Cashew : काजू बीच्या बाबतीत बाजारपेठेचे सूत्र ही मोडले, उत्पादन अन् दरही घटले, काय आहेत कारणे?

वातावरणातील बदलाचा परिणाम हा प्रत्येक पिकांवर आणि फळांवरही झाला आहे. एवढेच नाही तर काढणीचा हंगामही लांबलेला आहे. असाच काहीसा प्रकार काजूच्या बाबतीमध्येही झाला आहे. काजू बीचे उत्पादन घटूनही दर वाढलेले नाहीत. उलट यामध्ये घट झालेली आहे. उत्पादन घटले तर पिकांच्या किंमतीमध्ये वाढ होते हा बाजारपेठेचा नियमच आहे. पण काजू बीच्या बाबतीत हे उलटे होताना दिसत आहे.

Cashew : काजू बीच्या बाबतीत बाजारपेठेचे सूत्र ही मोडले, उत्पादन अन् दरही घटले, काय आहेत कारणे?
यंदा वातावरणातील बदलामुळे काजू बीचे उत्पादन घटले आहे.Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Mar 05, 2022 | 12:47 PM

सिंधुदुर्ग : (Climate change) वातावरणातील बदलाचा परिणाम हा प्रत्येक पिकांवर आणि फळांवरही झाला आहे. एवढेच नाही तर काढणीचा हंगामही लांबलेला आहे. असाच काहीसा प्रकार काजूच्या बाबतीमध्येही झाला आहे. (Cashew) काजू बीचे उत्पादन घटूनही दर वाढलेले नाहीत. उलट यामध्ये घट झालेली आहे. (Production Decrease) उत्पादन घटले तर पिकांच्या किंमतीमध्ये वाढ होते हा बाजारपेठेचा नियमच आहे. पण काजू बीच्या बाबतीत हे उलटे होताना दिसत आहे. त्यामुळे दरातील चढ-उताराबद्दल संभ्रमतेचे वातावरण शेतकऱ्यांमध्ये आहे. उत्पादनात घट दुसरीकडे दरही नाही त्यामुळे काजू उत्पादक शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान होत आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे सर्वच पिकांचे नुकसान झाले पण उत्पादनात घट झाल्यावर वाढीव दर तरी मिळाले आहेत पण काजू बीच्या बाबतीत असे होताना दिसत नाही.

काजू हंगामाला सुरवात

इतर फळांप्रमाणे काजूचे उत्पादन पदरात पाडून घेण्यासाठी शेतकऱ्यांना प्रयत्नांची पराकष्टा करावी लागली होती. अगोदरच अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे काजू बागांना मोठा फटका बसलेला होता. यामुळे ऑक्टोंबर-नोव्हेंबरमध्ये आलेला मोहोर 20 दिवसांमध्येच कुजून गेला. यानंतर मात्र, डिसेंबरमध्ये थंडीत वाढ झाली आणि पालवी फुटावी म्हणून शेतकऱ्यांनी केलेले प्रयत्न कामी आले. त्यामुळे मोहोर तर आला पण गेल्या 15 ते 20 दिवसांपासून हंगामही सुरु झाला आहे.

महिनाभराने लांबला हंगाम

कोकणातील वेलूर्गा, सावंतवाडी, मालवण, या तालुक्यांमध्ये काजूचा हंगाम लवकरच सुरु झाला होता. पण उर्वरीत भागामध्ये काजू बी परिपक्व होण्यास विलंब झाला आहे. दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्येच काजूचा हंगाम तेजीत असतो. मात्र, यंदा मार्च महिना सुरु झाला तरी काजूचे उत्पादन हे सुरु झालेले नाही. असे असूनही दरात वाढ होणे अपेक्षित आहे. पण काजू बीच्या दरात 5 रुपयांनी घटच झालेली आहे. आठवडी बाजारात आवक कमी असूनही काजू बी हे 125 रुपये किलोवरुन थेट 120 रुपये किलोवर आले आहेत. त्यामुळे काजू बी पीक जोपासण्यासाठी अधिकचा खर्च आणि आता कमी दरात विक्री करण्याची नामुष्की उत्पादकांवर ओढावली आहे.

आयात काजूचा परिणाम दरावर

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी हे मोठ्या प्रमाणात काजू आय़ात करतात. हा काजू कोकणातील काजू दराच्या तुलनेत खूपच कमी दराने मिळतो. त्यामुळे स्थानिक बाजारपेठेतील काजू चांगला असूनही याकडे दुर्लक्ष होते. परिणामी चांगला काजू बाजूला राहून इतर काजूचीच विक्री होते. यामुळे व्यापारी आणि शेतकरी यांच्यामध्ये नुकतीच बैठक पार पडली असून आयात काजूवर काय निर्णय होणार हे पहावे लागणार आहे.

संबंधित बातम्या :

Photo Gallery: काळ्या मातीत बैलगाडी शर्यतीचा थरार अन् तरुणांचा उत्साह शिघेला..!

हापूसच्या खरेदी-विक्रीमध्ये होणार नाही फसवणूक, कृषी पणन मंडळाचा काय आहे प्लॅन?

Chickpea Crop : हरभऱ्याला ‘आधार’ हमीभाव केंद्राचाच, नोंदणी करा अन् योजनेचा लाभ घ्या..!

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.