AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Turmeric Crop : अतिवृष्टीच्या नुकसानीच्या खुणा, पीक बहरात पण उत्पादन नाही पदरात

फळपिकांपासून ते पालेभाज्या आणि हंगामी अशा सर्वच पिकांवर अतिवृष्टीचा परिणाम झालेला आहे. काळाच्या ओघात आणि पीक काढणी सुरु असतानाच नुकसान काय असते याचा प्रत्यय येत आहे. बहरात दिसत असलेल्या हळदीच्या उत्पादनात मात्र कमालीची घट होत आहे. अतिवृष्टी दरम्यान हळद पिकामध्ये पाणी साचून राहिले होते. त्यामुळे थेट हळदीच्या घडावरच परिणाम झाला होता.

Turmeric Crop : अतिवृष्टीच्या नुकसानीच्या खुणा, पीक बहरात पण उत्पादन नाही पदरात
हळद काढणीला प्रारंभ झाला आहे.Image Credit source: TV9 Marathi
| Edited By: | Updated on: Mar 22, 2022 | 1:43 PM
Share

वाशिम : फळपिकांपासून ते पालेभाज्या आणि हंगामी अशा सर्वच पिकांवर (Heavy Rain) अतिवृष्टीचा परिणाम झालेला आहे. काळाच्या ओघात आणि पीक काढणी सुरु असतानाच नुकसान काय असते याचा प्रत्यय येत आहे. बहरात दिसत असलेल्या (Turmeric Production) हळदीच्या उत्पादनात मात्र कमालीची घट होत आहे. अतिवृष्टी दरम्यान हळद पिकामध्ये पाणी साचून राहिले होते. त्यामुळे थेट हळदीच्या घडावरच परिणाम झाला होता. पावसामुळे हळद हिरवीगार असली तरी जमिनीत असलेल्या घड कुजले तर आता काढणीच्या दरम्यान जेवढे बियाणे गाढले तेवढे तरी पदरी पडते की नाही अशी अवस्था (Washim District जिल्ह्यातील उमरा परिसरात पाहवयास मिळत आहे. नगदी पीक म्हणून वाशिम जिल्ह्यात हळदीचे क्षेत्र वाढत आहे. पण यंदा उत्पादनावर झालेला खर्च तरी मिळतो की नाही अशी स्थिती आहे.

लागवड घडाची अन् उत्पादन दोन शेंगाचे

हळद लागवड करताना शेती मशागत, विकतचे बियाणे, मजुरीचा खर्च हे सर्व करुनही आता उत्पादनात कमालीची घट झाली आहे. लागवडसाठी बियाणे म्हणून बंडाचा गोळा आणि आता काढणी दरम्यान एक किंवा दोन शेंगा निघत आहेत. मध्यंतरी अतिवृष्टीच्या दरम्यान हळदीच्या क्षेत्रात अधिक काळ पाणी साचून राहिले. त्याचा निचराच योग्य पध्दतीने झाला नाही. त्यामुळे घडकूज आणि न भरुन निघणारे नुकसान झाले आहे. वर्षभर लागवड, मशागत, बियाणे आणि आता काढणीचा खर्च तरी मिळतो का नाही अशी अवस्था आहे.

उमरगा परिसरात काढणीची लगबग

हळद तसे सांगली आणि हिंगोली जिल्ह्यामध्येच अधिक प्रमाणात घेतले जाणारे पीक आहे. मात्र, वाशिम जिल्ह्यातील बगायती भागात हळद लागवडीला प्राधान्य दिले जाते. शिवाय नगदी पीक म्हणूनही याकडे पाहिले जात असून वर्षागणीस हळदीच्या क्षेत्रात वाढ होत आहे. खरिपात लागवड केलेल्या हळदीची सध्या काढणी सुरु आहे. जिल्ह्यातील उमरी परिसरात हळदीची अधिकचा लागवड आहे. मात्र, त्या तुलनेत उत्पादन नाही. निसर्गाच्या लहरीपणाचा परिणाम शेतकरी आता 5 महिन्यानंतर पाहत आहेत.

काढणी दरम्यान सर्वकाही समोर

आतापर्यंत उत्पादनात घट होणार इथपर्यंतच विषय होता. पण प्रत्यक्षात हळद काढणीला सुरवात झाल्यानंतर नेमका अतिवृष्टीचा परिणाम काय हे शेतकऱ्यांच्या लक्षात येऊ लागले आहे. वाढीव उत्पादन तर सोडाच पण बियाणे म्हणून जेवढे वापरले आहे त्याचा खर्च निघावा हीच अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहे.

संबंधित बातम्या :

Banana आता फळपिक, ‘मनरेगा’ मधूनही करता येणार लागवड, शेतकऱ्यांना नेमका फायदा काय?

Cloudy Weather: ऊन, पावसाच्या खेळात शेती व्यवसायच धोक्यात, यंदा आंबा बेभावात

Mango Export : अडचणींवर मात करीत फळांचा ‘राजा’ परदेशात, हंगामात प्रथमच ‘लेट पण थेट’ England ध्येच निर्यात

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.