AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MSP पेक्षा 15 टक्के जादा दरानं कापसाची विक्री, पाढरं सोन्याचं तीन वर्षानंतर दराचं रेकॉर्ड

पांढरे सोने म्हणून ओळखले जाणाऱ्या कापसानं यंदा शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळवून दिले आहेत. Cotton sold higher level than MS

MSP पेक्षा 15 टक्के जादा दरानं कापसाची विक्री, पाढरं सोन्याचं तीन वर्षानंतर दराचं रेकॉर्ड
कापूस
| Updated on: Mar 06, 2021 | 12:14 AM
Share

नवी दिल्ली: पांढरे सोने म्हणून ओळखले जाणाऱ्या कापसानं यंदा शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळवून दिले आहेत. जागतिक बाजारपेठेतील तेजीमुळे देशात कापसाची खरेदी एमएसपीपेक्षा 15 टक्के जादा दरानं केली जात आहे. कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष अतुल गणत्रा यांनी पांढरे सोने खऱ्या अर्थानं सोन्यासारखं ठरल्याचं म्हटलय.कापसाची किमान आधारभूत किंमत एका क्विंटलसाठी 5 हजार 825 आणि मध्यम दर्जाच्या कापसासाठी 5515 रुपये निश्चित केली आहे. मात्र, शेतकऱ्यांना गुजरातमध्ये कापसाला 6 हजार 500 रुपये दर मिळत आहे. तब्बल तीन वर्षानंतर कापसाच्या दरात तेजी पाहायला मिळाली आहे. कापसाला चांगला दर मिळाल्यानं पुढील वर्षी 10 टक्के जादा क्षेत्रावर कापसाची लागवड वाढू शकते. (Cotton sold higher level than MSP after three years what is reason)

2018 नंतर कापसाचे दर वाढले

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाचे दर 25 फेब्रुवारीला 95.57 सेट प्रति पौंड वाढले होते. तर 2018 मध्ये कापसाचा दर 11 जून 2018 रोजी सर्वाधिक 96.49 सेंट प्रति पौंड पर्यंत पोहोचले होते. गुरुवारी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाचे भाव कमी झाले असून 88 सेंट प्रति पौंड पर्यंत पोहोचले होते.

केडिया अ‌ॅडवायजरीचे संचालक अजय केडिया यांनी कापसाचे दर वाढल्याचं सांगितलं. आता नफेखोर लोक सक्रिय झाल्यानं कापसाचे दर कमी झाले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाच्या किमंती कमी झाल्यानं भारतीय बाजारपेठेतही त्याचा परिणाम दिसून आला. अतुल गणत्रा यांनी आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे दर 95 सेंटपर्यंत पोहोचले होते तेव्हा भारत आणि अमेरिकेचा कापूस यांच्यातील दरातील अंतर 14 सेंट होते ते आता कमी होऊन 7 सेंट राहिले आहे. निर्यातीत झालेली वाढ आता कमी झाली आहे.

भारत 60 लाख गाठी निर्यात करणार

अतुल गणत्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार भारतानं आतापर्यंत 34 लाख गाठींची (एक गाठ 170 किलो) निर्यात केली आहे. गणत्रा यांच्या अंदाजानुसार भारतातून 60 लाख गाठींची निर्यात होण्याची शक्यता आहे. कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाच्या अध्यक्षांच्या माहितीनुसार देशात 2020-21 मध्ये 360 लाख गाठी उत्पन्न झालं आहे. कापड मंत्रालयानं स्थापन केलेल्या समितीच्या अहवालानुसार देशात 2020-21 च्या हंगामात 371 लाख गाठी उत्पन्न होण्याचा अंदाज आहे.

संबंधित बातम्या:

आता रासायनिक खताला हिरव्या खताचा पर्याय, जाणून घ्या कसे तयार करायचे?

कोरोनाची झळ शेती-शिवारापर्यंत, बाजारपेठांमध्ये मागणीच नसल्यामुळे फुलशेती करणारे शेतकरी अडचणीत

(Cotton sold higher level than MSP after three years what is reason)

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.