AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेतकऱ्यांची मंदीत संधी, लॉकडाउनच्या काळातही शेती व्यवसयात कोट्यावधींची गुंतवणूक..!

एकट्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये या काळात शेतकऱ्यांनी 4 हजार कोटींची गुंतवणूक केल्याचे वृत्त समोर आले आहे. यामध्ये खरीप हंगामासाठी सर्वाधिक कर्ज तर त्यानंतर रब्बीसाठी कर्ज घेतले आहे. त्यामुळे ही शेतकऱ्यांची गुंतवणूक आहे की गरज ते आता कर्ज परतफेडच्या दरम्यानच समोर येणार आहे.

शेतकऱ्यांची मंदीत संधी, लॉकडाउनच्या काळातही शेती व्यवसयात कोट्यावधींची गुंतवणूक..!
संग्रहीत छायाचित्र
| Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Jan 04, 2022 | 2:31 PM
Share

अहमदनगर : कोरोनामुळे निर्माण झालेल्या परस्थितीचा परिणाम सर्वच घटकांवर झाला होता. लॅाकडाऊनच्या काळात तर अने व्यवसाय बंद पडले, अनेकांच्या हाताला कामही मिळाले नाही. पण ज्याला अर्थव्यवस्थेचा कणा मानला जातो त्या शेतकऱ्यांनी या दरम्यानच्या काळात हजारो कोटींचे कर्ज घेतले आहे. एकट्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये या काळात शेतकऱ्यांनी 4 हजार कोटींची गुंतवणूक केल्याचे वृत्त समोर आले आहे. यामध्ये खरीप हंगामासाठी सर्वाधिक कर्ज तर त्यानंतर रब्बीसाठी कर्ज घेतले आहे. त्यामुळे ही शेतकऱ्यांची गुंतवणूक आहे की गरज ते आता कर्ज परतफेडच्या दरम्यानच समोर येणार आहे.

जिल्हा बॅंकांचा मिळाला शेतकऱ्यांना आधार

ग्रामीण आजही शेतकऱ्यांचे अर्थकारण हे जिल्हा मध्यवर्ती बॅंकेभोवतीच आहे. याच बॅंकाचा शेतकऱ्यांना कायम आधार मिळालेला आहे. आता नगर जिल्ह्यांमध्ये जे 4 हजार 200 कोटी रुपये कर्जवाटप झाले आहे त्यामध्ये केवळ खऱीप हंगामासाठी 2 हजार 43 कोटी रुपये हे एकट्या जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या माध्यमातून वाटप झालेले आहे. तर रब्बी हंगामात दिलेल्या लक्षांकापैकी 13 टक्के कर्ज वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कर्जवाटप करण्यामध्ये जिल्हा बॅंकांचा मोठा वाटा आहे. जिल्हा बॅंकेच्या पाठोपाठ राष्ट्रीयकृत बॅंकांनी कर्जाचे वितरण मोठ्या प्रमाणात केले आहे.

5 महिन्यांमध्ये 3 हजार कोटींचे कर्ज वितरण

एप्रिल 2021 ते सप्टेंबर या पाच महिन्याच्या कालावधीमध्ये नगर जिल्ह्यातील 4 लाख 15 हजार शेतकऱ्यांनी 3 हजार 821 कोटींचे कर्ज घेतल्याचे वृत्त एका दैनिकाने प्रकाशित केले आहे. हे कर्ज केवळ खरीप हंगामातील पिकांसाठीच होते. शेतकऱ्यांना अडचणीत आणू नका अशा सूचनाच सरकारच्या असल्याने मोठ्या प्रमाणात जिल्हा बॅंक आणि राष्ट्रीयकृ बॅंकांनी कर्जाचे वाटप केले होते. आता जूनपर्यंत याची परतफेड शेतकऱ्यांना करावी लागणार आहे. अधिकतर शेतकऱ्यांनी केवळ 3 लाखापर्यंत कर्ज घेतल्याने त्यांना व्याज भरावे लागणार नाही. तर रब्बी हंगामात 381 कोटींचे कर्जवाटप करण्यात आले आहे.

गुंतवणूक की गरजच

प्रतिकूल परस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी ही शेतामध्ये गुंतवणूक केली असली असे मानले जात असले तरी ही गुंतवणूक आहे का शेतकऱ्यांची गरज हा मोठा प्रश्न आहे. कारण खरीप हंगामापासूनच नैसर्गिक संकटाचे चक्र सुरु झाले असून आजही ते कायम आहे. शेतकऱ्यांनी गुंतवणूक केली असली तरी एकाही हंगामात एकाही पिकांचे भरघोस असे उत्पादनच झालेले नाही. त्यामुळे आता कर्ज परतफेड कशी केली जाणार हा देखील मोठा प्रश्न आहे. जून महिन्यापर्यंत ज्या शेतकऱ्यांचे कर्ज हे 3 लाखापेक्षा अधिकचे आहे त्यांना व्याज अदा करावे लागणार आहे.

संबंधित बातम्या :

आता निर्णायक टप्पा, सोयबीन ठेवायचे की विकायचे ! बाजारपेठेतले वास्तव काय ?

KISAN CREDIT CARD : केंद्र सरकारच्या योजनेत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा सर्वाधिक सहभाग, असे मिळवा किसान क्रेडीट कार्ड

महाबीजचा मोठा निर्णय : राज्यभरातील बिजोत्पादक बियाणांच्या दरावर काढला तोडगा, बोनसचाही लाभ

Follow Us
सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी भाजपच्या नवनीत राणा दिसणार? सुनिल तटकरे
सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी भाजपच्या नवनीत राणा दिसणार? सुनिल तटकरेंचं थेट विधान, राज्यासभेतील जागेसंदर्भात नवीन ट्वीस्ट
एकच खळबळ! अल्पवयीन मुलीची अवैधरित्या प्रसूती, परस्पर विकलं नवजात बाळ..
एकच खळबळ! अल्पवयीन मुलीची अवैधरित्या प्रसूती, परस्पर विकलं नवजात बाळ अन्... थरकाप उडवणारी घटना
शिंदेंच्या शिवसेनेचा मविआला जबर धक्का, माघार घेणाऱ्या त्या नेत्याला मो
शिंदेंच्या शिवसेनेचा मविआला जबर धक्का, माघार घेणाऱ्या त्या नेत्याला मोठं गिफ्ट; राजकारणात खळबळ!
महागाईचा आणखी एक झटका! घरगुती गॅस सिलेंडर 29 रुपयांनी महागलं, कितीवर प
महागाईचा आणखी एक झटका! घरगुती गॅस सिलेंडर 29 रुपयांनी महागलं, कितीवर पोहोचला आकडा?
आता थेट नाव घ्या... संजय शिरसाटांचं सुप्रिया सुळेंना खुलं आवाहन;
आता थेट नाव घ्या... संजय शिरसाटांचं सुप्रिया सुळेंना खुलं आवाहन; उमेदवारांच्या माघारीमुळे राजकारण पेटलं
कौटुंबिक छळाचा आणखी एक बळी! सासरच्या जाचाला कंटाळून 26 वर्षीय महिलेने
कौटुंबिक छळाचा आणखी एक बळी! सासरच्या जाचाला कंटाळून 26 वर्षीय महिलेने उचलले टोकाचे पाऊल
रवींद्र चव्हाण गुंडासारखे पंचतारांकित हॉटेलमध्ये घुसले अन्... संजय
रवींद्र चव्हाण गुंडासारखे पंचतारांकित हॉटेलमध्ये घुसले अन्... बापरे! संजय राऊत हे काय बोलून गेले? थेट सोने तस्करीशी कनेक्शन!
मुंबईत पुन्हा नेस्कोसारखाच प्रकार! लाईव्ह कॉन्सर्टमध्ये तरुण अन् तरुणी
मुंबईत पुन्हा नेस्कोसारखाच प्रकार! लाईव्ह कॉन्सर्टमध्ये तरुण आणि त्याची मैत्रीण... नेमकं काय घडलं?
राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली! नवनीत राणा NCPमध्ये प्रवेश करणार? पुन्हा
राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली! नवनीत राणा NCPमध्ये प्रवेश करणार? पुन्हा सुनेत्रा पवारांच्या भेटीनंतर चर्चांना उधाण
बड्या अधिकाऱ्याला अटक, महसूल गुप्तचर संचालनालयाची धडक कारवाई
मोठी बातमी! बड्या अधिकाऱ्याला अटक, महसूल गुप्तचर संचालनालयाची धडक कारवाई, तब्बल 5 कोटीचं सोनं...