AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

….तरीही गतवर्षीच्या तुलनेत यंदा पिकांचे नुकसान कमीच, पीक विमा योजनेतील आकडेवारी जाहीर

यंदा महाराष्ट्रात अतिवृष्टीने खरीपातील पिकांचे नुकसान झाले आहे. असे असले तरी देशात गतवर्षीपेक्षा पिकांचे नुकसान हे कमीच झाले असल्याचे सरकारने पीक विम्याच्या दाव्यांवरुन स्पष्ट केले आहे. 2020-21 मध्ये देशातून पंतप्रधान पिक विमा योजनेतून नुकसानभरपाईसाठी 9,570 कोटी रुपयांचे दावे करण्यात आले होते

....तरीही गतवर्षीच्या तुलनेत यंदा पिकांचे नुकसान कमीच, पीक विमा योजनेतील आकडेवारी जाहीर
संग्रहीत छायाचित्र
| Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Nov 01, 2021 | 4:58 PM
Share

मुंबई : यंदा महाराष्ट्रात (Maharashtra Heavy Rain) अतिवृष्टीने खरीपातील पिकांचे नुकसान झाले आहे. असे असले तरी देशात गतवर्षीपेक्षा पिकांचे नुकसान हे कमीच झाले असल्याचे सरकारने पीक विम्याच्या दाव्यांवरुन स्पष्ट केले आहे. (Pantpradhan Pik Vima Yojna). 2020-21 मध्ये देशातून पंतप्रधान पिक विमा योजनेतून नुकसानभरपाईसाठी 9,570 कोटी रुपयांचे दावे करण्यात आले होते जे 2019-20 च्या तुलनेत 60 टक्क्यांनी कमी असल्याचे सरकारी आकडेवारीवरुन समोर आले आहे. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा पिकांचे कोणतेही मोठे नुकसान झालेले नाही. असे असले तरी जे नुकसानीचे दावे करण्यात आले होते त्याला सरकारने मान्यता दिलेली आहे.

सन 2016-17 मध्ये पंतप्रधान पीक विमा योजनेत काही सुधारणा करण्यात आल्या होत्या. पीक नुकसानीचे दावे करण्यासाठी शेतकऱ्यांना पुरेसा वेळ मिळावा याकरीता ही सुधारणा करण्यात आली होती. त्याची अंमलबजावणी ही 2018 च्या रब्बी तर 2020 च्या खरीप हंगामापासून करण्यात आली होती.

खरीप हंगामात सर्वाधिक नुकसानीचे दावे

निसर्गाच्या लहरीपणामुळे खरीप हंगामातील पिकांचे अधिकचे नुकसान झालेले होते. पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत 4 कोटी 45 लाख हेक्टरावरील नुकसानीपोटी 6 कोटी 12 लाख शेतकऱ्यांनी दावे केले होते या बदल्यात 9570 कोटी रुपयांचे हे दावे होते. यापैकी 6779 कोटी रुपयांची खरीप हंगामासाठी नोंदणी झाली होती तर 2792 कोटी रुपयांची नोंदणी ही रब्बी हंगामातील पिकांसाठी झाली होती. कृषी मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले की, “गेल्या वर्षीसारखे मोठे नुकसान झाले नसल्यामुळे 2020-21 साठी 9570 कोटी रुपयांचे दावे खूपच कमी होते.”

असे झाले नुकसान कमी

2020-21 या काळात राजस्थानमधून सर्वाधिक 3602 कोटी रुपयांचे नुकसानीचे दावे दाखल झाले होते. तर दुसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्रात 1231 कोटी रुपये आणि हरियाणाचे 1112.8 कोटी रुपये नोंदविण्यात आले. 2019-20 या पीक वर्षात पीएम किसान अंतर्गत सुमारे 5.1 लाख हेक्टर वर 6.13 लाख शेतकऱ्यांनी एकूण 2,19,226 कोटी रुपयांचा विमा उतरवला होता. खरीप हंगामातून नोंदविलेले दावे 21,496 कोटी रुपयांहून अधिक होते, तर 2019-20 या पीक वर्षासाठी रब्बी हंगामासाठी 5,902 कोटी रुपये होते. 2020-21 या काळात महाराष्ट्रातील सर्वाधिक पीक विमा दाव्यांची नोंद 5,992 कोटी रुपये आणि राजस्थानमध्ये 4921 कोटी रुपये इतकी झाली. 2019-20 साठी शेतकऱ्यांचे पीक विमा दावे जवळजवळ निकाली काढण्यात आले आहेत. 1,200 कोटी रुपयांचे थकित दावे लवकरच निकाली काढले जातील. तर 2020-21 साठी सुमारे 6845 कोटी रुपयांच्या शेतकऱ्यांच्या पीक विम्याच्या दाव्यांनाही मान्यता देण्यात आली आहे, असे या अधिकाऱ्याने सांगितले. (Crop losses are less this year than last year, government releases figures)

संबंधित बातम्या :

कारखानदारांची दिवाळी, शेतकऱ्यांच मात्र दिवाळं, ‘मातोश्री’ कारखान्याकडून एका ‘मातेची’ चेष्टा

Special Story ! अतिवृष्टीतील नुकसानीच्या खुना, एकाच जिल्ह्यात 30 दिवसांमध्ये 25 शेतकऱ्यांच्या आत्महत्या

आम्हालाही दिवाळी साजरी करु द्या..! किसान सभेची संघर्ष दिंडी बीडमध्ये ; जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच ठिय्या

Follow Us
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?