AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विमा कंपन्यांच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांना कमी परतावा, केंद्राकडे शिफारस : दादाजी भुसे

विमा कंपन्यांच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांना कमी परतावा मिळत आहे. त्यामुळे विमा धोरणात बदल करावेत अशी शिफारस केंद्र सरकारकडे केलीय, अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी दिलीय.

विमा कंपन्यांच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांना कमी परतावा, केंद्राकडे शिफारस : दादाजी भुसे
| Edited By: | Updated on: Jul 10, 2021 | 7:59 PM
Share

नंदूरबार : “उत्तर महाराष्ट्रातील धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात सरासरीच्या 30 टक्के पाऊस झाला. आता आठवडाभरात दमदार पाऊस झाला नाही, तर दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांसमोर येईल. अशा परिस्थितीत राज्य सरकार आणि कृषी विभाग शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहणार आहे,” असं आश्वासन राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी दिलंय. कृषी मंत्री दादाजी भुसे रिसोर्स बँक प्रतिनिधींची बैठक आणि पिक पाहणीसाठी जिल्हा दौऱ्यावर असताना बोलत होते (Dadaji Bhuse say loss of farmer due to wrong policy).

दादाजी भुसे म्हणाले, “उत्तर महाराष्ट्रात धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात सर्वात कमी पेरण्या झाल्या आहेत. त्याच सोबत पावसाचे प्रमाणही कमी असल्याने शेतकरी संकटात आहे. शेतकऱ्यांनी या संकटातून खचून न जाता खंबीरपणे उभे राहावे. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहे. विमा कंपन्यांच्या काही चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांना मिळणारा परतावा कमी आहे. येत्या काळात पीक विमा योजनेत बदल करण्यासाठी केंद्र सरकारकडे शिफारस करण्यात आली आहे.”

“राज्य सरकार गेल्या वर्षभरापासून पिक विमा संदर्भात केंद्राकडे पाठपुरावा करत आहे. जवळपास 5 हजार कोटी रुपयांच्या नियत वे येण्याचे बाकी आहे,” असंही दादाजी भुसेंनी नमूद केलं. भुसे यांच्या दौऱ्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला तरी शेतकऱ्यांना अजुनही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. हवामान खात्याचा अंदाज चुकत असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून होत आहे.

हेही वाचा :

‘वरुणराजा एकदाचा बरस’, शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन कृषिमंत्री दादा भुसेंचं परमेश्वराला साकडं

मोठी बातमी, इफकोचा नॅनो यूरीया राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार, इफकोनं महाराष्ट्रात यावं, दादा भुसेंचं आवाहन

कृषी संजीवनी मोहिमेत 40 हजार गावांमध्ये 6 लाख शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचं मार्गदर्शन : कृषीमंत्री

व्हिडीओ पाहा :

Dadaji Bhuse say loss of farmer due to wrong policy

फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.