AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोरोनाची झळ शेती-शिवारापर्यंत, बाजारपेठांमध्ये मागणीच नसल्यामुळे फुलशेती करणारे शेतकरी अडचणीत

बहुतांश ठिकाणच्या बाजारपेठा बंद असल्यामुळे फुलांची मागणी घटली आहे. (nanded flower farming corona pandemic)

कोरोनाची झळ शेती-शिवारापर्यंत, बाजारपेठांमध्ये मागणीच नसल्यामुळे फुलशेती करणारे शेतकरी अडचणीत
तरुण शेतकरी मोसीन अत्तार आणि त्याची फुलशेती
| Updated on: Mar 05, 2021 | 12:19 PM
Share
नांदेड : राज्यात जवळपास प्रत्येक जिल्ह्यात कोरोना रुग्णांची झपाट्याने वाढ होत आहे. याचा फटका फक्त उद्योगधंदे, व्यवसाय यांनाच बसतोय असे नाही, तर कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे शेती व्यवसायसुद्धा होरपळून जात आहे. त्यातही फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांची परिस्थिती तर अधिकच बिकट आहे. बहुतांश ठिकाणच्या बाजारपेठा बंद असल्यामुळे फुलांची मागणी घटली आहे. या कारणामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागतेय. (Nanded demand of flower has been decreased due to Corona pandemic market is closed)

कोरोनाचा बाजारपेठेवर परिणाम, फुलांना भाव नाही

देगलूर तालुक्यातील हणेगाव इथल्या मोसीन अत्तार या युवक शेतकऱ्याचीही अशीच परिस्थिती आहे. नेहमी घेतल्या जाणाऱ्या पिकाची लागवड न करता अभिनव उपक्रम राबवण्याच्या उद्देशाने या शेतकऱ्याने फुलशेती करण्याचा विचार केला. त्यांने आपल्या शेतात एका एकरामध्ये झेंडू, शेवंती, लिली अशा अनेक फुलांची लागवड केली. वेगवेगळे कार्यक्रम, समारंभांमध्ये फुलांना मोठ्या प्रमाणात मागणी असते, त्यामुळे त्याने हा पर्याय निवडला. मात्र, फुलांची विक्री करण्याची वेळ आली, तेव्हा कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलं. राज्य सरकारने कोरोना प्रतिबंधक नियम म्हणून राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये कडक निर्बंध लागू केले. याचा परिणाम बाजारपेठांवरही झाला. परिणामी फुलांना बाजारामध्ये म्हणावा तसा भाव मिळत नाहीये.  शेतीमध्ये नवनवीन पिकं घेऊन काहीतरी वेगळं करु पाहणाऱ्या मोसीन अत्तार या तरुण शेतकऱ्याच्या हाती यामुळे निराशा आली आहे. फुलांना बाजारात मागणीच नसल्यामुळे मोसीनच्या शेतातील फुलं जागेवर सडून जातायत. थोड्याबुहत प्रमाणात फुलं विकली गेली, तरी म्हणावा तसा भाव मोसीनला मिळत नाहीये.
भाव नसल्यामुळे प्रचंड नुकसान 
याविषयी बोलताना मोसीन अत्तार यांनी आपले दु:ख बोलून दाखवले आहे. “वाढत्या कोरोनाच्या अफवेमुळे फुल बाजारात जात नाहीयेत. मी एका एकरात फुल लावलेले आहेत. शेवंती, झेंडू लिली या फुलांची मी लागवड केली आहे. मात्र बाजारात भाव नसल्यामुळे प्रचंड नुकसान होत आहे,” असे मोसीन या तरुण शेतकऱ्याने म्हटले आहे.
दरम्यान, कोरोनामुळे अचानक ओढवलेल्या या संकटामुळे फुलशेती करणारे शेतकरी संकटात सापडले आहेत. शेतात फुलं असूनही त्यांना बाजारात रास्त भाव मिळत नाहीये. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.

इतर बातम्या :
(Nanded demand of flower has been decreased due to Corona pandemic market is closed)

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.