AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mango : आवक वाढली अन् दरही, यंदा आंब्याची चव चाखायला मिळणार की नाही..!

निसर्गाच्या लहरीपणाचा सर्वाधिक परिणाम हा फळपिकांवर झालेला आहे. यामध्ये द्राक्ष आणि आंब्याचे मोठे नुकसान झाले आहे. दरवर्षी आंब्याची आवक वाढली की दरात घट होते. पण यंदा चित्र उलटे आहे. आता पुणे, मुंबई यासारख्या बाजारपेठांमध्ये कोकणातील देवगड, संगमेश्वर, पावस, राजापूर, सावंतवाडी या भागातून आंब्याची आवक वाढली आहे.

Mango : आवक वाढली अन् दरही, यंदा आंब्याची चव चाखायला मिळणार की नाही..!
तिसऱ्या मोहरातील आंब्याचे उत्पादन वाढल्याने दरात मोठी घसरण झाली आहे.Image Credit source: tv9
| Updated on: Apr 30, 2022 | 10:12 AM
Share

पुणे : अवकाळीच्या कचाट्यातून सुटका झालेला (Mango) आंबा आता बाजारपेठेत दाखल होऊ लागला आहे. यापूर्वीच्या हंगामातील आंब्याचे अवकाळी पाऊस आणि वाढत्या उन्हामुळे नुकसानच झाले होते. त्यामुळे मागणी असतानाही बाजारपेठेत (Mango Arrival) आवकच नसल्याने खवय्यांना आंब्याची चवच चाखायला मिळालेली नाही. तर आता आंब्याची आवक वाढली असताना दरही गगणाला भिडले आहेत. त्यामुळे यंदा सर्वसामान्यांच्या नशिबी आंबा आहे की नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे. राज्यातील (Mango Market) मुख्य बाजारपेठांमध्ये कोकणातून आंब्याची आवक सुरु झाली आहे. मात्र, अक्षतृतीयापर्यंत आंब्याच्या दरात तेजी कायम राहणार असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. त्यामुळे कधी घटती आवक तर कधी वाढलेले दर यामुळे खवय्येगिरींचा हिरमोड होत आहे.

उत्पादन घटल्याने दरात वाढ

निसर्गाच्या लहरीपणाचा सर्वाधिक परिणाम हा फळपिकांवर झालेला आहे. यामध्ये द्राक्ष आणि आंब्याचे मोठे नुकसान झाले आहे. दरवर्षी आंब्याची आवक वाढली की दरात घट होते. पण यंदा चित्र उलटे आहे. आता पुणे, मुंबई यासारख्या बाजारपेठांमध्ये कोकणातील देवगड, संगमेश्वर, पावस, राजापूर, सावंतवाडी या भागातून आंब्याची आवक वाढली आहे. असे असले तरी आवकच्या तुलनेत मागणी अधिक असल्याने हापूसला 800 ते 1 हजार 200 असा प्रति डझन दर आहे.

कोकणपट्ट्यातून आंब्याची आवक

कोकणातील विविध जिल्ह्यामधून सध्या पुणे कृषी उत्पन्न बाजारसमितीमध्ये आंब्याची आवक सुरु आहे. दिवसाकाठी 10 ते 15 हजार पेट्यांची आवक सुरु आहे. तर कर्नाटकातून 2 डझनाच्या अशा 5 ते 6 हजार बॉक्स दिवसाकाठी बाजारपेठेत दाखल होत आहे. अक्षयतृतीयाच्या अनुशंगाने सध्या आवक वाढली असली तरी दरात घट झालेली नाही. मूळात आंब्याचे उत्पादनच घटले असल्याने दर चढेच राहतील असा अंदाज आहे. पण अक्षयतृतीयानंतर यामध्ये बदल होईल ही अपेक्षा व्यापाऱ्यांना आहे.

असे आहेत आंब्याचे दर

हापूसची 4 ते 5 डझनची पेटी ही 800 ते 1 हजार 200 रुपयांपर्यंत पुणे बाजारपेठेत मिळत आहे. तर पायरी आंब्याची 800 ते 1 हजार रुपयांपर्यंत पेटी मिळत आहे. पायरी आंबा प्रतिकिलो 50 ते 60 रुपये तर हापूस 50 ते 80 रुपये किलो तर लालबाग 30 ते 40 रुपये किलो याप्रमाणे दर आहेत. उत्पादनावर परिणाम आणि मागणी अधिकची अन् आवक कमी यामुळे आंब्याचे दर हे चढेच राहणार आहे. अक्षतृतीया संपल्यानंतर दरात घट होईल असा अंदाज आहे.

Follow Us
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार.
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी.
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी.