 4 हजार रुपयांनी दर वाढलेले आहेत. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधान आहे. खेडा येथील खरेदी केंद्रावर आतापर्यंतचा उच्चांकी म्हणजे 9 हजार 200 चा दर मिळालेला आहे. कापूस खरेदीसाठी परराज्यातील व्यापारी आता खेड येथे दाखल होत आहेत. त्यामुळे अधिकची मागणी असल्याने दरात झपाट्याने वाढ होत आहे.

दिवसाकाठी 1 लाख क्विंटल कापसाची आवक

कापसाचे जसे दर वाढत आहेत त्याप्रमाणे आवकही वाढत आहे. 9 हजाराचा दर मिळावा ही अपेक्षा येथील शेतकरी व्यक्त करीच होते. शिवाय गेल्या दोन महिन्यांमध्ये कापसाते एकदासुध्दा दर हे कमी झाले नाहीत. उलट दिवाळीनंतर दर अधिक झपाट्याने वाढत आहेत. त्याचप्रमाणे दिवसाला 1 लाख क्विंटलची आवक आता सबंध खानदेशात होत आहे. कापूस खरेदीसाठी गुजरात, मध्यप्रदेश येथील व्यापारी दाखल होत आहेत.

शेतकऱ्यांचे नियोजन महत्वाचे आहे

कापसाला जागतिक पातळीवरही मागणी वाढत आहे. जे कापूस उत्पादक देश आहेत त्यामध्ये उत्पादनात घट झाली आहे तर मागणी वाढत आहे. त्यामुळे भविष्यातही हेच दर स्थिर राहतील किंवा यामध्ये वाढ होईल असा अंदाज व्यक्त होत आहे. मात्र, शेतकऱ्यांनी दर वाढले म्हणून आवक वाढवली तर मात्र, दरावर परिणाम होईल त्यामुळे शेतकऱ्यांनी कापसाची विक्री ही टप्प्याटप्प्याने करण्याचा सल्ला कृषितज्ञ हे देत आहेत. मात्र, 9 हजार अपेक्षित दर मिळाल्याने आता आवक वाढत आहे.

संबंधित बातम्या :

कांदा मार्केट सुरु पण दराचा ‘वांदा’ झाल्याने शेतकरी आंदोलनाच्या भूमिकेत

कांदा रोपाचे करा ‘असे’ व्यवस्थापन, तरच होईल ‘मर’ रोगापासून संरक्षण

सोयाबीनच्या दरावरच ठरतेय आवक, साठवणूक हाच शेतकऱ्यांकडे पर्याय

Follow Us
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून...
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून....
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न.
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट...
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट....
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत.
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र....
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.