AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nanded : अतिवृष्टीचा असा हा परिणाम, खरिपात नुकसान तर रब्बी हंगामात कायापालट

अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे खरीप हंगामात मोठे नुकसान झाले होते. हंगामाच्या अंतिम टप्यात पावसाने कहर केल्याने पिके पाण्यात होती. त्यामुळे उत्पादनावर तर घट झालीच पण या पावसाचे परिणाम रब्बी हंगामावरही झाला होता. कधी नव्हे ते अधिकच्या पावसामुळे हंगामातील पेरण्या लांबणीवर पडल्या होत्या. खरिपाचे नुकसान शेतकऱ्यांची तारांबळ हे सर्व असले तरी रब्बी हंगामात मुबलक पाणी आणि शेतकऱ्यांनी पीक पध्दतीमध्ये केलेला बदल ह्या जमेच्या बाजू झाल्या आहेत.

Nanded : अतिवृष्टीचा असा हा परिणाम, खरिपात नुकसान तर रब्बी हंगामात कायापालट
रब्बी हंगामात मराठवाड्यात पोषक वातावरणामुळे यंदा प्रथमच भातशेतीचे क्षेत्र पाहवयास मिळत आहे. पोषक वातावरणामुळे पीक बहरात आहे.
Reporter Rajiv Giri
Reporter Rajiv Giri | Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Mar 11, 2022 | 11:17 AM
Share

नांदेड : (Heavy Rain) अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे खरीप हंगामात मोठे नुकसान झाले होते. हंगामाच्या अंतिम टप्यात पावसाने कहर केल्याने पिके पाण्यात होती. त्यामुळे उत्पादनावर तर घट झालीच पण या पावसाचे परिणाम (Rabi Season) रब्बी हंगामावरही झाला होता. कधी नव्हे ते अधिकच्या पावसामुळे हंगामातील पेरण्या लांबणीवर पडल्या होत्या. खरिपाचे नुकसान शेतकऱ्यांची तारांबळ हे सर्व असले तरी रब्बी हंगामात मुबलक पाणी आणि शेतकऱ्यांनी पीक पध्दतीमध्ये केलेला बदल ह्या जमेच्या बाजू झाल्या आहेत. केवळ पारंपरिक पिकांवर अवलंबून न राहता शेतकऱ्यांना ज्या पिकातून उत्पन्न त्यालाच महत्व दिले आहे. नांदेड जिल्ह्यातील तेलंगणा राज्याच्या सीमावर्ती भागात (Paddy Farming) भातशेतीच्या क्षेत्रात भरीव वाढ झाली आहे. मराठवाड्यात भातशेती हे दुर्मीळ असले तरी यंदा उपलब्ध पाणी आणि वातावरणातील बदल यामुळे शेतकऱ्यांनी हे धाडस केले आहे.

तीन तालुक्यात 15 हजार हेक्टरावर भातशेती

मराठवाड्यात रब्बी हंगामात ज्वारी,गहू किंवा हरभरा याशिवाय शेतकरी अन्य पिकांकडे दुर्लक्ष करतो. यावेळी मात्र, उत्पादन वाढीसाठी वेगवेगळे प्रयोग केले जात आहेत. त्याचअनुशंगाने जिल्ह्यातील देरलूर, बिलोली आणि धर्माबाद या तेलंगणा सीमावर्ती भागात भातशेतीचा प्रयोग शेतकऱ्यांनी केला आहे. दरवर्षी त्याच पिकाने जमिनीचा सामू कमी होतो तर उत्पादनातही वाढ होत नाही. भातशेतीचा प्रयोग नवा असला तरी तीन तालुक्यांमध्ये तब्बल 15 हजार हेक्टरावर धानाचे पीक बहरत आहे. यंदा प्रथमच शेतकऱ्यांनी हे धाडस केले असून समाधानकारक उत्पादन पदरी पडले तर भातशेतीचे क्षेत्र वाढणार आहे.

पोषक वातावरणामुळे पीक जोमात

ज्या ठिकाणी उबलक पाणी आहे त्याच भागात भाताचे उत्पादन घेतले जाते. मराठवाड्यात दरवर्षी आवर्षणाची स्थिती असते. यंदा मात्र, चित्र पालटले असून मुबलक प्रमाणात पाणी आहे. शिवाय पीक वाढीस पोषक वातावरण असल्याने या तालुक्यातील भाताचे पीक बहरत आहे. वातावरणाने साथ दिली तर विक्रमी उत्पादन मिळेल असा आशावाद शेतकऱ्यांना आहे. पीकपध्दतीमध्ये बदल करुन उत्पादन वाढीच्या अनुशंगानेच हा बदल केल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

गावरान तांदूळ, मागणीही अधिक

सध्या गावरान शेतीमालाला अधिकची मागणी आहे. आरोग्याच्या दृष्टीने ही पध्दत फायदेशीर आहे मात्र, गावरान तांदूळ क्विचितच मिळतो. याचाच अभ्य़ास या भागातील शेतकऱ्यांनी भातशेतीचे पीक घेतले आहे. ज्याला अधिकचे मागणी त्याच पिकाचे उत्पादन घेतले तर फायदाही अधिकचा होतो शिवाय गावराणमुळे अधिकची मागणी होते.या भागातील बहुतांश शेतकऱ्यांनी गावरान जातीच्या तांदळाची लागवड केलीय, या तांदळाला स्थानिक बाजारपेठेत मोठी मागणी आहे.

संबंधित बातम्या :

उत्तर महाराष्ट्र, कोकणनंतर आता नंबर कुणाचा? ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांचा जीव टांगणीला

Photo Gallery : निसर्गाचे धुमशान, लाल-केशरी रंगांची उधळण, उन्हाळ्याच्या चाहुलीनं पळसाला बहार

दुष्काळात तेरावा: कीटनाशकांच्या फवारणीनंतर द्राक्ष बागा जळाल्या घडही सुकले, पंढरपुरात नेमकं असे का घडले?

Follow Us
आमचा युक्तीवाद सुरु होईल तेव्हा... कपिल सिब्बल यांच्या दाव्यांवर शिंदे
आमचा युक्तीवाद सुरु होईल तेव्हा... कपिल सिब्बल यांच्या दाव्यांवर शिंदे गटाकडून सर्वात मोठी प्रतिक्रिया
2018ची घटना असंवैधानिक तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी?
मोठी बातमी! 2018ची घटना असंवैधानिक तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी? कपिल सिब्बलांचा कोर्टात मोठा युक्तिवाद
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर, चार मुद्यामध्येच... कोर्टात नेमकं काय घडलं?
TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! खासगी अकॅडमी चालकाला अटक
TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! सोलापुरातून खासगी अकॅडमी चालकाला अटक
रेवती सुळेंच्या रिसेप्शन सोहळ्यातील सर्वात खास व्हिडीओ!
रेवती सुळेंच्या रिसेप्शन सोहळ्यातील सर्वात खास व्हिडीओ! पंतप्रधान आणि रोहित पवारांच्या संवादादरम्यानच...
जरांगेंनी विशिष्ट समाजाच्या भावना दुखावू नये! अभ्यासपूर्ण बोला
Sachin Kharat | विशिष्ट समाजाच्या भावना दुखावू नका! अभ्यासपूर्ण बोला; सचिन खरातांचा जरांगेंना थेट इशारा
उबाठाचा मोठा डाव! शिवसेना पक्षाच्या 2018च्या घटनेनुसार...
उबाठाचा मोठा डाव! शिवसेना पक्षाच्या 2018च्या घटनेनुसार... ठाकरेंचे वकील थेट निवडणुक आयोगालाच घेरणार?
वसई-विरारमध्ये पावसाचा धुमाकूळ! विवा कॉलेज परिसर जलमय, रस्त्यांना...
Vasai-Virar | वसई-विरारमध्ये पावसाचा धुमाकूळ! विवा कॉलेज परिसर जलमय, रस्त्यांना नदीचं स्वरूप
स्वातंत्र्यादिनी लाल किल्ल्यावर घडणार इतिहास! पहिल्यांदाच...
स्वातंत्र्यादिनी लाल किल्ल्यावर घडणार इतिहास! पहिल्यांदाच... एकनाथ शिंदेंनी काय सांगितलं?
राष्ट्रवादीत मोठा भूकंप? तटकरे जाणार, नवा प्रदेशाध्यक्ष कोण?
राष्ट्रवादीत मोठा भूकंप? तटकरे जाणार, नवा प्रदेशाध्यक्ष कोण? अनिल पाटलांनी स्पष्टच सांगितलं!