AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Eknath Shinde : पीक नुकसानीचा अहवाल तयार, शेतककऱ्यांचे लक्ष आता मदतीकडे, मराठवाड्यात होणार का घोषणा?

मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे हे प्रथमच मराठवाडा दौऱ्यावर येत आहेत. याला राजकीय पार्श्वभूमी असली तरी गेल्या महिन्याभरात खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले आहे. विदर्भानंतर सर्वाधिक नुकसान हे मराठवाड्यात झाले आहे. पीक नुकसानीसह सार्वजनिक मालमत्तेच्या पडझडीचा अहवालही विभागीय प्रशासनाने तयार केला आहे.

Eknath Shinde : पीक नुकसानीचा अहवाल तयार, शेतककऱ्यांचे लक्ष आता मदतीकडे, मराठवाड्यात होणार का घोषणा?
अतिवृष्टीने पिकाचे नुकसान झाले आता शेतकऱ्यांच्या मदतीच्या स्वरुपात काय मिळणार हे पहावे लागणार आहे.Image Credit source: TV9 Marathi
राजेंद्र खराडे
राजेंद्र खराडे | Updated on: Jul 28, 2022 | 1:39 PM
Share

औरंगाबाद :  (Heavy Rain) अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका (Marathwada) मराठावाडा आणि विदर्भातील शेती पिकाला बसलेला आहे. राज्यात 10 लाख हेक्टरावरील पिकांचे नुकसान झाले आहे तर मराठावाडा विभागातील 4 लाख हेक्टरावरील पिके बाधित झालेली आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यापूर्वी विदर्भातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली होती. तर ते आता 31 जुलै रोजी मराठवाड्यातील दौऱ्यावर येत आहेत. त्याअनुशंगाने पीक नुकसानीचा अहवाल कृषी विभागाने तयार केला आहे. आता अहवाल पाहून (CM Eknath Shinde) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मदतीची घोषणा करतात का पुन्हा अहवालाचा अभ्यास करतात हे पहावे लागणार आहे. मराठवाड्यात तब्बल 4 लाख हेक्टरावरील पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये सर्वाधिक सोयाबीन हे बाधित झाले आहे. निसर्गाच्या लहरीपणाचा सर्वाधिक फटका शेती व्यवसायाला बसलेला आहे. शिवाय आता विरोधकही मदतीवरुन आक्रमक झाले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री काय घोषणा करणार यावरच शेतकऱ्यांचे सर्वकाही अवलंबून आहे.

मुख्यमंत्री प्रथमच मराठवाड्यात..

मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे हे प्रथमच मराठवाडा दौऱ्यावर येत आहेत. याला राजकीय पार्श्वभूमी असली तरी गेल्या महिन्याभरात खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले आहे. विदर्भानंतर सर्वाधिक नुकसान हे मराठवाड्यात झाले आहे. पीक नुकसानीसह सार्वजनिक मालमत्तेच्या पडझडीचा अहवालही विभागीय प्रशासनाने तयार केला आहे. पंचनाम्यांची प्रक्रिया ही सुरु आहे तर 182 हून अधिक मंडळामध्ये अतिवृष्टी झालेली आहे. नुकसानीची दाहकता पाहता काय निर्णय होणार हे पहावे लागणार आहे.

असे आहेत नुकसानीचे आकडे

मराठवाड्यातील तब्बल 4 लाख हेक्टरावरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यापैकी 1 लाख 20 हजार 271 हेक्टरावरील पीक पंचनामे हे पूर्ण झाले आहेत. तर 182 मंडळामध्ये अतिवृष्टी झालेली आहे. अतिवृष्टीमुळे 46 जणांना आपला जीव गमवावा लागला होता तर 660 जनावरे ही दगावली आहेत. मराठवाड्यात 1 हजार 573 घरांची पडझड झाली आहे. हा सर्व अहवाल विभागीय प्रशासनाने तयार केला आहे. सर्वाधिक नुकसान हे नांदेड जिल्ह्यामध्ये झाले आहे.

आश्वासन नको, थेट मदतीची मागणी

नैसर्गिक आपत्तीनंतर राज्य सरकारकडून घोषणा तर केल्या जातात पण त्याची अंमलबजावणी होत नाही. गतवर्षी अतिवृष्टीमुळ मराठवाड्यात झालेल्या नुकासानीपोटी माजी अर्थमंत्री अजित पवार यांनी पायाभूत सुविधांसाठी 10 हजार कोटींच्या पॅकेजची घोषणा केली होती. यामधील 65 टक्के निधी अजूनही प्रशासनाला मिळालेला नाही. त्यामुळे मदतीची घोषणा करुन जखमेवर मीठ चोळण्यापेक्षा लागलीच मदत निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Follow Us
ज्या घटनेनुसार आमदार, मंत्री झाले, त्याच घटनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित
ज्या घटनेनुसार आमदार, मंत्री झाले, त्याच घटनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करता - कपिल सिब्बल
ठाकरेंची शिंदेंना सर्व पदं...कपिल सिब्बल यांचा कोर्टात 'सुप्रीम'...
ठाकरेंची शिंदेंना सर्व पदं...कपिल सिब्बल यांचा कोर्टात 'सुप्रीम' युक्तिवाद; सुनावणीत काय दाखला दिला?
ठाकरेंची शिवसेना हाच राजकीय पक्ष, सिब्बल यांचा कोर्टात सर्वात मोठा...
ठाकरेंची शिवसेना हाच राजकीय पक्ष, सिब्बल यांचा कोर्टात सर्वात मोठा युक्तिवाद!
शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीत मोठा ट्वीस्ट, निवडणुक आयोगाने...
शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीत मोठा ट्वीस्ट, आमदारांच्या अपात्रतेची वाट पाहयला... कोर्टात नेमका युक्तीवाद काय?
मी आमदारांच्या अपात्रतेबाबत... शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीत...
मी आमदारांच्या अपात्रतेबाबत... शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीच्या सुरुवातीलाच कपिल सिब्बल यांनी मांडला महत्त्वाचा मुद्दा
फडणवीसांना दिल्लीत... CM देवेंद्र फडणवीसांच्या केंद्रात जाण्याबाबत...
फडणवीसांना दिल्लीत... CM देवेंद्र फडणवीसांच्या केंद्रात जाण्याबाबत अमृता फडणवीसांच सर्वात मोठं विधान
हिंजवडीच्या वाहतूक समस्येवर आदित्य ठाकरेंचे लक्ष
आदित्य ठाकरे यांनी केली हिंजवडीतील वाहतूक कोंडी आणि मेट्रो कामाची पाहणी
संजू परब यांचे शिंदे सेना-भाजप संबंधांवर स्पष्टीकरण: वैभव नाईकांना जोर
शिंदे सेना-भाजप संघर्ष आणि निलेश राणे यांच्या कामांवरून वैभव नाईकांना प्रत्युत्तर
पुण्यातील खड्डे, औद्योगिक समस्यांचा पवारांकडून आढावा
पुण्यातील खड्डे, वाहतूक कोंडी आणि औद्योगिक समस्यांवर सुनेत्रा पवारांचे बारिक लक्ष, आढावा घेणार
नाना पटोले यांचा सरकारवर गंभीर आरोप
कुंपणच शेत खातंय.जनतेच्या पैशांची लूट, नाना पटोलेंचा घणाघात