AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Buldhana : शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत पिकांचे नुकसान, शेती कामेही रखडली, काय आहे शिवरातले चित्र?

अधिकच्या पावसामुळे पिके सडण्याच्या मार्गावर आहेत तर काही ठिकाणी पिवळेही पडलेली आहेत. अशा परस्थितीमध्ये पीक फवारणीचा सल्ला कृषी विभागाकडून दिला जात आहे. मात्र, पावसाची संततधार आणि शेत जमिनीत वाफसा नसल्याने शेतकऱ्यांना तणनाशक फवारणी, पाण्याचा निचरा करणे, निंदन, डवरे यासारखी कामे करता येत नाहीत.

Buldhana : शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत पिकांचे नुकसान, शेती कामेही रखडली, काय आहे शिवरातले चित्र?
बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील पिके अशी पाण्याखाली आहेत.Image Credit source: TV9 Marathi
| Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Jul 15, 2022 | 10:33 AM
Share

बुलढाणा : पावसाअभावी जूनमध्ये जी परस्थिती शेतकऱ्यांवर ओढावली होती तीच आता जुलैमध्ये पाऊस होऊन देखील कायम आहे. जुलैच्या 1 तारखेपासून सुरु झालेल्या पावसामुळे वाटलं होत शेत शिवरातले चित्र बदलेन पण निसर्गाच्या लहरीपणामुळे (Farmer Trouble) शेतकऱ्यांवरील संकट कायम आहे. दरम्यानच्या काळात (Kharif Season) खरिपातील रखडलेल्या पेरण्या मार्गी लागल्या आहेत पण जे पेरलं ते उगवलं आणि पाण्यात वाहूनही गेलं अशीच काहीशी कथा खरिपातील सर्वच पिकांची झाली आहे. जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात तर (Farm Land Damage) शेत जमिनीही खरडून गेल्याचे प्रकार झाले आहेत. तर साठलेल्या पाण्यामुळे पिके सडतील अशी भीती व्यक्त होत आहे. हे सर्व असले तरी पावसामुळे शेतकऱ्यांना शेतीकामेही करणेही मुश्किल झाले आहे.

पावसामुळे शेतीकामेही रखडली

अधिकच्या पावसामुळे पिके सडण्याच्या मार्गावर आहेत तर काही ठिकाणी पिवळेही पडलेली आहेत. अशा परस्थितीमध्ये पीक फवारणीचा सल्ला कृषी विभागाकडून दिला जात आहे. मात्र, पावसाची संततधार आणि शेत जमिनीत वाफसा नसल्याने शेतकऱ्यांना तणनाशक फवारणी, पाण्याचा निचरा करणे, निंदन, डवरे यासारखी कामे करता येत नाहीत. गेल्या 10 दिवसांपासून पावसामध्ये सातत्य असल्याने शेतशिवराचे चित्रच बदलून गेले आहे. शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत पिकांचे नुकसान होत असतानाही शेतकरी हताश आहे. शेतामध्ये कोणते कामच करता येत नसल्याने पिके धोक्यात आहेत. वाफसा मोडल्याशिवाय शेतकऱ्यांना कोणतीच हालचाल करता येणार नाही.

मजुरांचेही हाल, हाताला कामच नाही

दरवर्षी पेरणी झाली पिकांची मशागतीची कामे असतात. त्यामुळे मजुरांच्या हातालाही कामे मिळतात. यंदा मात्र परस्थिती बदलेली आहे. ऐन पीक वाढीच्या दरम्यानच मुसळधार पावसामुळे पिके पाण्यात आहेत. त्यामुळे शेताकडे फिरकताही येत नाही. त्यामुळे मजुरांच्या हाताला काम नाही. नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे आणि मजुरांच्या हाताला काम देण्याची मागणी होत आहे. मात्र, अद्यापही पंचनाम्यासाठी ना महसूल विभागाचे अधिकारी फिरकले आहेत ना कृषी विभागाचे.

काय आहे पिकांची अवस्था?

यंदा खरिपाच्या पेरण्या लांबणीवर पडल्याने शेतकऱ्यांनी कडधान्याकडे पाठ फिरवली होती. परिणामी सोयाबीन आणि कापसाच्या क्षेत्रात ही वाढ झाली आहे. मात्र, पेरणी होताच सुरु झालेल्या पावसामध्ये 10 दिवस सातत्य राहिले. त्यामुळे सोयाबीन, कापूस ही मुख्य पिके तर पाण्यात आहेत. शिवाय आणखी दोन दिवस अशीच स्थिती राहिली तर मात्र, दुबार पेरणीशिवाय शेतकऱ्यांकडे पर्याय उरणार नाही.

Follow Us
त्या पत्रावर उद्धव ठाकरेंची पक्षप्रमुख म्हणून सही, मग...
त्या पत्रावर उद्धव ठाकरेंची पक्षप्रमुख म्हणून सही, मग... युक्तिवादाच्या अखेर ठाकरे गटाचा मोठा बॉम्ब, कोर्टात काय घडतंय?
मीरा भाईंदर महापालिकेकडून सार्वजनिक कुर्बानी, बकरा पाळण्यावर निर्बंध
मीरा भाईंदरमध्ये सार्वजनिक ठिकाणी बकरा पाळणे आणि कुर्बानीवर बंदी
राजकीय पक्षाचे नेतृत्व कोणाकडे, याची माहिती निवडणूक आयोगाला... सिब्बल
Shivsena Hearing | राजकीय पक्षाचे नेतृत्व कोणाकडे, याची माहिती निवडणूक आयोगाला... कपिल सिब्बल यांचा हा युक्तिवाद ठरणार गेम चेंजर?
धाराशिव: दिव्यांग शाळेतील विद्यार्थ्यांच्या हालअपेष्टा, प्रशासनाचे...
धाराशिव: दिव्यांग शाळेतील विद्यार्थ्यांच्या हालअपेष्टा, प्रशासनाचे दुर्लक्ष...काळीज पिळवटून टाकणारी दृश्य
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी: महागाई भत्त्यात २ टक्क्यांनी वाढ
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 2% वाढ: DA आता 60 टक्क्यांवर
एकच खळबळ! पुण्यात भरधाव वाहनांचा अपघात, एका पाठोपाठ एक 6 वाहनांची धडक
एकच खळबळ! पुण्यात भरधाव वाहनांचा अपघात, एका पाठोपाठ एक 6 वाहनांची धडक
ठाणे TDR घोटाळ्यात अनेक बड्या नेत्यांचा सहभाग; भाजप नेत्याचा मोठा दावा
ठाणे TDR घोटाळ्यात अनेक बड्या नेत्यांचा सहभाग; भाजप नेत्याचा मोठा दावा, शिंदेंच्या बालेकिल्ल्यात नेमकं काय घडतंय?
E20 पेट्रोलबाबत मोठी अपडेट समोर! केंद्र सरकार महत्त्वाचा निर्णय....
E20 पेट्रोलबाबत मोठी अपडेट समोर! केंद्र सरकार महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत, अखेर...
लवकरच केंद्रात दोन डझन मंत्री बदलणार, शिंदेंनाही हवय कॅबिनेट
शिंदेंनाही हवंय आणखी एक कॅबिनेट, लवकरच केंद्रात दोन डझन मंत्री बदलणार?
बाप रे! मुंबईच्या महापौरांच्या सोशल मीडिया प्रसिद्धीसाठी 25 लाख खर्च
Ritu Tawde : बाप रे! मुंबईच्या महापौरांच्या सोशल मीडिया प्रसिद्धीसाठी 25 लाखांचा खर्च, नेमकं सत्य काय?