AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mango : आवक वाढली अन् दरही, यंदा आंब्याची चव चाखायला मिळणार की नाही..!

निसर्गाच्या लहरीपणाचा सर्वाधिक परिणाम हा फळपिकांवर झालेला आहे. यामध्ये द्राक्ष आणि आंब्याचे मोठे नुकसान झाले आहे. दरवर्षी आंब्याची आवक वाढली की दरात घट होते. पण यंदा चित्र उलटे आहे. आता पुणे, मुंबई यासारख्या बाजारपेठांमध्ये कोकणातील देवगड, संगमेश्वर, पावस, राजापूर, सावंतवाडी या भागातून आंब्याची आवक वाढली आहे.

Mango : आवक वाढली अन् दरही, यंदा आंब्याची चव चाखायला मिळणार की नाही..!
तिसऱ्या मोहरातील आंब्याचे उत्पादन वाढल्याने दरात मोठी घसरण झाली आहे.Image Credit source: tv9
राजेंद्र खराडे
राजेंद्र खराडे | Updated on: Apr 30, 2022 | 10:12 AM
Share

पुणे : अवकाळीच्या कचाट्यातून सुटका झालेला (Mango) आंबा आता बाजारपेठेत दाखल होऊ लागला आहे. यापूर्वीच्या हंगामातील आंब्याचे अवकाळी पाऊस आणि वाढत्या उन्हामुळे नुकसानच झाले होते. त्यामुळे मागणी असतानाही बाजारपेठेत (Mango Arrival) आवकच नसल्याने खवय्यांना आंब्याची चवच चाखायला मिळालेली नाही. तर आता आंब्याची आवक वाढली असताना दरही गगणाला भिडले आहेत. त्यामुळे यंदा सर्वसामान्यांच्या नशिबी आंबा आहे की नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे. राज्यातील (Mango Market) मुख्य बाजारपेठांमध्ये कोकणातून आंब्याची आवक सुरु झाली आहे. मात्र, अक्षतृतीयापर्यंत आंब्याच्या दरात तेजी कायम राहणार असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. त्यामुळे कधी घटती आवक तर कधी वाढलेले दर यामुळे खवय्येगिरींचा हिरमोड होत आहे.

उत्पादन घटल्याने दरात वाढ

निसर्गाच्या लहरीपणाचा सर्वाधिक परिणाम हा फळपिकांवर झालेला आहे. यामध्ये द्राक्ष आणि आंब्याचे मोठे नुकसान झाले आहे. दरवर्षी आंब्याची आवक वाढली की दरात घट होते. पण यंदा चित्र उलटे आहे. आता पुणे, मुंबई यासारख्या बाजारपेठांमध्ये कोकणातील देवगड, संगमेश्वर, पावस, राजापूर, सावंतवाडी या भागातून आंब्याची आवक वाढली आहे. असे असले तरी आवकच्या तुलनेत मागणी अधिक असल्याने हापूसला 800 ते 1 हजार 200 असा प्रति डझन दर आहे.

कोकणपट्ट्यातून आंब्याची आवक

कोकणातील विविध जिल्ह्यामधून सध्या पुणे कृषी उत्पन्न बाजारसमितीमध्ये आंब्याची आवक सुरु आहे. दिवसाकाठी 10 ते 15 हजार पेट्यांची आवक सुरु आहे. तर कर्नाटकातून 2 डझनाच्या अशा 5 ते 6 हजार बॉक्स दिवसाकाठी बाजारपेठेत दाखल होत आहे. अक्षयतृतीयाच्या अनुशंगाने सध्या आवक वाढली असली तरी दरात घट झालेली नाही. मूळात आंब्याचे उत्पादनच घटले असल्याने दर चढेच राहतील असा अंदाज आहे. पण अक्षयतृतीयानंतर यामध्ये बदल होईल ही अपेक्षा व्यापाऱ्यांना आहे.

असे आहेत आंब्याचे दर

हापूसची 4 ते 5 डझनची पेटी ही 800 ते 1 हजार 200 रुपयांपर्यंत पुणे बाजारपेठेत मिळत आहे. तर पायरी आंब्याची 800 ते 1 हजार रुपयांपर्यंत पेटी मिळत आहे. पायरी आंबा प्रतिकिलो 50 ते 60 रुपये तर हापूस 50 ते 80 रुपये किलो तर लालबाग 30 ते 40 रुपये किलो याप्रमाणे दर आहेत. उत्पादनावर परिणाम आणि मागणी अधिकची अन् आवक कमी यामुळे आंब्याचे दर हे चढेच राहणार आहे. अक्षतृतीया संपल्यानंतर दरात घट होईल असा अंदाज आहे.

Follow Us
सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; काय घडलं?
ShivSena | सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; नेमकं काय घडलं?
शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला जवळ? संजय राऊत म्हणाले, आशेचा किरण...
Sanjay Raut | शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला जवळ? कपिल सिब्बलांच्या युक्तिवादानंतर संजय राऊत म्हणाले, आशेचा किरण...
विधिमंडळ पक्षात फूट म्हणजे राजकीय पक्षात फूट नाही!
Shivsena Case Hearing | विधिमंडळ पक्षात फूट म्हणजे राजकीय पक्षात फूट नाही!; कपिल सिब्बलांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद
आमचा युक्तीवाद सुरु होईल तेव्हा... कपिल सिब्बल यांच्या दाव्यांवर शिंदे
आमचा युक्तीवाद सुरु होईल तेव्हा... कपिल सिब्बल यांच्या दाव्यांवर शिंदे गटाकडून सर्वात मोठी प्रतिक्रिया
2018ची घटना असंवैधानिक तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी?
मोठी बातमी! 2018ची घटना असंवैधानिक तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी? कपिल सिब्बलांचा कोर्टात मोठा युक्तिवाद
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर, चार मुद्यामध्येच... कोर्टात नेमकं काय घडलं?
TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! खासगी अकॅडमी चालकाला अटक
TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! सोलापुरातून खासगी अकॅडमी चालकाला अटक
रेवती सुळेंच्या रिसेप्शन सोहळ्यातील सर्वात खास व्हिडीओ!
रेवती सुळेंच्या रिसेप्शन सोहळ्यातील सर्वात खास व्हिडीओ! पंतप्रधान आणि रोहित पवारांच्या संवादादरम्यानच...
जरांगेंनी विशिष्ट समाजाच्या भावना दुखावू नये! अभ्यासपूर्ण बोला
Sachin Kharat | विशिष्ट समाजाच्या भावना दुखावू नका! अभ्यासपूर्ण बोला; सचिन खरातांचा जरांगेंना थेट इशारा
उबाठाचा मोठा डाव! शिवसेना पक्षाच्या 2018च्या घटनेनुसार...
उबाठाचा मोठा डाव! शिवसेना पक्षाच्या 2018च्या घटनेनुसार... ठाकरेंचे वकील थेट निवडणुक आयोगालाच घेरणार?