AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

….तरीही गतवर्षीच्या तुलनेत यंदा पिकांचे नुकसान कमीच, पीक विमा योजनेतील आकडेवारी जाहीर

यंदा महाराष्ट्रात अतिवृष्टीने खरीपातील पिकांचे नुकसान झाले आहे. असे असले तरी देशात गतवर्षीपेक्षा पिकांचे नुकसान हे कमीच झाले असल्याचे सरकारने पीक विम्याच्या दाव्यांवरुन स्पष्ट केले आहे. 2020-21 मध्ये देशातून पंतप्रधान पिक विमा योजनेतून नुकसानभरपाईसाठी 9,570 कोटी रुपयांचे दावे करण्यात आले होते

....तरीही गतवर्षीच्या तुलनेत यंदा पिकांचे नुकसान कमीच, पीक विमा योजनेतील आकडेवारी जाहीर
संग्रहीत छायाचित्र
| Edited By: | Updated on: Nov 01, 2021 | 4:58 PM
Share

मुंबई : यंदा महाराष्ट्रात (Maharashtra Heavy Rain) अतिवृष्टीने खरीपातील पिकांचे नुकसान झाले आहे. असे असले तरी देशात गतवर्षीपेक्षा पिकांचे नुकसान हे कमीच झाले असल्याचे सरकारने पीक विम्याच्या दाव्यांवरुन स्पष्ट केले आहे. (Pantpradhan Pik Vima Yojna). 2020-21 मध्ये देशातून पंतप्रधान पिक विमा योजनेतून नुकसानभरपाईसाठी 9,570 कोटी रुपयांचे दावे करण्यात आले होते जे 2019-20 च्या तुलनेत 60 टक्क्यांनी कमी असल्याचे सरकारी आकडेवारीवरुन समोर आले आहे. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा पिकांचे कोणतेही मोठे नुकसान झालेले नाही. असे असले तरी जे नुकसानीचे दावे करण्यात आले होते त्याला सरकारने मान्यता दिलेली आहे.

सन 2016-17 मध्ये पंतप्रधान पीक विमा योजनेत काही सुधारणा करण्यात आल्या होत्या. पीक नुकसानीचे दावे करण्यासाठी शेतकऱ्यांना पुरेसा वेळ मिळावा याकरीता ही सुधारणा करण्यात आली होती. त्याची अंमलबजावणी ही 2018 च्या रब्बी तर 2020 च्या खरीप हंगामापासून करण्यात आली होती.

खरीप हंगामात सर्वाधिक नुकसानीचे दावे

निसर्गाच्या लहरीपणामुळे खरीप हंगामातील पिकांचे अधिकचे नुकसान झालेले होते. पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत 4 कोटी 45 लाख हेक्टरावरील नुकसानीपोटी 6 कोटी 12 लाख शेतकऱ्यांनी दावे केले होते या बदल्यात 9570 कोटी रुपयांचे हे दावे होते. यापैकी 6779 कोटी रुपयांची खरीप हंगामासाठी नोंदणी झाली होती तर 2792 कोटी रुपयांची नोंदणी ही रब्बी हंगामातील पिकांसाठी झाली होती. कृषी मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले की, “गेल्या वर्षीसारखे मोठे नुकसान झाले नसल्यामुळे 2020-21 साठी 9570 कोटी रुपयांचे दावे खूपच कमी होते.”

असे झाले नुकसान कमी

2020-21 या काळात राजस्थानमधून सर्वाधिक 3602 कोटी रुपयांचे नुकसानीचे दावे दाखल झाले होते. तर दुसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्रात 1231 कोटी रुपये आणि हरियाणाचे 1112.8 कोटी रुपये नोंदविण्यात आले. 2019-20 या पीक वर्षात पीएम किसान अंतर्गत सुमारे 5.1 लाख हेक्टर वर 6.13 लाख शेतकऱ्यांनी एकूण 2,19,226 कोटी रुपयांचा विमा उतरवला होता. खरीप हंगामातून नोंदविलेले दावे 21,496 कोटी रुपयांहून अधिक होते, तर 2019-20 या पीक वर्षासाठी रब्बी हंगामासाठी 5,902 कोटी रुपये होते. 2020-21 या काळात महाराष्ट्रातील सर्वाधिक पीक विमा दाव्यांची नोंद 5,992 कोटी रुपये आणि राजस्थानमध्ये 4921 कोटी रुपये इतकी झाली. 2019-20 साठी शेतकऱ्यांचे पीक विमा दावे जवळजवळ निकाली काढण्यात आले आहेत. 1,200 कोटी रुपयांचे थकित दावे लवकरच निकाली काढले जातील. तर 2020-21 साठी सुमारे 6845 कोटी रुपयांच्या शेतकऱ्यांच्या पीक विम्याच्या दाव्यांनाही मान्यता देण्यात आली आहे, असे या अधिकाऱ्याने सांगितले. (Crop losses are less this year than last year, government releases figures)

संबंधित बातम्या :

कारखानदारांची दिवाळी, शेतकऱ्यांच मात्र दिवाळं, ‘मातोश्री’ कारखान्याकडून एका ‘मातेची’ चेष्टा

Special Story ! अतिवृष्टीतील नुकसानीच्या खुना, एकाच जिल्ह्यात 30 दिवसांमध्ये 25 शेतकऱ्यांच्या आत्महत्या

आम्हालाही दिवाळी साजरी करु द्या..! किसान सभेची संघर्ष दिंडी बीडमध्ये ; जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच ठिय्या

Follow Us
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल.
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका.
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका.
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.